शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

CoronaVirus : रक्तपेढ्यात रक्त झाले उदंड, रक्तदान शिबिरे केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:05 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उदंड झाले असून, सर्वांनी रक्तदान शिबिरे बंद केली आहेत. बारा रक्तपेढ्यात तब्बल ३९२२ पिशव्या रक्त असून, रुग्णालयातून अपेक्षित मागणी नसल्याने ते पडून राहिले आहे.

ठळक मुद्देरक्तपेढ्यात रक्त झाले उदंड, बारा रक्तपेढ्यात ३९२२ पिशव्या पडून रक्तदान शिबिरे केली बंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त उदंड झाले असून, सर्वांनी रक्तदान शिबिरे बंद केली आहेत. बारा रक्तपेढ्यात तब्बल ३९२२ पिशव्या रक्त असून, रुग्णालयातून अपेक्षित मागणी नसल्याने ते पडून राहिले आहे.दातृत्वाच्या बाबतीत कोल्हापूरकरांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यातही रक्तदान म्हटले तर येथे रक्तदानाची शंभरी पार करणारे अनेकजण भेटतात. प्रशासन अथवा रक्तपेढ्यांनी नुसते आवाहन केले की, हजारो पिशव्या रक्त संकलन होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात रक्ताची मागणी कमी राहिली.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठड्यात राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये काहीसी शिथिलता दिल्याने नागरिकांनी नियोजित शस्त्रक्रियांसाठी रुग्णालये गाठली. पंधरा दिवसांत सर्वच रुग्णालयांतून रक्ताची मागणी वाढली होती. त्यामुळे कोल्हापूरसह पुणे, मुंबईत रक्ताची टंचाई भासू लागली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्तदानाचे आवाहन केले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

शिवसेनेसह इतर सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिरे घेतली. त्यात शिवराज्याभिषेक सोहळा शिवभक्तांनी रक्तदान शिबिरे आयोजित करून साजरा केला. त्यामुळे गेले आठ-दहा दिवसांत सर्वच रक्तपेढ्यात रक्ताची आवक मोठ्या प्रमाणात झाली. रक्त आता ठेवायला जागा नसल्याने शिबिरे नाकारली जात आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरे आयोजनाच्या सूचना वरिष्ठाकडून दिल्या असल्यातरी आता रक्तपेढ्याच रक्त घ्यायला तयार नाहीत.जुलैमध्ये रक्ताच्या मागणीत वाढ शक्यपावसाळा सुरू झाल्यानंतर साथीचे आजार डोके वर काढतात. आताच जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. जुलैमध्ये त्याचा फैलाव झाला तर रक्त घटकांची गरज भासणार आहे. त्यावेळी रक्ताची मागणी आणि पुरवठा सुरळीत ठेवावा लागणार आहे.असा आहे रक्तपेढ्यातील साठा (पिशवी)रक्तपेढी                     साठा

  1. सीपीआर                    ५६
  2. महापालिका               ८३
  3. शाहू                           २२१
  4. जीवनधारा                ५४१
  5. तुळशी (उदगाव)       ३४०
  6. अर्पण                        ६४४
  7. वैभवलक्ष्मी               ४९३
  8. गडहिंग्लज                ३२६
  9. लाईन्स (इचलकरंजी) ९२
  10. डी. वाय. पाटील          ७४
  11. आधार                       ९१
  12. संजीवनी                  ४५१
  • एकूण                     ३९२२

 

विशिष्ट कालावधीपर्यंतच रक्ताचा साठा करता येतो. त्यानंतर ते खराब होते. त्यामुळे सध्या रक्तदान संकलन बंद केले आहे. आणखी पंधरा दिवसांनी रक्ताची गरज भासणार आहे, त्यासाठी रक्तदात्यांनी शासनाच्या लिंकवर जाऊन नोंदणी करावी.- दीपा शिपूरकर,रक्तसंकलन समन्वय अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरBlood Bankरक्तपेढी