शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

भोगावती परिसर, हुपरीत चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:07 IST

‘भोगावती’मधून अडीच लाखांचा ऐवज लंपासलोकमत न्यूज नेटवर्कभोगावती : भोगावती, कौलव येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी विविध दूध संस्था आणि दुकानांना लक्ष्य करीत तब्बल अडीच लाखांवर ऐवज लंपास केला. भोगावती (ता. करवीर) येथील लुक्स गारमेंट या दुकानातील रोकडसह एक लाखाचा ऐवज लंपास केला. अभिषेक इलेक्ट्रॉनिकमधील सतरा हजार $रुपयांसह तीन एलईडी असा दीड ...

‘भोगावती’मधून अडीच लाखांचा ऐवज लंपासलोकमत न्यूज नेटवर्कभोगावती : भोगावती, कौलव येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी विविध दूध संस्था आणि दुकानांना लक्ष्य करीत तब्बल अडीच लाखांवर ऐवज लंपास केला. भोगावती (ता. करवीर) येथील लुक्स गारमेंट या दुकानातील रोकडसह एक लाखाचा ऐवज लंपास केला. अभिषेक इलेक्ट्रॉनिकमधील सतरा हजार $रुपयांसह तीन एलईडी असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी अन्य दोन दुकान फोडली. मात्र, काही मिळाले नाही, तर कौलव (ता. राधानगरी) येथे विठ्ठाई दूध संस्था, पिठाची चक्की व भोगावती येथील अजित चरापले यांच्या टायरचे दुकान, शिवशक्ती वॉच कंपनी ही दुकाने फोडली.हळदी, वाशीत चोºयासडोली (खालसा) : वाशी व हळदी (ता. करवीर) येथील बेकरीमालाचे व होलसेल किराणा माल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी बिस्कीट बॉक्स व इतर २७ हजारांच्या मालासह सुमारे वीस हजार रुपये लंपास केले. ही चोरी शनिवारी रात्री झाली असून, याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.अधिक माहिती अशी की, वाशी (ता. करवीर) येथील खंडेराव दिनकर कांबळे यांचे नंदवाळ फाटा येथे बेकरीमालाचे दुकान असून, शनिवारी भाऊबीज असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू होते. विक्री झालेले पाच हजार ड्रॉव्हरमध्ये ठेऊन त्यांनी रात्री दुकान बंद केले. रविवारी सकाळी एका कामगाराला दुकानाचे दार उचकटल्याचे लक्षात आले. त्याने लगेच कांबळे यांना घरी जाऊन हा प्रकार सांगितला. पाहणी करताना हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने या बेकरीमाल दुकानामधील महागडे बिस्कीट पुडे, आइस्क्रीम असा सात हजार रुपयांचा माल व पाच हजार रुपये लंपास केले.हळदी येथील राजू बाबूराव तेली यांच्या होलसेल किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून व कुलूप तोडून चोरट्याने काजू बिया, बदाम, वेलदोडे, बेदाणे असा वीस हजार रुपयांच्या मालासह दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. या दोन्हीही चोरीची नोंद करवीर पोलिसांत झाली असून, अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत.आणाजे, सिरसे येथे दूध संस्था फोडल्याआमजाई व्हरवडे : आणाजे, सिरसे (ता. राधानगरी) परिसरात चोरट्यांनी शनिवारी रात्री येथील दोन दूध संस्था व सिरसे येथील दूध संस्थेत डल्ला मारला. चोरट्यांनी रोख २५ हजार रुपये लंपास केले.आणाजे येथील इवराई सहकारी दूध संस्थेत चोरट्यांनी प्रवेश करून तिजोरीचे लॉक तोडून रोख २५ हजार पळविले. साहित्यांची मोडतोड करून साहित्य विस्कटले. त्यानंतर चोरट्यांनी येथील कामधेनू दूध संस्थेकडे मोर्चा वळविला. येथे तिजोरीचे लॉक तोडत असतानाच शेजारी मंदिरात झोपलेले ग्रामस्थ जागे झाले. ते बाहेर येताच चोरट्यांनी पळ काढला. सिरसे येथील मुख्य रस्त्यावर असणाºया शरदचंद्र सहकारी दूध संस्थेत तिजोरीचे लॉक तोडून चोरट्यांनी साहित्यांची मोडतोड करून साहित्य विस्कटले. या तिजोरीत काहीच मिळाले नाही. रविवारी सकाळी सात वाजता कर्मचारी दूध संकलनासाठी आले असता चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.आकनूर परिसरात १२ संस्थांसह घर फोडलेसरवडे/ सोळांकुर : राधानगरी तालुक्यातील आकनूर, सुळंबी, मांगेवाडी या गावांत चोरट्यांनी संस्था व बंद घरांना लक्ष्य केले. मात्र, दूध संस्थांनी दिवाळीपूर्वीच बोनस व रिबेट वाटप केल्याने चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही.आकनूरमधील घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे. चोरट्यांनी रविवारी रात्री मांगेवाडीतील रामलिंग दूध संस्था, सुळंबीतील श्रीराम दूध संस्था, आकनुरातील चाळकेश्वर दूध संस्था व हनुमान रेशनिंग दुकान, सेवा संस्थेचे गोडावून, आदी ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर मांगेवाडी रस्त्यावरील शिक्षक गणेश रंगराव चव्हाण यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून ५० ते ६० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. आरोग्य विभागाचे कर्मचारी अनिता पाटील-माने व विक्रम पेडणेकर यांच्या घरी चोरीच प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात भीती पसरली आहे.पाच महिन्यांपूर्वीच्या चोºयांचा तपास नाहीचया परिसरात गेल्या पाच पाच महिन्यांपूर्वी चोरट्यांनी असाच धुमाकूळ घालत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यावेळीही चोरट्यांनी दुकान, दूध संस्थांनाच लक्ष्य केले होते. हे चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाताला लागले नाही. तोपर भाऊबीज संपताच चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर या परिसरात पोलिसांनी रात्री गस्त सुरू करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.