शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

भोगावती परिसर, हुपरीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:07 IST

‘भोगावती’मधून अडीच लाखांचा ऐवज लंपासलोकमत न्यूज नेटवर्कभोगावती : भोगावती, कौलव येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी विविध दूध संस्था आणि दुकानांना लक्ष्य करीत तब्बल अडीच लाखांवर ऐवज लंपास केला. भोगावती (ता. करवीर) येथील लुक्स गारमेंट या दुकानातील रोकडसह एक लाखाचा ऐवज लंपास केला. अभिषेक इलेक्ट्रॉनिकमधील सतरा हजार $रुपयांसह तीन एलईडी असा दीड ...

‘भोगावती’मधून अडीच लाखांचा ऐवज लंपासलोकमत न्यूज नेटवर्कभोगावती : भोगावती, कौलव येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी विविध दूध संस्था आणि दुकानांना लक्ष्य करीत तब्बल अडीच लाखांवर ऐवज लंपास केला. भोगावती (ता. करवीर) येथील लुक्स गारमेंट या दुकानातील रोकडसह एक लाखाचा ऐवज लंपास केला. अभिषेक इलेक्ट्रॉनिकमधील सतरा हजार $रुपयांसह तीन एलईडी असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी अन्य दोन दुकान फोडली. मात्र, काही मिळाले नाही, तर कौलव (ता. राधानगरी) येथे विठ्ठाई दूध संस्था, पिठाची चक्की व भोगावती येथील अजित चरापले यांच्या टायरचे दुकान, शिवशक्ती वॉच कंपनी ही दुकाने फोडली.हळदी, वाशीत चोºयासडोली (खालसा) : वाशी व हळदी (ता. करवीर) येथील बेकरीमालाचे व होलसेल किराणा माल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी बिस्कीट बॉक्स व इतर २७ हजारांच्या मालासह सुमारे वीस हजार रुपये लंपास केले. ही चोरी शनिवारी रात्री झाली असून, याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.अधिक माहिती अशी की, वाशी (ता. करवीर) येथील खंडेराव दिनकर कांबळे यांचे नंदवाळ फाटा येथे बेकरीमालाचे दुकान असून, शनिवारी भाऊबीज असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू होते. विक्री झालेले पाच हजार ड्रॉव्हरमध्ये ठेऊन त्यांनी रात्री दुकान बंद केले. रविवारी सकाळी एका कामगाराला दुकानाचे दार उचकटल्याचे लक्षात आले. त्याने लगेच कांबळे यांना घरी जाऊन हा प्रकार सांगितला. पाहणी करताना हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने या बेकरीमाल दुकानामधील महागडे बिस्कीट पुडे, आइस्क्रीम असा सात हजार रुपयांचा माल व पाच हजार रुपये लंपास केले.हळदी येथील राजू बाबूराव तेली यांच्या होलसेल किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून व कुलूप तोडून चोरट्याने काजू बिया, बदाम, वेलदोडे, बेदाणे असा वीस हजार रुपयांच्या मालासह दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. या दोन्हीही चोरीची नोंद करवीर पोलिसांत झाली असून, अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत.आणाजे, सिरसे येथे दूध संस्था फोडल्याआमजाई व्हरवडे : आणाजे, सिरसे (ता. राधानगरी) परिसरात चोरट्यांनी शनिवारी रात्री येथील दोन दूध संस्था व सिरसे येथील दूध संस्थेत डल्ला मारला. चोरट्यांनी रोख २५ हजार रुपये लंपास केले.आणाजे येथील इवराई सहकारी दूध संस्थेत चोरट्यांनी प्रवेश करून तिजोरीचे लॉक तोडून रोख २५ हजार पळविले. साहित्यांची मोडतोड करून साहित्य विस्कटले. त्यानंतर चोरट्यांनी येथील कामधेनू दूध संस्थेकडे मोर्चा वळविला. येथे तिजोरीचे लॉक तोडत असतानाच शेजारी मंदिरात झोपलेले ग्रामस्थ जागे झाले. ते बाहेर येताच चोरट्यांनी पळ काढला. सिरसे येथील मुख्य रस्त्यावर असणाºया शरदचंद्र सहकारी दूध संस्थेत तिजोरीचे लॉक तोडून चोरट्यांनी साहित्यांची मोडतोड करून साहित्य विस्कटले. या तिजोरीत काहीच मिळाले नाही. रविवारी सकाळी सात वाजता कर्मचारी दूध संकलनासाठी आले असता चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.आकनूर परिसरात १२ संस्थांसह घर फोडलेसरवडे/ सोळांकुर : राधानगरी तालुक्यातील आकनूर, सुळंबी, मांगेवाडी या गावांत चोरट्यांनी संस्था व बंद घरांना लक्ष्य केले. मात्र, दूध संस्थांनी दिवाळीपूर्वीच बोनस व रिबेट वाटप केल्याने चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही.आकनूरमधील घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे. चोरट्यांनी रविवारी रात्री मांगेवाडीतील रामलिंग दूध संस्था, सुळंबीतील श्रीराम दूध संस्था, आकनुरातील चाळकेश्वर दूध संस्था व हनुमान रेशनिंग दुकान, सेवा संस्थेचे गोडावून, आदी ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर मांगेवाडी रस्त्यावरील शिक्षक गणेश रंगराव चव्हाण यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ५० ते ६० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. आरोग्य विभागाचे कर्मचारी अनिता पाटील-माने व विक्रम पेडणेकर यांच्या घरी चोरीच प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात भीती पसरली आहे.पाच महिन्यांपूर्वीच्या चोºयांचा तपास नाहीचया परिसरात गेल्या पाच पाच महिन्यांपूर्वी चोरट्यांनी असाच धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यावेळीही चोरट्यांनी दुकान, दूध संस्थांनाच लक्ष्य केले होते. हे चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाताला लागले नाही. तोपर भाऊबीज संपताच चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त सुरू करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.