शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

भाजप-ताराराणीच्या अजेंड्यात ‘श्रीमंत कोल्हापूर’

By admin | Updated: October 20, 2015 00:15 IST

‘अमृत योजनेतून महापालिका सक्षम करणार : जाहीरनाम्यातील प्रत्येक गोेष्ट व्यवहारात आणणार : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : महापालिकेचे केंद्र, राज्य व स्वनिधी या तीन स्तरांवर विकासाचे मॉडेल तयार केले असून, शहराचे प्रलंबित प्रश्न तत्परतेने प्रशासनासमोर मांडून ते निर्गत करणार आहे. आगामी पाच वर्षांत जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट व्यवहारात आणून ‘श्रीमंत कोल्हापूर’ करणारच; पण त्याबरोबर येथील सामान्य माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत करणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. महापालिका निवडणुकीसाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, शहरातील सोयी-सुविधांअभावी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकाला कोल्हापुरात दोन दिवस थांबावे असे वाटत नाही. यासाठी रंकाळा तलाव, पंचगंगा घाट, आदी पर्यटनस्थळे विकसित करावी लागणार आहेत. त्याचा आराखडा आम्ही तयार केला आहे. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला चांगले मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी मोठे मॉल उभे केले जाणार आहेत. तरुणांच्या हाताला काम द्यायचे झाल्यास येथील उद्योगधंदे अधिक सक्षम झाले पाहिजेत. उद्योगधंदे वाढण्यासाठी विमानसेवा हा महत्त्वाचा घटक असून, येत्या दोन महिन्यांत खासगी विमानसेवा कोल्हापुरातून सुरू होणार आहे. आगामी आठ-नऊ महिन्यांत विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी विमानेही येथे कशी येतील, त्यादृष्टीने आम्ही नियोजन केले आहे.कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प तयार आहे, सत्तेवर आल्यानंतर वीज निर्मितीतील १/४ वीज महापालिकेला मिळणार आहे. त्यातून स्ट्रीट लाईटचे दोन कोटी वाचणार आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीला देता येईल, सौरऊर्जाचा वापर महापालिका इमारती, कार्यालयात केला जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाल्यास ‘कोल्हापूर श्रीमंत’ होण्यास वेळ लागणार नाही. केंद्र व राज्यात सरकार आहे, त्याच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जाणार आहेत. वाय-फाय शहराबाबत एका कंपनीशी चर्चाही झाली आहे. आम्ही कोल्हापूरच्या जनतेला दिलेली आश्वासने ही कागदावर राहणार नाहीत. ती पूर्णत्वास नेण्यासाठी वचनबद्ध आहे. उपनगरांत दोनशे कॉटच्या हॉस्पिटलचा प्लॅन तयार आहे. आम्ही केवळ हवेतील बोलत नाही, त्याच्यासाठी कोणत्या ट्रस्टला जबाबदारी द्यायची यासह प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ आचारसंहिता असल्याने काही घोषणा करता येत नसल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. हद्दवाढीबाबत संबंधित गावांना विश्वासात घेऊन प्रबोधनातून विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडिक, ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, सुनील कदम, सत्यजित कदम, भगवान काटे, उत्तम कांबळे, सुहास लटोरे, सुनील मोदी उपस्थित होते. विरोधकांच्याबुद्धीची कीवपालकमंत्री प्रचारात उतरणार नाहीत, अशी टूमही उठविली आहे; पण दिवसाला तीस कॉलनीमध्ये आपण प्रचार फेऱ्या पूर्ण करीत आहे. ‘स्मार्ट सिटी’ची निवड पारदर्शक झाली आहे. वास्तविक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी निकषांत बसण्यासाठी ज्या गोष्टी करणे अपेक्षित होते ते केले नाही. त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडले जात आहे. ‘स्मार्ट सिटी’बाबत विरोधकांच्या बुद्धीची कीव येत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.हे करणार‘स्मार्ट सिटी’त सहभागासाठी प्रयत्नकेंद्राच्या ‘अमृत’ योजनेतून मूलभूत सुविधांसाठी प्रत्येक वर्षी एक हजार कोटीरंकाळा, पंचगंगा घाटासह पर्यटन विकसित करणेमेडिकल टुरिझम विकसित करणे‘झोपडपट्टी मुक्त शहर’ व ‘गार्डन शहर’ म्हणून ओळख करणारस्वच्छ व मुबलक पाणीविविध जागांचा गरजेनुसार ‘बीओटी’वर विकसित करणार शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार कचऱ्यापासून वीज निर्मितीसांडपाण्याचा पुनर्वापर