शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपला झिडकारले

By admin | Updated: July 6, 2016 00:28 IST

आगामी निवडणुकांत कस लागणार : बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान

संदीप बावचे -- जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीने भाजपप्रणित श्री दत्त विकास आघाडीवर एकतर्फी विजय मिळवित तालुक्यातील सर्वच गटांनी आपली एकत्रित ताकद सिध्द केली आहे. तर केंद्र व राज्यातील सत्तेचा टेंभा मिरवत तालुक्यात वर्चस्वाचा आव आणणाऱ्या भाजप व नेतृत्वाला मतदारांनीच झिडकारल्याने त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.बाजार समिती आर्थिक अडचणीत असल्याने या बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्ष-गट तर एकत्र आले. तालुक्यातील सहकार, ग्रामपंचायत व राजकीय वर्चस्वावरून ज्या त्या गटाला जागा वाटपातून न्याय देण्यासाठी शिरोळ दत्त साखर कारखान्यावर बैठक झाली. या समितीसाठीच्या मतदारांत अत्यल्प संख्या असलेल्या भाजपलाही सत्तेतील पक्ष असल्याने दोन जागांवर निर्णयही झाला मात्र, केंद्रात व राज्यात सरकार असताना व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे पणन खाते असतानाही केवळ दोन जागा तालुक्यातील नेतृत्व करणाऱ्या मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी मान्य न केल्याने निवडणूक लागली. त्यामुळे यड्रावकर, सा. रे. पाटील गट, स्वाभिमानी, शिवसेना एकत्र येऊन भाजपप्रणित दत्त विकास आघाडीच्या विरोधात लढत लागली. वास्तविक तालुक्यात यड्रावकर, सा. रे. पाटील गट, स्वाभिमानी संघटना यांचेच ग्रामपंचायत, सेवा संस्थेत वर्चस्व आहे. उलट भाजपचे मतदार केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असतानाही भाजप व मोदींच्या नावावर बाजार समितीत चमत्कार करण्याचा आघाडी नेत्यांचा आत्मविश्वास पोकळ ठरला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपला स्थिरस्थावर करण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. असे असले तरी बाजार समितीत सध्या अनेक प्रश्नांची मालिका सुरू आहे. त्यासाठी सत्ताधारी आघाडीने बाजार समितीचा चेहरामोहरा बदलून तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तालुक्यात भाजप पक्षाचा प्रभाव कमी असला तरी खासदार, आमदार, कारखान्यांचे अध्यक्ष व स्थानिक नेतेमंडळींच्या आव्हानाला प्रती आव्हान देत भाजप पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना यश आले नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने डॉ.संजय पाटील यांचा अनेक वर्षांनंतर तालुक्याशी संपर्क आला. दोन्ही पॅनेलमध्ये सुमारे एक हजार ते बाराशे मतांचा फरक असला तरी या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांना भाजप पक्षाच्या प्रचाराची संधी मिळाली.