शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कागलच्या राजकारणात ट्विस्ट! समरजित घाटगे गेले कुणीकडे, भूमिकेविषयी जिल्ह्यात उत्सुकता

By समीर देशपांडे | Updated: July 4, 2023 12:45 IST

सोशल पोस्टपासून बातम्याबाबतही जागरूक असलेले घाटगे या घडामोडींबद्दल काहीच बोलत नसल्याने तर्कवितर्क

समीर देशपांडेकोल्हापूर : भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कागल मतदारसंघातील उमेदवारीचे भक्कम दावेदार समरजित घाटगे नेमके गेले कुणीकडे, असा सवाल विचारला जात आहे. कारण हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा ठावाठिकाणाच कोणी अधिकृत सांगत नसून ते फोनही घेत नाहीत. व्हॉट्सॲपवरील मेसेजलाही ते उत्तर देत नाहीत. चंदगडच्या उमेदवारीचे दावेदार भाजपचे शिवाजी पाटील हे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेले आहेत.गेल्या विधानसभेला अपक्ष समरजित घाटगे यांनी कडवी टक्कर देत मुश्रीफ यांना जेरीस आणले होते. पराभव झाल्यानंतर मात्र त्यांनी दुसऱ्या दिवसापासून पायाला भिंगरी लावली. मतदारसंघातील अनेक गावे त्यांनी चार वर्षांत पालथी घातली. मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न मांडत राहिले, मुश्रीफ महाविकास आघाडीत मंत्री असतानाही त्यांना घाटगे यांनी अंगावर घेतले.संपर्क, जोडीला गेल्या वर्षभरात आणलेला निधी, सोशल मीडिया, छोट्या छाेट्या जोडण्या या सगळ्यांमध्ये घाटगे कोठेही कमी पडत नव्हते. परंतु, दिल्लीच्या पातळीवरचा निर्णय रविवारी मुंबईत अंमलात आला आणि मुश्रीफच आता कॅबिनेट मंत्रिपद घेऊन करवीर नगरीत येणार आहेत. समरजित यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे. रविवारी ते कोल्हापूरमध्येच असल्याचे सांगण्यात येते. कारण निपाणीचे जोल्ले दाम्पत्याने रविवारी घरी भेट दिल्याचे फोटो त्यांनीच फेसबुकवरून शेअर केले आहेत. परंतु, या मोठ्या उलथापालथीनंतर समरजित यांचा माध्यमांशी संपर्कच झालेला नाही. सोशल पोस्टपासून बातम्याबाबतही जागरूक असलेले घाटगे या घडामोडींबद्दल काहीच बोलत नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. ते भाजपचा राजीनामा देणार अशीही चर्चा सोशल मीडियावर कालपासून चर्चेत आहे.

समरजित यांच्यासमोरील पर्याय

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून भावी उज्ज्वल भवितव्य आहे असा आशावाद ठेवून भाजपमध्येच राहणे.
  • वेळ पडल्यास पक्षाच्या विरोधात बंड
  • घाटगे हे लगेचच पक्षाविरोधात भूमिका घेणार नाहीत असे दिसते. पक्षाच्या विरोधात गेल्यानंतर मंडलिक आणि मुश्रीफ एकत्र राहिले तर त्यातून घाटगे यांना कोणताच फायदा नाही. त्यामुळे ‘थांबा व पाहा’ अशीच त्यांची सध्याची भूमिका.

शिवाजीरावांचे पक्षकार्य राहणार सुरूचशिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अक्कलकोटला आल्याचे सांगितले. ते म्हणाले, काहीही बदल घडले असले तरी माझ्या पक्षाचे काम तालुक्यात करू नको असे मला कोणीच म्हणणार नाही. त्यामुळे मी चंदगड तालुक्यात पक्षकार्य करतच राहणार.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणkagal-acकागलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे