शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘अच्छे दिन’च्या नावाने विश्वासघात : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:54 IST

इचलकरंजी : भाजप सरकारने ‘अच्छे दिन’ ची घोषणा करीत जनतेचा विश्वासघात केला आहे. याचा बदला घेण्यासाठी लोक मतपेटीतून परिवर्तन घडवतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चासमोर खासदार राजू शेट्टी बोलत होते. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या महागाईविरोधी मोर्चामध्ये भाजप वगळता शहरातील सर्व ...

ठळक मुद्देइचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा, जनता मतपेटीतून परिवर्तन घडवेल

इचलकरंजी : भाजप सरकारने ‘अच्छे दिन’ ची घोषणा करीत जनतेचा विश्वासघात केला आहे. याचा बदला घेण्यासाठी लोक मतपेटीतून परिवर्तन घडवतील, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मंगळवारी काढलेल्या सर्वपक्षीय मोर्चासमोर खासदार राजू शेट्टी बोलत होते. महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या महागाईविरोधी मोर्चामध्ये भाजप वगळता शहरातील सर्व राजकीय पक्ष सहभागी झाले होते.

यावेळी राजू शेट्टी यांनी सर्व गट-तट विसरून भाजपच्या विरोधात राज्यात प्रथमच इचलकरंजीत मोर्चा निघाल्याबद्दल सहभागी झालेल्यांचे आभार मानले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही; म्हणून कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. याउलट जनतेला मात्र अन्नधान्य, खाद्यतेल महागाईच्या भावानेच मिळत आहेत. उद्योगधंदे बंद पडताहेत, कामगार बेरोजगार आणि शेतकरी तोट्यात अशी स्थिती भाजप सरकारच्या चार वर्षांतील आहे.

माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, भाजपने निवडणुकीवेळी लोकांना स्वप्न दाखविल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाच्या बॅँक खात्यात१५ लाख रुपये आले नाहीत; उलट गोरगरिबांचे रेशनिंगचे धान्य गायब झाले. वस्त्रोद्योगाची स्थिती बिकट झाली. यंत्रमागाची विक्री भंगाराच्या भावात सुरू आहे. उद्योगधंदे-शेतकरी-कामगार देशोधडीला लागले तरी सरकार ढिम्म आहे. त्यामुळे जनतेने आगामी निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवावी.

मोर्चासमोर बोलताना जनता दलाचे प्रदेश महासचिव प्रताप होगाडे यांनी भाजप सरकार सामान्य जनतेच्या खिशाची लूट करून बड्या उद्योगपतींची भर करीत असल्याचा आरोप केला. यावेळी दत्ता माने (माकप), मिश्रीलाल जाजू (राष्टÑवादी कामगार संघटना), मदन कारंडे (राष्टÑवादी कॉँग्रेस), महादेव गौड (शिवसेना), राजेंद्र निकम (मनसे), आदींनीही वाढत्या महागाईचा निषेध करीत सरकारवर टीका केली. त्यानंतर मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिले.आता सुट्टी नाही : शेट्टीपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून खासदार शेट्टी म्हणाले, चंद्रकांत पाटील तुमच्या सरकारने घोर निराशा केली आहे. तुम्ही पाताळात जरी दडलात, तरी तुम्हाला हुडकून काढून जनता बदला घेईल. आता तुम्हाला सुट्टी नाही.सवाल-जवाबचे आव्हानइचलकरंजीच्या जनतेला पोकळ आश्वासने दिल्याचा आरोप करीत माजी मंत्री आवाडे यांनी जनतेच्या समस्या व निवडणूक काळातील आश्वासनांबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांनी एकाच व्यासपीठावर येऊन सवाल-जवाब करण्याचे आव्हान दिले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर