शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

मिशन मुख्यमंत्री! भाजपची स्वतंत्र लढण्याची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:08 IST

पश्चिम महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या असंतुष्टांवर लक्ष केंद्रित

वसंत भोसले 

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युती करून आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याची भाषा करीत असला तरी निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत सक्षम उमेदवार मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार आखणी केली असून, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या असंतुष्टांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.गेल्या वेळी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी केवळ तेवीस जागा कमी पडल्या. काही अपक्ष आणि सहकारी पक्षांसह ही संख्या १३२वर गेली होती, तरीदेखील बहुमतासाठी १३ जागा कमी पडल्याने अखेर शिवसेनेशी आपल्या शर्र्थींवर युती करून पाच वर्षे सरकारने कार्यकाल पुरा केला.

मधल्याकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढवित भाजपने राज्यातील सर्वांत मोठा पक्ष झाल्याचा दावा खरा करून दाखविला. चौदा महापालिका, नगरपालिका आणि निम्म्या जिल्हा परिषदांवर तडजोडी करीत सत्ता आणली. यादरम्यान शिवसेनेशी सातत्याने शाब्दिक संघर्ष होत राहिला, पण युती तुटली नाही. लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करताच भाजपने शिवसेनेशी युती केली आणि पुन्हा घवघवीत यश मिळविले. लोकसभेत स्पष्ट बहुमतासह २१ जादा जागा पटकाविल्या.लोकसभेतील यश, मोदींची प्रतिमा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण केलेल्या कार्यकालावर भाजपचाच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे जाहीर करून शिवसेनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याची तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजप प्रथम क्रमांकावर असला तरी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बळ, होणारी आघाडी पाहता प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार शोधण्याची मोहीम गेली वर्षभर जोरात राबविण्यात आली आहे. केवळ एका उमेदवारावर अवलंबून न राहता, अनेक मतदारसंघांत पर्यायी उमेदवारही तयार केले आहेत. पाच वर्षांच्या अखेरीस अनेक महामंडळांची अध्यक्षपदे तसेच त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन बळ दिले आहे. भाजपचे संघटन कमकुवत असलेल्या मतदारसंघात कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा सक्षम कार्यकर्ता, आमदार यांना पक्षात घेण्याची मोहीमच उघडली आहे. शिवाय अनेक विकासकामांची उद्घाटने करणे, आश्वासने देणे, प्रसंगी संभाव्य उमेदवाराला आर्थिक बळ देण्याची तयारीही केली आहे. त्यामुळे भाजपची ही सर्व वाटचाल स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची आहे, हे स्पष्ट होते. भाजपच्या तुलनेत शिवसेना आणि कॉँग्रेसची तयारी कमी आहे. राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र, त्यांचे अनेक आमदार नाराज होऊन भाजपच्या वाटेवर आहेत. शिवाय कॉँग्रेसचेही काहीजण गळाला लागण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्राचे पक्षीय बलाबलजिल्हा एकूण जागा भाजप सेना काँग्रेस राष्ट्रवादी इतरपुणे २१ १३ ४ १ ३ -सोलापूर ११ २ १ ३ ४ १सातारा ८ ० १ २ ५ -सांगली ८ ४ १ १ २ -कोल्हापूर १० २ ६ - २ -एकूण ५८ २१ १३ ७ १६ १३ जिल्ह्यांत ४ आमदारपुणे शहर आणि जिल्ह्यात मिळालेल्या यशाच्या जोरावर भाजप सध्या पश्चिम महाराष्ट्रातही प्रथम क्रमांकावर आहे. सध्या त्यांचे २१ आमदार आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे सोळा, शिवसेनेचे तेरा, तर कॉँग्रेसचे केवळ सात आमदार आहेत. भाजपने कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सातारा जिल्ह्यात एकही आमदार नाही.

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील