शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कागलच्या राजकारणात ट्विस्ट! समरजित घाटगे गेले कुणीकडे, भूमिकेविषयी जिल्ह्यात उत्सुकता

By समीर देशपांडे | Updated: July 4, 2023 12:45 IST

सोशल पोस्टपासून बातम्याबाबतही जागरूक असलेले घाटगे या घडामोडींबद्दल काहीच बोलत नसल्याने तर्कवितर्क

समीर देशपांडेकोल्हापूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कागल मतदारसंघातील उमेदवारीचे भक्कम दावेदार समरजित घाटगे नेमके गेले कुणीकडे, असा सवाल विचारला जात आहे. कारण हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा ठावाठिकाणाच कोणी अधिकृत सांगत नसून ते फोनही घेत नाहीत. व्हॉट्सॲपवरील मेसेजलाही ते उत्तर देत नाहीत. चंदगडच्या उमेदवारीचे दावेदार भाजपचे शिवाजी पाटील हे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले आहेत.गेल्या विधानसभेला अपक्ष समरजित घाटगे यांनी कडवी टक्कर देत मुश्रीफ यांना जेरीस आणले होते. पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी दुसऱ्या दिवसापासून पायाला भिंगरी लावली. मतदारसंघातील अनेक गावे त्यांनी चार वर्षांत पालथी घातली. मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न मांडत राहिले, मुश्रीफ महाविकास आघाडीत मंत्री असतानाही त्यांना घाटगे यांनी अंगावर घेतले.संपर्क, जोडीला गेल्या वर्षभरात आणलेला निधी, सोशल मीडिया, छोट्या छाेट्या जोडण्या या सगळ्यांमध्ये घाटगे कोठेही कमी पडत नव्हते. परंतु, दिल्लीच्या पातळीवरचा निर्णय रविवारी मुंबईत अंमलात आला आणि मुश्रीफच आता कॅबिनेट मंत्रिपद घेऊन करवीर नगरीत येणार आहेत. समरजित यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे. रविवारी ते कोल्हापूरमध्येच असल्याचे सांगण्यात येते. कारण निपाणीचे जोल्ले दाम्पत्याने रविवारी घरी भेट दिल्याचे फोटो त्यांनीच फेसबुकवरून शेअर केले आहेत. परंतु, या मोठ्या उलथापालथीनंतर समरजित यांचा माध्यमांशी संपर्कच झालेला नाही. सोशल पोस्टपासून बातम्याबाबतही जागरूक असलेले घाटगे या घडामोडींबद्दल काहीच बोलत नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. ते भाजपचा राजीनामा देणार अशीही चर्चा सोशल मीडियावर कालपासून चर्चेत आहे.

समरजित यांच्यासमोरील पर्याय

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून भावी उज्ज्वल भवितव्य आहे असा आशावाद ठेवून भाजपमध्येच राहणे.
  • वेळ पडल्यास पक्षाच्या विरोधात बंड
  • घाटगे हे लगेचच पक्षाविरोधात भूमिका घेणार नाहीत असे दिसते. पक्षाच्या विरोधात गेल्यानंतर मंडलिक आणि मुश्रीफ एकत्र राहिले तर त्यातून घाटगे यांना कोणताच फायदा नाही. त्यामुळे ‘थांबा व पाहा’ अशीच त्यांची सध्याची भूमिका.

शिवाजीरावांचे पक्षकार्य राहणार सुरूचशिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अक्कलकोटला आल्याचे सांगितले. ते म्हणाले, काहीही बदल घडले असले तरी माझ्या पक्षाचे काम तालुक्यात करू नको असे मला कोणीच म्हणणार नाही. त्यामुळे मी चंदगड तालुक्यात पक्षकार्य करतच राहणार.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणkagal-acकागलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे