शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

बालिंगा परिसरात भिशी सावकारकी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST

करवीर तालुक्यातील अनेक गावे शहराच्या सभोवती आहेत. यामुळे शेजारच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. काही भागांत शहराच्या उपनगरांचा ...

करवीर तालुक्यातील अनेक गावे शहराच्या सभोवती आहेत. यामुळे शेजारच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. काही भागांत शहराच्या उपनगरांचा समावेश झाला आहे. यामुळे नोकरी, उद्योग व मजुरीसाठी आलेले अनेक नागरिक उपनगर व शेजारच्या गावांत वास्तव्याला आहेत. या लोकांना आर्थिक अडचणीत बँका, पतसंस्था कर्जाला दारात उभा करून घेत नाहीत.

आर्थिक अडचणीच्या वेळी हे मोलमजुरी करणारे लोक लागणाऱ्या पैशाची सोय व्हावी या हेतूने भिशीमध्ये ५० रुपयांपासून शे-पाचशे रुपयांपर्यंत कुवतीनुसार गुंतवणूक करतात. अशा भिशी त्यांच्यासाठी आर्थिक आधार ठरत असल्या तरी भिशीच्या नावाखाली अशा अडल्या-नडलेल्यांकडून पैसे गोळा करायचेच आणि पैशाची मागणी वाढली की सावकारकीचा पैसा त्यात मुरवायचा अशी क्लृप्ती वापरली जाते. यातून पैशाच्या वसुलीसाठी आपोआपच दहशत व आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार घडताना दिसतात.

चौकट

: बालिंग्यातील सराफाचे परराज्यात पलायन

उपनगरात व शेजारच्या गावात अशा भिशी बिनदिक्कत चालविल्या जात असल्या तरी फसवणूक झाली तरी अडल्या-नडलेल्यांकडून सहसा तक्रारी केल्या जात नाहीत. मात्र, बालिंगा सराफ फसवणूक प्रकरणानंतर अशा भिशा पुन्हा चर्चेत आल्या. या सराफाने भिशीधारकांना छापील पासबुक दिली आहेत. बालिंग्यातील सराफ संतोष पोवाळकर विरोधात तक्रारदार पुढे येत असताना त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत; पण तो पत्नीसह परराज्यात फरार झाल्याची चर्चा आहे.