शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

भारत जोडो यात्रा केंद्रातील भ्रष्ट सरकार नष्ट करेल; काँग्रेसच्या एच. के. पाटील यांचा घणाघात

By विश्वास पाटील | Updated: October 8, 2022 23:39 IST

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास प्रचंड गर्दी, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांची देशभरात निघालेली भारत जोडो यात्रा केंद्रातील भाजपचे भ्रष्ट सरकार नष्ट करेल, असा घणाघात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शनिवारी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटी आश्वासने देत दिशाभूल करीत आहेत. यामुळे ते वचनभ्रष्ट झाल्याची टीकाही त्यांनी केली. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील दसरा चौकात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कँाग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांची प्रमुख उपस्थितीत होते.

पाटील म्हणाले की, भाजपने देशातील प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. दोन कोटी उद्योग उभारून बेरोजगारांना रोजगार देवू असे सांगितले होते. पण ते सत्तेवर आल्यानंतर पंधरा लाख दिले नाहीत. दोन कोटी उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे मोदींची प्रतिमा वचनभ्रष्ट अशी झाली आहे. भाजप सत्तेचा वापर करून विविध जाती, धर्मात तेढ निर्माण करीत आहे. भारताच्या एकात्मतेला धक्का पोहचवत आहे. यामुळेच काँग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेमुळे राहूल गांधी यांची प्रतिमा उजळली आहे. भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. पण भारत जोडो यात्रेने त्याला सडेतोड प्रत्युतर दिले आहे. ते चांगलं कांहीतरी घडवतील हा विश्र्वास जनतेच्या मनांत तयार होवू लागला आहे हेच यात्रेचे फलित आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रचंड प्रतिसादामुळे भारत जोडो यात्रेची नोंद गिनिज बुकमध्ये होईल. यात्रेची दखल जागतिक पातळीवरही घेतली जात आहे.

माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, भाजप सत्तेच्या जोरावर समाजात दुफळी माजवत आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक आणला तेव्हा नांवे ठेवणारे आता त्याच संगणकाच्या माध्यमातून द्वेषाचे राजकारण पसरवत आहेत. देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचत असल्यानेच राहूल गांधी यांनी ही यात्रा काढली आहे. कोल्हापूर हा काँग्रेसचाच बालेकिल्ला असून जिल्ह्यातील सामान्य माणूस यापुढेही काँग्रेसच्या विचारांसोबत राहील. या यात्रेत सहभागी होणाऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत काँग्रेस कमिटीत नोंदणी करावी.आमदार पी. एन. पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाला वैभवशाली इतिहास आहे. पण सातत्याने चुकीचा प्रचार करून भाजप सत्तेवर आली. त्यांच्या सरकारमध्ये एकाही घटकाला न्याय मिळालेला नाही. शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी संकटात आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे.

पदयात्रेने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह यांच्यासह सर्वच नेत्यांनी सिध्दार्थ नगरातील राजर्षी शाहू समाधी स्थळास भेट दिली व अभिवादन केले. तेथून पदयात्रेने ते मेळाव्याच्या ठिकाणी आले.

एलईडी वाहन गावागावात जाणार- राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा दाखवण्यासाठी खास वाहन तयार केले आहे. ही वाहने सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सात या वेळेत गावागावात जातील. यामाध्यमातून यात्रा तळागाळापर्यंत पोहचेल, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरDigvijaya Singhदिग्विजय सिंह