शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सावधान, गवे गावातच येताहेत! वनविभाग हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:49 IST

धामोड : बुरंबाळी-कानकेकरवाडी दरम्यानच्या दुर्गमानवाड रस्त्यावर मंगळवारी सकाळीच १२ ते १३ गव्यांचा एक कळप दिसल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे वनविभागही हतबल

धामोड : बुरंबाळी-कानकेकरवाडी दरम्यानच्या दुर्गमानवाड रस्त्यावर मंगळवारी सकाळीच १२ ते १३ गव्यांचा एक कळप दिसल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे वनविभागही हतबल झाला असून, ठोस उपायासाठी शेतकरीही आक्रमक झाला आह.

बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील कानकेकरवाडी ते दुर्गमानवाड रस्त्यावरती मंगळवारी सकाळी जवळपास १३ गव्यांचा कळप येथील शेतकऱ्यांना दिसला. गवे गावच्या शिवारात आल्याची बातमी केळोशी (खुर्द), खातकरवाडी, पिंपरेचीवाडी, बुरंबाळी गावांतील ग्रामस्थांना समजताच त्यांनी डोंगरमाथ्यावरील या रस्त्याकडे धाव घेतली; पण काही वेळातच या कळपाने शिरगाव, कांबळवाडी, तरसंबळे शिवारमार्गे दुर्गमानवाड जंगलाच्या दिशेने पळ काढला.

या परिसरातील जंगलांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून आगी लावण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने जवळपास ९०० एकरांवरील जंगल आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. त्यामुळे हे गवे चाºयाच्या शोधात आता गावशिवाराच्या दिशेनेच येतआहेत. या परिसरातील शेतकरी रात्रीच्यावेळी उसाला पाणी पाजण्यासाठी शेतात गेल्यावर त्यांना वेळोवेळी गव्यांचे दर्शन गेल्या १५ दिवसांपासून होत आहे. परिणामी, शेतकरी भीतीपोटी पाणी अर्धवट सोडूनच घरी धाव घेत आहेत. गव्यांनी फस्त केलेले पीक पाहून शेतकरी निराशही होत आहेत.हल्ल्याच्या भीतीने गावकऱ्यांमध्ये दहशतमोहितेवाडी येथील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपूर्वी गव्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गव्यांनी गावच्या दिशेने मोर्चा वळविल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाला आहे. 

शेतकऱ्यांनी गव्यांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी गावठी जनावरांचे मलमूत्र किंवा गोणपाटामध्ये खराब मिरच्या घालून त्याची धुरांडी होईल, अशा पद्धतीने शेताच्या बांधावरती ठेवावे, त्यामुळे गवे शेतात येणार नाहीत. - दिनेश टिपुगडे, वनरक्षक केळोशी, म्हासुर्ली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग