शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:26 IST

गडहिंग्लज : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा शेतकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. त्यामुळे देशात कृषी व बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तुटपुंजी कर्जमाफी आणि रोजगार निर्मिती करून शेतकरी आणि बेरोजगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.ऐनापूर (ता. गडहिंंग्लज) ...

गडहिंग्लज : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा शेतकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. त्यामुळे देशात कृषी व बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तुटपुंजी कर्जमाफी आणि रोजगार निर्मिती करून शेतकरी आणि बेरोजगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.ऐनापूर (ता. गडहिंंग्लज) येथे शेतकरी मेळावा आणि सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील होते. यावेळी यशवंत सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंच दिग्विजय कुराडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा सत्कार झाला.चव्हाण म्हणाले, काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने एकरकमी ७२ हजार कोटींची कर्जमाफी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा दिला होता. मात्र, ३४ हजार कोटींची कर्जे माफ केल्याचे सांगणाºया भाजप सरकारकडून शेतकºयांना अद्याप १० ते १२ कोटीही मिळालेले नाहीत. वर्षाला दोन कोटी नवीन नोकºया निर्माण करण्याची घोषणा केलेल्या सरकारने १० लाख नोकºयादेखील निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे खोटी आश्वासने दिलेल्या सरकारला शेतकरी व युवकच खाली खेचतील.आमदार पाटील म्हणाले, यशवंत ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळविलेल्या ऐनापूर ग्रामपंचायतीचे काम अन्य गावांनाही प्रेरणादायी असून, गावच्या विकासासाठी १० लाखांचा निधी देत आहे.सरपंच कुराडे यांनी स्वागत केले. काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कुराडे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी चौगुले व सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यास काँगे्रसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील, किसनराव कुराडे, जे. बी. बार्देस्कर, जयप्रकाश नलवडे, जयवंत शिंपी, राजेश नरसिंगराव पाटील, बसवराज आजरी, बाबासाहेब पाटील, अनिल कुराडे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.