शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल : रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:50 IST

'निरक्षरता, गरिबी, भूकबळी या समस्यांचे आव्हान असणाऱ्या भारत ७५ आणि वेगाने पुढे जाणाऱ्या इंडिया ७५ यांच्यातील दरी आधी संपवावी'

कोल्हापूर : भारताची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु ही वाढ नुसतीच नको. निरक्षरता, गरिबी, भूकबळी या समस्यांचे आव्हान असणाऱ्या भारत ७५ आणि वेगाने पुढे जाणाऱ्या इंडिया ७५ यांच्यातील दरी आधी संपवावी. देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, शिवभक्त, शिक्षक सु. रा. देशपांडे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. माशेलकर यांना सु. रा. देशपांडे स्मृती गौरव पुरस्कार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.डॉ. माशेलकर म्हणाले, भारतातील टायर थ्री शहरात राहणारे ५० टक्के नागरिक अजूनही गरीब आहेत. शंभरपैकी फक्त २४ महानगरेच विकसित झालीत. देशातील प्रत्येक सहावी व्यक्ती झोपडपट्टीत राहते. सहापैकी एक व्यक्ती अजूनही निरक्षर आहे. १५ टक्के लोक गरीब आहेत. हा बदल झाला तरच देश विश्वगुरू बनेल. एकीकडे नवीन पिढीच्या आकलनाचा वेग इतका मोठा आहे, की त्यांच्यासाठी शिक्षकांची कमतरता भासणार आहे, दुसरीकडे हुशार मुलांना गरिबीमुळे, तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध न झाल्यामुळे आत्महत्या करावी लागते.

नव्या भारताचे सूत्रडॉ. माशेलकर यांनी नवा भारत कसा असावा याचे सूत्र मांडले. संतुलित, स्त्री-पुरुषांना समान संधी असलेला, जातीपातीच्या पलीकडच्या भारताची संकल्पना मांडली. यामध्ये सांस्कृतिकतेचा अभिमान असलेला, इतर धर्माचा आदर करणारा, शिक्षणाचा योग्य मार्ग आणि अधिकार, नुसते श्रीमंत, गरिबीची दरी वाढवणारी समृद्धी नको, कुपोषणमुक्त, योग्य अन्नाचे पोषण आणि आनंदी असणारा समाज अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर