शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

भारत जोडो यात्रा केंद्रातील भ्रष्ट सरकार नष्ट करेल; काँग्रेसच्या एच. के. पाटील यांचा घणाघात

By विश्वास पाटील | Updated: October 8, 2022 23:39 IST

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यास प्रचंड गर्दी, कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांची देशभरात निघालेली भारत जोडो यात्रा केंद्रातील भाजपचे भ्रष्ट सरकार नष्ट करेल, असा घणाघात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शनिवारी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटी आश्वासने देत दिशाभूल करीत आहेत. यामुळे ते वचनभ्रष्ट झाल्याची टीकाही त्यांनी केली. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील दसरा चौकात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कँाग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांची प्रमुख उपस्थितीत होते.

पाटील म्हणाले की, भाजपने देशातील प्रत्येकाच्या बँक खात्यावर पंधरा लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. दोन कोटी उद्योग उभारून बेरोजगारांना रोजगार देवू असे सांगितले होते. पण ते सत्तेवर आल्यानंतर पंधरा लाख दिले नाहीत. दोन कोटी उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे मोदींची प्रतिमा वचनभ्रष्ट अशी झाली आहे. भाजप सत्तेचा वापर करून विविध जाती, धर्मात तेढ निर्माण करीत आहे. भारताच्या एकात्मतेला धक्का पोहचवत आहे. यामुळेच काँग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. या यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेमुळे राहूल गांधी यांची प्रतिमा उजळली आहे. भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. पण भारत जोडो यात्रेने त्याला सडेतोड प्रत्युतर दिले आहे. ते चांगलं कांहीतरी घडवतील हा विश्र्वास जनतेच्या मनांत तयार होवू लागला आहे हेच यात्रेचे फलित आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रचंड प्रतिसादामुळे भारत जोडो यात्रेची नोंद गिनिज बुकमध्ये होईल. यात्रेची दखल जागतिक पातळीवरही घेतली जात आहे.

माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, भाजप सत्तेच्या जोरावर समाजात दुफळी माजवत आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक आणला तेव्हा नांवे ठेवणारे आता त्याच संगणकाच्या माध्यमातून द्वेषाचे राजकारण पसरवत आहेत. देशाच्या एकात्मतेला धक्का पोहचत असल्यानेच राहूल गांधी यांनी ही यात्रा काढली आहे. कोल्हापूर हा काँग्रेसचाच बालेकिल्ला असून जिल्ह्यातील सामान्य माणूस यापुढेही काँग्रेसच्या विचारांसोबत राहील. या यात्रेत सहभागी होणाऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत काँग्रेस कमिटीत नोंदणी करावी.आमदार पी. एन. पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाला वैभवशाली इतिहास आहे. पण सातत्याने चुकीचा प्रचार करून भाजप सत्तेवर आली. त्यांच्या सरकारमध्ये एकाही घटकाला न्याय मिळालेला नाही. शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी संकटात आहे. बेरोजगारी, महागाई वाढली आहे.

पदयात्रेने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री दिग्वीजयसिंह यांच्यासह सर्वच नेत्यांनी सिध्दार्थ नगरातील राजर्षी शाहू समाधी स्थळास भेट दिली व अभिवादन केले. तेथून पदयात्रेने ते मेळाव्याच्या ठिकाणी आले.

एलईडी वाहन गावागावात जाणार- राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा दाखवण्यासाठी खास वाहन तयार केले आहे. ही वाहने सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सात या वेळेत गावागावात जातील. यामाध्यमातून यात्रा तळागाळापर्यंत पोहचेल, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरDigvijaya Singhदिग्विजय सिंह