शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

सावधान, गवे गावातच येताहेत! वनविभाग हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:49 IST

धामोड : बुरंबाळी-कानकेकरवाडी दरम्यानच्या दुर्गमानवाड रस्त्यावर मंगळवारी सकाळीच १२ ते १३ गव्यांचा एक कळप दिसल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे वनविभागही हतबल

धामोड : बुरंबाळी-कानकेकरवाडी दरम्यानच्या दुर्गमानवाड रस्त्यावर मंगळवारी सकाळीच १२ ते १३ गव्यांचा एक कळप दिसल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे वनविभागही हतबल झाला असून, ठोस उपायासाठी शेतकरीही आक्रमक झाला आह.

बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील कानकेकरवाडी ते दुर्गमानवाड रस्त्यावरती मंगळवारी सकाळी जवळपास १३ गव्यांचा कळप येथील शेतकऱ्यांना दिसला. गवे गावच्या शिवारात आल्याची बातमी केळोशी (खुर्द), खातकरवाडी, पिंपरेचीवाडी, बुरंबाळी गावांतील ग्रामस्थांना समजताच त्यांनी डोंगरमाथ्यावरील या रस्त्याकडे धाव घेतली; पण काही वेळातच या कळपाने शिरगाव, कांबळवाडी, तरसंबळे शिवारमार्गे दुर्गमानवाड जंगलाच्या दिशेने पळ काढला.

या परिसरातील जंगलांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून आगी लावण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने जवळपास ९०० एकरांवरील जंगल आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. त्यामुळे हे गवे चाºयाच्या शोधात आता गावशिवाराच्या दिशेनेच येतआहेत. या परिसरातील शेतकरी रात्रीच्यावेळी उसाला पाणी पाजण्यासाठी शेतात गेल्यावर त्यांना वेळोवेळी गव्यांचे दर्शन गेल्या १५ दिवसांपासून होत आहे. परिणामी, शेतकरी भीतीपोटी पाणी अर्धवट सोडूनच घरी धाव घेत आहेत. गव्यांनी फस्त केलेले पीक पाहून शेतकरी निराशही होत आहेत.हल्ल्याच्या भीतीने गावकऱ्यांमध्ये दहशतमोहितेवाडी येथील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपूर्वी गव्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गव्यांनी गावच्या दिशेने मोर्चा वळविल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाला आहे. 

शेतकऱ्यांनी गव्यांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी गावठी जनावरांचे मलमूत्र किंवा गोणपाटामध्ये खराब मिरच्या घालून त्याची धुरांडी होईल, अशा पद्धतीने शेताच्या बांधावरती ठेवावे, त्यामुळे गवे शेतात येणार नाहीत. - दिनेश टिपुगडे, वनरक्षक केळोशी, म्हासुर्ली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग