शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

चौकटबद्ध विचार बदलल्यास मोठ्या संधी -- चेतन नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 7:58 PM

मुळात आपणच आपल्यावर लादून घेतलेली अनेक बंधने आहेत. ती बाजूला करून व्यापक विचार करण्याची सवय कोल्हापूरने लावून घेतली आहे. - चेतन नरके

ठळक मुद्दे तसे युवक मिळाल्यास मी त्यांना संधी देऊ शकतो.म्हणूनच मानसिकता बदलण्याची गरज आहे.

समीर देशपांडे।गेली २० वर्षे विविध देशांमध्ये राहून मार्केटिंगचे काम करणारे चेतन नरके गेल्या वर्षी कोल्हापुरात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, संधी यांचा अभ्यास असणारे नरके यांनी शेतीमध्ये लक्ष घातले आहे. कोल्हापूरची जी बलस्थाने आहेत, त्यांवरच काम केल्यास चांगले भवितव्य असल्याची भूमिका असणाऱ्या चेतन नरके यांच्याशी संवाद.

प्रश्न : आपली शैक्षणिक कारकिर्द कशी घडली?उत्तर : मी शिवाजी पेठेत राहणारा. एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण, न्यू कॉलेजमधून बारावी सायन्स झाल्यानंतर ‘केआयटी’मधून बी.ई. प्रॉडक्शनचं पूर्ण केले. शिकागो येथून आयआयटी कॉलेजमधून एम. एस. कॉम्प्युटर सायन्सची पदवी संपादन केली. नंतर न्यूयॉर्क, लंडन येथून कॉम्प्युटर सायन्स आणि ‘एम.बी.ए.’चे शिक्षण पूर्ण केले. 

प्रश्न : आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात कशी झाली ?उत्तर : शिक्षणानंतर लगेचच मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी कामाची संधी मिळाली. मार्स इन्कॉर्पोरेशन या कंपनीच्या १० देशांच्या नेटवर्कचे काम माझ्याकडे होते. अमेरिकेतील मेड जॉन्सन न्यूट्रिशियन्स, ब्रिटनमधील रॅकेट बेनकिझन या कंपन्यांमधूनकाम करताना २५ हून अधिक देशांमधील बाजारपेठेचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली.

प्रश्न : पुन्हा कोल्हापुरात येण्याचा निर्णय कसा घेतला?उत्तर : माझे वडील अरुण नरके आज ७६ वर्षांचे आहेत. ‘गोकुळ’ प्रकल्पाच्या विकासामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. कोल्हापूरसाठी माझ्या ज्ञानाचा उपयोग करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्या इच्छेनुसारच मी गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मी कोल्हापुरात परतलो.

प्रश्न- नवे प्रयोग सुरू केलेत का?उत्तर- सहा एकरत डेकोरेटिव्ह पामची लागवड केली आहे. महाराष्ट्रामध्ये सुमारे २०० कोटींची झाडे केरळहून आणली जातात. कोल्हापुरातच या झाडांचे उत्पादन करून शेतकऱ्यांना रोपे पुरवून त्यांच्याकडून ती खरेदीच्या प्रकल्प सुरु केला आहे.ही बलस्थानेशेती,फौंड्री उद्योग, कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोल्हापूरला इतर देशांमध्ये काम करण्यास मोठा वाव आहे. आपली ही सर्व बलस्थाने आहेत. याच बलस्थानांचा वापर करून या संधी साधण्याची गरज आहे. आज जगभरातील हिºयाला पैलू पाडण्याच्या व्यवसायात ८० टक्के हिºयांना थायलंड किंवा भारतीय कामगाराचा हात लागलेला असतो. थायलंडमध्ये चांगले इंग्रजी शिकविणाºया शिक्षकांची गरज आहे. तसे युवक मिळाल्यास मी त्यांना संधी देऊ शकतो.मानसिकता बदलातेच-तेच मी किती वर्षे करीत बसणार आहात? ४० वर्षांपूर्वीच्या आमदारांना रस्ते, गटारी करण्याला प्राधान्य होते; आजही जर आमचे आमदार, खासदार रस्ते आणि गटारी करण्यामध्येच गुंतले तर मग वेगळे धोरणात्मक निर्णय घेऊन आपल्या जिल्हला पुढे कसे घेऊन जाणार? म्हणूनच मानसिकता बदलण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenglishइंग्रजी