शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

सत्तेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपला झिडकारले

By admin | Updated: July 6, 2016 00:28 IST

आगामी निवडणुकांत कस लागणार : बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान

संदीप बावचे -- जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीने भाजपप्रणित श्री दत्त विकास आघाडीवर एकतर्फी विजय मिळवित तालुक्यातील सर्वच गटांनी आपली एकत्रित ताकद सिध्द केली आहे. तर केंद्र व राज्यातील सत्तेचा टेंभा मिरवत तालुक्यात वर्चस्वाचा आव आणणाऱ्या भाजप व नेतृत्वाला मतदारांनीच झिडकारल्याने त्यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.बाजार समिती आर्थिक अडचणीत असल्याने या बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्ष-गट तर एकत्र आले. तालुक्यातील सहकार, ग्रामपंचायत व राजकीय वर्चस्वावरून ज्या त्या गटाला जागा वाटपातून न्याय देण्यासाठी शिरोळ दत्त साखर कारखान्यावर बैठक झाली. या समितीसाठीच्या मतदारांत अत्यल्प संख्या असलेल्या भाजपलाही सत्तेतील पक्ष असल्याने दोन जागांवर निर्णयही झाला मात्र, केंद्रात व राज्यात सरकार असताना व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे पणन खाते असतानाही केवळ दोन जागा तालुक्यातील नेतृत्व करणाऱ्या मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी मान्य न केल्याने निवडणूक लागली. त्यामुळे यड्रावकर, सा. रे. पाटील गट, स्वाभिमानी, शिवसेना एकत्र येऊन भाजपप्रणित दत्त विकास आघाडीच्या विरोधात लढत लागली. वास्तविक तालुक्यात यड्रावकर, सा. रे. पाटील गट, स्वाभिमानी संघटना यांचेच ग्रामपंचायत, सेवा संस्थेत वर्चस्व आहे. उलट भाजपचे मतदार केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असतानाही भाजप व मोदींच्या नावावर बाजार समितीत चमत्कार करण्याचा आघाडी नेत्यांचा आत्मविश्वास पोकळ ठरला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपला स्थिरस्थावर करण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा बाजार समितीवर वर्चस्व सिद्ध केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. असे असले तरी बाजार समितीत सध्या अनेक प्रश्नांची मालिका सुरू आहे. त्यासाठी सत्ताधारी आघाडीने बाजार समितीचा चेहरामोहरा बदलून तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. तालुक्यात भाजप पक्षाचा प्रभाव कमी असला तरी खासदार, आमदार, कारखान्यांचे अध्यक्ष व स्थानिक नेतेमंडळींच्या आव्हानाला प्रती आव्हान देत भाजप पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना यश आले नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने डॉ.संजय पाटील यांचा अनेक वर्षांनंतर तालुक्याशी संपर्क आला. दोन्ही पॅनेलमध्ये सुमारे एक हजार ते बाराशे मतांचा फरक असला तरी या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांना भाजप पक्षाच्या प्रचाराची संधी मिळाली.