शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’च्या नावाने विश्वासघात : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:54 IST

इचलकरंजी : भाजप सरकारने ‘अच्छे दिन’ ची घोषणा करीत जनतेचा विश्वासघात केला आहे. याचा बदला घेण्यासाठी लोक मतपेटीतून परिवर्तन घडवतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चासमोर खासदार राजू शेट्टी बोलत होते. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या महागाईविरोधी मोर्चामध्ये भाजप वगळता शहरातील सर्व ...

ठळक मुद्देइचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा, जनता मतपेटीतून परिवर्तन घडवेल

इचलकरंजी : भाजप सरकारने ‘अच्छे दिन’ ची घोषणा करीत जनतेचा विश्वासघात केला आहे. याचा बदला घेण्यासाठी लोक मतपेटीतून परिवर्तन घडवतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चासमोर खासदार राजू शेट्टी बोलत होते. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या महागाईविरोधी मोर्चामध्ये भाजप वगळता शहरातील सर्व राजकीय पक्ष सहभागी झाले होते.

यावेळी राजू शेट्टी यांनी सर्व गट-तट विसरून भाजपच्या विरोधात राज्यात प्रथमच इचलकरंजीत मोर्चा निघाल्याबद्दल सहभागी झालेल्यांचे आभार मानले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही; म्हणून कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. याउलट जनतेला मात्र अन्नधान्य, खाद्यतेल महागाईच्या भावानेच मिळत आहेत. उद्योगधंदे बंद पडताहेत, कामगार बेरोजगार आणि शेतकरी तोट्यात अशी स्थिती भाजप सरकारच्या चार वर्षांतील आहे.

माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, भाजपने निवडणुकीवेळी लोकांना स्वप्न दाखविल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाच्या बॅँक खात्यात१५ लाख रुपये आले नाहीत; उलट गोरगरिबांचे रेशनिंगचे धान्य गायब झाले. वस्त्रोद्योगाची स्थिती बिकट झाली. यंत्रमागाची विक्री भंगाराच्या भावात सुरू आहे. उद्योगधंदे-शेतकरी-कामगार देशोधडीला लागले तरी सरकार ढिम्म आहे. त्यामुळे जनतेने आगामी निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवावी.

मोर्चासमोर बोलताना जनता दलाचे प्रदेश महासचिव प्रताप होगाडे यांनी भाजप सरकार सामान्य जनतेच्या खिशाची लूट करून बड्या उद्योगपतींची भर करीत असल्याचा आरोप केला. यावेळी दत्ता माने (माकप), मिश्रीलाल जाजू (राष्टÑवादी कामगार संघटना), मदन कारंडे (राष्टÑवादी कॉँग्रेस), महादेव गौड (शिवसेना), राजेंद्र निकम (मनसे), आदींनीही वाढत्या महागाईचा निषेध करीत सरकारवर टीका केली. त्यानंतर मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिले.आता सुट्टी नाही : शेट्टीपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून खासदार शेट्टी म्हणाले, चंद्रकांत पाटील तुमच्या सरकारने घोर निराशा केली आहे. तुम्ही पाताळात जरी दडलात, तरी तुम्हाला हुडकून काढून जनता बदला घेईल. आता तुम्हाला सुट्टी नाही.सवाल-जवाबचे आव्हानइचलकरंजीच्या जनतेला पोकळ आश्वासने दिल्याचा आरोप करीत माजी मंत्री आवाडे यांनी जनतेच्या समस्या व निवडणूक काळातील आश्वासनांबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी एकाच व्यासपीठावर येऊन सवाल-जवाब करण्याचे आव्हान दिले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर