शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मुजोर कर्नाटकाविरोधात महाराष्ट्र बंद करून दाखवा, कोल्हापुरातील धरणे आंदोलनात सीमावासियांचे आवाहन

By समीर देशपांडे | Updated: December 26, 2022 16:40 IST

'महाराष्ट्रात पुन्हा सीमाप्रश्न जागवण्यासाठी कोल्हापुरातून सुरूवात करण्याची गरज असल्याने येथे आलो'

कोल्हापूर: आतापर्यंत महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे. परंतू आता सीमाप्रश्नाबाबत कर्नाटक सरकारची भाषा मुजोरीची आहे. त्यामुळे या मुजोरीविरोधात सीमावासियांना पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येवून महाराष्ट्र बंद करून दाखवावा असे आवाहन माजी आमदार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले.हजाराहून अधिक सीमावासियांनी सोमवारी रॅलीने कोल्हापुरात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. त्यावेळी किणेकर बोलत होते. यावेळी कोल्हापूरमधील सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवत या आंदोलनाला पाठिंबा दिला. भगवे फेटे बांधून आलेल्या सीमावासियांसह कोल्हापूरच्या नागरिकांनी यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.किणेकर म्हणले, कर्नाटक सरकारने आमचा महामेळावा हाणून पाडला. बेळगावमध्ये ते आम्हांला काहीही करू देणार नाहीत. तरूण पीढीला या लढ्याशी आम्हांला जोडून घ्यायचे होते. महाराष्ट्रात पुन्हा सीमाप्रश्न जागवण्यासाठी कोल्हापुरातून सुरूवात करण्याची गरज असल्याने येथे आलो.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अमित शहा यांच्यादेखत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत ठणकावून सांगितले आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक झाल्यानंतर आम्हांला येथून इशारा द्यावा लागला होता. खासदार संजय मंडलिक म्हणाले, सीमाप्रश्न आता नवीन पीढीने हातात घेतला आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रदेश केंद्रशासित करावा. यावेळी माजी मंत्री भरमूआण्ण्णा पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार राजीव आवळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिंदे गटाचे सुजित चव्हाण यांची भाषणे झाली. आंदोलनाआधी भगवे झेंडे लावलेल्या वाहनांसह सीमावासिय कोल्हापुरात आले. कागल नाक्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. तेथून कोल्हापुरात दसरा चौकात शाहू महाराजांना अभिवादन करून सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी आंदोलनानंतर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर, समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सूंठकर, सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेदार यांच्यासह मोठ्या संख्येने सीमाबांधव उपस्थित होते.‘त्यांच्या’ प्रचाराला तेवढे कोण येवू नकामनोहर किणेकर म्हणाले, पूर्वी आमच्या प्रचाराला येणारे आता बेळगावमध्ये आपल्या पक्षाच्या प्रचाराला येत आहेत. अशा नेत्यांच्या कर्नाटकमधील पक्षाने हा भाग महाराष्ट्राला देण्याचे वचन जाहीरनाम्यात द्यावे आम्ही कोणीही निवडणूक लढवत नाही. परंतू बेळगावच्या तीन आणि खानापूरची एक अशा चार जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जिंकणार आहोत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक