शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डोंगरांतील आगींमुळे जैव संपत्तीचे मोठे नुकसान

By admin | Updated: March 25, 2016 23:37 IST

करवीरच्या तालुक्यातील प्रकार : वनस्पती, झाडे-झुडपे जळून खाक, प्राणी, पशुपक्षी यांचे जीवन धोक्यात

शिवराज लोंढे --सावरवाडी -सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असल्याने करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरांना आग लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. डोंगर पेटू लागल्याने नैसर्गिक, जैविक हानी होऊ लागली आहे. जंगली वनस्पती, झाडे-झुडपे, जंगली झाडे यांचे आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.ग्रामीण भागातील जंगलांना अज्ञात लोकांकडून आग लावण्याच्या प्रकारांचा जंगलसंपत्तीवर मोठ्या प्रमाणात आघात होऊ लागला आहे. डोंगर पेटविल्याने जंगली प्राणी, पशुपक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे. रात्री-अपरात्री अज्ञात लोकांकडून जंगलांना आग लावली जाते. ‘एकीकडे झाडे लावा, जंगल वाचवा’चा नारा दिला जातो, तर दुसरीकडे डोंगर पेटवून नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होते. ग्रामीण भागातील डोंगरी भागात पावसाळ्यात वैरणीसाठी गवताचा वापर केला जातो. उन्हाळ्यात जंगली राने पेटविली जातात. त्याचे कारण पावसाळ्यात गवत जादा येते. ही डोंगरी लोकांची खुळी समजूत आहे. जंगलांना आग लागल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. या आगीत जंगली झाडे, गवताच्या गंज्या, पशुपक्ष्यांचे नुकसान होते. जंगली प्रदेशातील पक्षांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. जंगली लांडगे, ससे, भेकर, साप, कोल्हे यांची संख्या कमी होऊ लागली. चिमण्या, कावळे, रानपक्षी यांना भक्ष्य मिळत नाही. पशुपक्षांची घरटीही या आगीत जळून खाक होतात. परिणामी, जंगली संपत्तीचे आपणच नुकसान करतो.मार्च-एप्रिल महिन्यांत ग्रामीण भागातील डोंगरांना आगी लावण्याचे प्रकार घडतात. एकीकडे हवेत वाढती उष्णता आणि दुसरीकडे रात्रीच्यावेळी जंगलांना आगी लावणे यामुळे नैसर्गिक जीवसृष्टी धोक्यात येऊ लागली आहे. डोंगरांना आग लागल्यामुळे सरपटणारे प्राणी मरतात. तसेच लहान-मोठी झाडे-झुडपे आगीत जळून जातात. त्यामुळे ‘जंगल वाचवा’ हा विचार नष्ट होतो. डोंगरांना आग लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते. त्यामुळे डोंगरी भागात गवत वाढण्याची क्षमता कमी होते. गवत कापणीनंतर डोंगरांना आगी लावून झाडे-झुडपे पेटवून देतात. त्यामुळे औषधी वनस्पती जळून जातात. पशुपक्ष्यांचा निवारा नष्ट होतो. परिणामी, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मोरांच्या घरट्यातील अंडीही आगीमुळे फुटली जातात. डोंगरी गावांना आग लावण्याच्या प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. त्यासाठी वन विभागाने गावागावांत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. आगीमुळे नैसर्गिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तरुणांनी पुढाकार घेऊन पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून लढा उभारावा.-बंटी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष.राज्य व केंद्र शासन जंगल वाचविण्यासाठी खूप प्रयत्न करते; पण समाजातील काही लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळत नाही. डोंगरांना आग लावण्याच्या प्रवृत्तीविरोधी कडक कारवाई होणे गरजेचे आहे. जंगले वाचविणे आवश्यक आहे.- राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य.