शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

मिशन मुख्यमंत्री! भाजपची स्वतंत्र लढण्याची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:08 IST

पश्चिम महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या असंतुष्टांवर लक्ष केंद्रित

वसंत भोसले 

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युती करून आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याची भाषा करीत असला तरी निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत सक्षम उमेदवार मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार आखणी केली असून, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या असंतुष्टांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.गेल्या वेळी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी केवळ तेवीस जागा कमी पडल्या. काही अपक्ष आणि सहकारी पक्षांसह ही संख्या १३२वर गेली होती, तरीदेखील बहुमतासाठी १३ जागा कमी पडल्याने अखेर शिवसेनेशी आपल्या शर्र्थींवर युती करून पाच वर्षे सरकारने कार्यकाल पुरा केला.

मधल्याकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढवित भाजपने राज्यातील सर्वांत मोठा पक्ष झाल्याचा दावा खरा करून दाखविला. चौदा महापालिका, नगरपालिका आणि निम्म्या जिल्हा परिषदांवर तडजोडी करीत सत्ता आणली. यादरम्यान शिवसेनेशी सातत्याने शाब्दिक संघर्ष होत राहिला, पण युती तुटली नाही. लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करताच भाजपने शिवसेनेशी युती केली आणि पुन्हा घवघवीत यश मिळविले. लोकसभेत स्पष्ट बहुमतासह २१ जादा जागा पटकाविल्या.लोकसभेतील यश, मोदींची प्रतिमा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण केलेल्या कार्यकालावर भाजपचाच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे जाहीर करून शिवसेनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याची तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजप प्रथम क्रमांकावर असला तरी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बळ, होणारी आघाडी पाहता प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार शोधण्याची मोहीम गेली वर्षभर जोरात राबविण्यात आली आहे. केवळ एका उमेदवारावर अवलंबून न राहता, अनेक मतदारसंघांत पर्यायी उमेदवारही तयार केले आहेत. पाच वर्षांच्या अखेरीस अनेक महामंडळांची अध्यक्षपदे तसेच त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन बळ दिले आहे. भाजपचे संघटन कमकुवत असलेल्या मतदारसंघात कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा सक्षम कार्यकर्ता, आमदार यांना पक्षात घेण्याची मोहीमच उघडली आहे. शिवाय अनेक विकासकामांची उद्घाटने करणे, आश्वासने देणे, प्रसंगी संभाव्य उमेदवाराला आर्थिक बळ देण्याची तयारीही केली आहे. त्यामुळे भाजपची ही सर्व वाटचाल स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची आहे, हे स्पष्ट होते. भाजपच्या तुलनेत शिवसेना आणि कॉँग्रेसची तयारी कमी आहे. राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र, त्यांचे अनेक आमदार नाराज होऊन भाजपच्या वाटेवर आहेत. शिवाय कॉँग्रेसचेही काहीजण गळाला लागण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्राचे पक्षीय बलाबलजिल्हा एकूण जागा भाजप सेना काँग्रेस राष्ट्रवादी इतरपुणे २१ १३ ४ १ ३ -सोलापूर ११ २ १ ३ ४ १सातारा ८ ० १ २ ५ -सांगली ८ ४ १ १ २ -कोल्हापूर १० २ ६ - २ -एकूण ५८ २१ १३ ७ १६ १३ जिल्ह्यांत ४ आमदारपुणे शहर आणि जिल्ह्यात मिळालेल्या यशाच्या जोरावर भाजप सध्या पश्चिम महाराष्ट्रातही प्रथम क्रमांकावर आहे. सध्या त्यांचे २१ आमदार आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे सोळा, शिवसेनेचे तेरा, तर कॉँग्रेसचे केवळ सात आमदार आहेत. भाजपने कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सातारा जिल्ह्यात एकही आमदार नाही.

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील