शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल : रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:50 IST

'निरक्षरता, गरिबी, भूकबळी या समस्यांचे आव्हान असणाऱ्या भारत ७५ आणि वेगाने पुढे जाणाऱ्या इंडिया ७५ यांच्यातील दरी आधी संपवावी'

कोल्हापूर : भारताची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु ही वाढ नुसतीच नको. निरक्षरता, गरिबी, भूकबळी या समस्यांचे आव्हान असणाऱ्या भारत ७५ आणि वेगाने पुढे जाणाऱ्या इंडिया ७५ यांच्यातील दरी आधी संपवावी. देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, शिवभक्त, शिक्षक सु. रा. देशपांडे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. माशेलकर यांना सु. रा. देशपांडे स्मृती गौरव पुरस्कार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.डॉ. माशेलकर म्हणाले, भारतातील टायर थ्री शहरात राहणारे ५० टक्के नागरिक अजूनही गरीब आहेत. शंभरपैकी फक्त २४ महानगरेच विकसित झालीत. देशातील प्रत्येक सहावी व्यक्ती झोपडपट्टीत राहते. सहापैकी एक व्यक्ती अजूनही निरक्षर आहे. १५ टक्के लोक गरीब आहेत. हा बदल झाला तरच देश विश्वगुरू बनेल. एकीकडे नवीन पिढीच्या आकलनाचा वेग इतका मोठा आहे, की त्यांच्यासाठी शिक्षकांची कमतरता भासणार आहे, दुसरीकडे हुशार मुलांना गरिबीमुळे, तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध न झाल्यामुळे आत्महत्या करावी लागते.

नव्या भारताचे सूत्रडॉ. माशेलकर यांनी नवा भारत कसा असावा याचे सूत्र मांडले. संतुलित, स्त्री-पुरुषांना समान संधी असलेला, जातीपातीच्या पलीकडच्या भारताची संकल्पना मांडली. यामध्ये सांस्कृतिकतेचा अभिमान असलेला, इतर धर्माचा आदर करणारा, शिक्षणाचा योग्य मार्ग आणि अधिकार, नुसते श्रीमंत, गरिबीची दरी वाढवणारी समृद्धी नको, कुपोषणमुक्त, योग्य अन्नाचे पोषण आणि आनंदी असणारा समाज अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर