शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुजोर कर्नाटकाविरोधात महाराष्ट्र बंद करून दाखवा, कोल्हापुरातील धरणे आंदोलनात सीमावासियांचे आवाहन

By समीर देशपांडे | Updated: December 26, 2022 16:40 IST

'महाराष्ट्रात पुन्हा सीमाप्रश्न जागवण्यासाठी कोल्हापुरातून सुरूवात करण्याची गरज असल्याने येथे आलो'

कोल्हापूर: आतापर्यंत महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. परंतू आता सीमाप्रश्नाबाबत कर्नाटक सरकारची भाषा मुजोरीची आहे. त्यामुळे या मुजोरीविरोधात सीमावासियांना पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येवून महाराष्ट्र बंद करून दाखवावा असे आवाहन माजी आमदार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले.हजाराहून अधिक सीमावासियांनी सोमवारी रॅलीने कोल्हापुरात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. त्यावेळी किणेकर बोलत होते. यावेळी कोल्हापूरमधील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवत या आंदोलनाला पाठिंबा दिला. भगवे फेटे बांधून आलेल्या सीमावासियांसह कोल्हापूरच्या नागरिकांनी यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.किणेकर म्हणले, कर्नाटक सरकारने आमचा महामेळावा हाणून पाडला. बेळगावमध्ये ते आम्हांला काहीही करू देणार नाहीत. तरूण पीढीला या लढ्याशी आम्हांला जोडून घ्यायचे होते. महाराष्ट्रात पुन्हा सीमाप्रश्न जागवण्यासाठी कोल्हापुरातून सुरूवात करण्याची गरज असल्याने येथे आलो.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अमित शहा यांच्यादेखत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत ठणकावून सांगितले आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक झाल्यानंतर आम्हांला येथून इशारा द्यावा लागला होता. खासदार संजय मंडलिक म्हणाले, सीमाप्रश्न आता नवीन पीढीने हातात घेतला आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रदेश केंद्रशासित करावा. यावेळी माजी मंत्री भरमूआण्ण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजीव आवळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिंदे गटाचे सुजित चव्हाण यांची भाषणे झाली. आंदोलनाआधी भगवे झेंडे लावलेल्या वाहनांसह सीमावासिय कोल्हापुरात आले. कागल नाक्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथून कोल्हापुरात दसरा चौकात शाहू महाराजांना अभिवादन करून सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी आंदोलनानंतर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर, समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सूंठकर, सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेदार यांच्यासह मोठ्या संख्येने सीमाबांधव उपस्थित होते.‘त्यांच्या’ प्रचाराला तेवढे कोण येवू नकामनोहर किणेकर म्हणाले, पूर्वी आमच्या प्रचाराला येणारे आता बेळगावमध्ये आपल्या पक्षाच्या प्रचाराला येत आहेत. अशा नेत्यांच्या कर्नाटकमधील पक्षाने हा भाग महाराष्ट्राला देण्याचे वचन जाहीरनाम्यात द्यावे आम्ही कोणीही निवडणूक लढवत नाही. परंतू बेळगावच्या तीन आणि खानापूरची एक अशा चार जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जिंकणार आहोत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक