शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मिशन मुख्यमंत्री! भाजपची स्वतंत्र लढण्याची तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 06:08 IST

पश्चिम महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या असंतुष्टांवर लक्ष केंद्रित

वसंत भोसले 

कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युती करून आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याची भाषा करीत असला तरी निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत सक्षम उमेदवार मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार आखणी केली असून, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या असंतुष्टांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.गेल्या वेळी मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी केवळ तेवीस जागा कमी पडल्या. काही अपक्ष आणि सहकारी पक्षांसह ही संख्या १३२वर गेली होती, तरीदेखील बहुमतासाठी १३ जागा कमी पडल्याने अखेर शिवसेनेशी आपल्या शर्र्थींवर युती करून पाच वर्षे सरकारने कार्यकाल पुरा केला.

मधल्याकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढवित भाजपने राज्यातील सर्वांत मोठा पक्ष झाल्याचा दावा खरा करून दाखविला. चौदा महापालिका, नगरपालिका आणि निम्म्या जिल्हा परिषदांवर तडजोडी करीत सत्ता आणली. यादरम्यान शिवसेनेशी सातत्याने शाब्दिक संघर्ष होत राहिला, पण युती तुटली नाही. लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करताच भाजपने शिवसेनेशी युती केली आणि पुन्हा घवघवीत यश मिळविले. लोकसभेत स्पष्ट बहुमतासह २१ जादा जागा पटकाविल्या.लोकसभेतील यश, मोदींची प्रतिमा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण केलेल्या कार्यकालावर भाजपचाच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे जाहीर करून शिवसेनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याची तयारी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजप प्रथम क्रमांकावर असला तरी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बळ, होणारी आघाडी पाहता प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार शोधण्याची मोहीम गेली वर्षभर जोरात राबविण्यात आली आहे. केवळ एका उमेदवारावर अवलंबून न राहता, अनेक मतदारसंघांत पर्यायी उमेदवारही तयार केले आहेत. पाच वर्षांच्या अखेरीस अनेक महामंडळांची अध्यक्षपदे तसेच त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन बळ दिले आहे. भाजपचे संघटन कमकुवत असलेल्या मतदारसंघात कॉँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा सक्षम कार्यकर्ता, आमदार यांना पक्षात घेण्याची मोहीमच उघडली आहे. शिवाय अनेक विकासकामांची उद्घाटने करणे, आश्वासने देणे, प्रसंगी संभाव्य उमेदवाराला आर्थिक बळ देण्याची तयारीही केली आहे. त्यामुळे भाजपची ही सर्व वाटचाल स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची आहे, हे स्पष्ट होते. भाजपच्या तुलनेत शिवसेना आणि कॉँग्रेसची तयारी कमी आहे. राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र, त्यांचे अनेक आमदार नाराज होऊन भाजपच्या वाटेवर आहेत. शिवाय कॉँग्रेसचेही काहीजण गळाला लागण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्राचे पक्षीय बलाबलजिल्हा एकूण जागा भाजप सेना काँग्रेस राष्ट्रवादी इतरपुणे २१ १३ ४ १ ३ -सोलापूर ११ २ १ ३ ४ १सातारा ८ ० १ २ ५ -सांगली ८ ४ १ १ २ -कोल्हापूर १० २ ६ - २ -एकूण ५८ २१ १३ ७ १६ १३ जिल्ह्यांत ४ आमदारपुणे शहर आणि जिल्ह्यात मिळालेल्या यशाच्या जोरावर भाजप सध्या पश्चिम महाराष्ट्रातही प्रथम क्रमांकावर आहे. सध्या त्यांचे २१ आमदार आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे सोळा, शिवसेनेचे तेरा, तर कॉँग्रेसचे केवळ सात आमदार आहेत. भाजपने कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सातारा जिल्ह्यात एकही आमदार नाही.

टॅग्स :BJPभाजपाvidhan sabhaविधानसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील