शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

बेळगाव-निपाणी-कºहाड रेल्वेच्या आशा पल्लवित!

By admin | Updated: May 31, 2014 01:18 IST

सदानंद गौडा यांची माहिती : उत्तर कर्नाटकात रेल्वेचे जाळे; अपघात टाळण्यासाठी नवी यंत्रणा

राजेंद्र हजारे -निपाणी कर्नाटकातील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच बहुचर्चित बेळगाव निपाणीमार्गे कºहाड ही रेल्वेलाईन दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी बंगलोर येथे सांगितले. त्यामुळे सीमाभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या या रेल्वेमार्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. धारवाड, बेळगाव निपाणीमार्गे कराड रेल्वेमार्गासाठी जानेवारी २०१२ मध्ये निविदा काढून त्याचा सर्र्व्हे पूर्ण करण्यात आला होता. तेव्हा माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी योग्य प्रकारे पाठपुरावा करून या रेल्वे मार्गाचे महत्त्व पटवून दिले होते. शिवाय या रेल्वेलाईनमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना ७० कि.मी.चा प्रवास कमी होणार आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेल्या धारवाड, बेळगााव व्हाया संकेश्वर, निपाणीमार्गे कºहाडपर्यंत अंदाजे २०० कि.मी. रेल्वेलाईनचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून सदानंद गौडा यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर उत्तर कर्नाटकात रेल्वेलाईनचे जाळे निर्माण करण्यासह रेल्वेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवून देण्याची तयारी दर्शविली आहे. आगामी अर्थसंकल्पावेळी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊन धारवाड-कºहाड या रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच रेल्वे अपघात टाळण्यासाठी नवीन यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. धारवाड-कºहाड या नव्या रेल्वेमार्गामुळे कोल्हापूर हरिप्रिया ते तिरुपती आणि संपर्क क्रांती म्हैसूर ते दिल्ली अशा लांबपल्ल्याच्या गाड्यांचा ७० कि.मी.चा प्रवास कमी होणार आहे. या मार्गावरील औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, बेळगाव, निपाणी, संकेश्वर भागातील शेती मालाला याचा चांगला लाभ होणार आहे. धारवाड-कºहाड निपाणीमार्गे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला तत्कालीन केंद्रीय मंत्री ममता बॅनर्जी यांनी फेब्रुवारी २०११ मधील रेल्वे अंदाजपत्रकात हिरवा कंदील दाखविल्याने तेव्हापासून या कामाला पोषक वातावरण निर्माण झाले होते. हुबळी-मुंबई जलद रेल्वे, बेळगाव-हैद्राबाद आणि बेळगाव-बंगलोर, हुबळी-वास्को अतिरिक्त रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणीही बर्‍याच वर्षांपासून होत आहे. त्यांचाही विचार करून आगामी अर्थसंकल्पात प्राधान्य देणात येणार असल्याचेही सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे. धारवाड-कºहाड रेल्वेमार्गामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल.