शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

बालिंगा परिसरात भिशी सावकारकी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST

करवीर तालुक्यातील अनेक गावे शहराच्या सभोवती आहेत. यामुळे शेजारच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. काही भागांत शहराच्या उपनगरांचा ...

करवीर तालुक्यातील अनेक गावे शहराच्या सभोवती आहेत. यामुळे शेजारच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. काही भागांत शहराच्या उपनगरांचा समावेश झाला आहे. यामुळे नोकरी, उद्योग व मजुरीसाठी आलेले अनेक नागरिक उपनगर व शेजारच्या गावांत वास्तव्याला आहेत. या लोकांना आर्थिक अडचणीत बँका, पतसंस्था कर्जाला दारात उभा करून घेत नाहीत.

आर्थिक अडचणीच्या वेळी हे मोलमजुरी करणारे लोक लागणाऱ्या पैशाची सोय व्हावी या हेतूने भिशीमध्ये ५० रुपयांपासून शे-पाचशे रुपयांपर्यंत कुवतीनुसार गुंतवणूक करतात. अशा भिशी त्यांच्यासाठी आर्थिक आधार ठरत असल्या तरी भिशीच्या नावाखाली अशा अडल्या-नडलेल्यांकडून पैसे गोळा करायचेच आणि पैशाची मागणी वाढली की सावकारकीचा पैसा त्यात मुरवायचा अशी क्लृप्ती वापरली जाते. यातून पैशाच्या वसुलीसाठी आपोआपच दहशत व आर्थिक पिळवणूक करण्याचे प्रकार घडताना दिसतात.

चौकट

: बालिंग्यातील सराफाचे परराज्यात पलायन

उपनगरात व शेजारच्या गावात अशा भिशी बिनदिक्कत चालविल्या जात असल्या तरी फसवणूक झाली तरी अडल्या-नडलेल्यांकडून सहसा तक्रारी केल्या जात नाहीत. मात्र, बालिंगा सराफ फसवणूक प्रकरणानंतर अशा भिशा पुन्हा चर्चेत आल्या. या सराफाने भिशीधारकांना छापील पासबुक दिली आहेत. बालिंग्यातील सराफ संतोष पोवाळकर विरोधात तक्रारदार पुढे येत असताना त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत; पण तो पत्नीसह परराज्यात फरार झाल्याची चर्चा आहे.