शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

बावनकुळेंनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे : सतेज पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:19 IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी दिवसाऐवजी रात्रीची वीज देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे, मगच त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतील, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केली.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांचा ‘महावितरण’वर धडक मोर्चा; शेतीपंपांसाठी दिवसाला बारा तास वीज द्याहा अहवाल कॅबिनेट किंवा विधानसभा, विधानपरिषद येथे मांडणे आवश्यक होते

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी दिवसाऐवजी रात्रीची वीज देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे, मगच त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतील, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केली. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांत विजेसाठी एकही पैसा पश्चिम महाराष्टÑात न देता मुख्यमंत्र्यांनी तो विदर्भाकडे नेल्याचा टोलाही त्यांनी हाणला. सरकारने शेतीपंपांसाठी दिवसाला बारा तास वीज द्यावी; यासह विविध मागण्यांसाठी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ‘महावितरण’वर धडक मोर्चा काढला.

दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, सासने मैदान, आदित्य कॉर्नरमार्गे मोर्चा ताराबाई पार्कातील ‘महावितरण’ कार्यालयावर नेण्यात आला. याठिकाणी महावितरण व सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

आ. सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्णातील सुमारे सहा हजार शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून शेतीपंपासाठी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. हे सरकार फसणवीस आणि घोषणाबाजांचे असून त्याबद्दल त्यांचा सत्कार केला पाहिजे. या सरकारमुळे एकही घटक सुखी नाही. विजेवर अवलंबून असणाºया घटकांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारने केले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रात्रीचे कार्यालय सुरू ठेवावे; मगच शेतकऱ्यांच्या अडचणी कळतील.

ते पुढे म्हणाले, मीटर रीडिंग व वीज बिलातील तक्रारींबाबत शासनाने कृषिपंप वीज वापर सत्यशोधन समिती स्थापन केली. तिच्या अहवालानंतर आयोग जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करण्याचे शपथपत्र ‘महावितरण’ने दिले. त्यानंतर हा अहवाल कॅबिनेट किंवा विधानसभा, विधानपरिषद येथे मांडणे आवश्यक होते; परंतु हा अहवाल अद्याप पटलावर येत नाही, यामागे काय गौडबंगाल आहे?

बाबासाहेब पाटील-भुयेकर, किरणसिंह पाटील, संजय पाटील, विश्वास नेजदार, केरबा पाटील, विद्याधर गुरबे, विक्रांत पाटील-किणीकर यांनी भावना व्यक्त केल्या.मोर्चात महापौर स्वाती यवलुजे, कर्णसिंह गायकवाड, मधुकर देसाई, जि. प. सदस्य बजरंग पाटील, भगवान पाटील, बंडा माने, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर, संध्या घोटणे, सत्यजित जाधव, प्रदीप झांबरे, तौफिक मुल्लाणी, शशिकांत पाटील-चुयेकर, मंगल कांबळे, पांडुरंग भोसले, शामराव देसाई, सचिन घोरपडे, सदाशिव चरापले,आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.पालकमंत्री नगरसेवक फोडण्यात मग्नजिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नगरसेवक फोडण्यात मग्न आहेत. त्याचबरोबर पालकमंत्र्यांना विविध महोत्सव घ्यायला वेळ आहे; पण वीज आणि शेतकºयांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.सरकारला जाब विचारूशेतीपंपांच्या प्रश्नावर २७ नोव्हेंबरला झालेल्या चर्चेनंतर लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन देणाºया मुख्यमंत्र्यांच्या तारखेची वाट अजून पाहतोय, असे सांगून हे सरकार फसवे असून, त्यांना जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.यांचे भांडण ‘खरे की खोटे’?खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता, ‘हे दोघे जवळचे पाहुणे असल्याने, ते खरोखर भांडतात की खोटे-खोटे भांडतात, हेच कळत नाही!’ अशी फिरकी भुयेकर-पाटील यांनी घेतल्यावर एकच हशा पिकला.तक्रार अर्ज २ मार्चपर्यंत जमा करा६००० शेतकºयांनी शेतीपंपासाठी वीजजोडणीकरिता अर्ज केले आहेत; परंतु त्यांना अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. नियमानुसार अर्ज केल्यानंतर ठरावीक वेळेत वीजजोडणी देणे बंधनकारक असून महावितरणवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे संबंधितांनी २ मार्चपर्यंत इरिगेशन फेडरेशन व ‘अजिंक्यतारा’ येथे तक्रार अर्ज द्यावेत, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.एकाच युनिटचे वेगवेगळे बिलसुभाषनगरातील एका ग्राहकाला १०८ युनिटला ६२५ रुपये वीज बिल आले आहे, तर त्याच्या शेजारी असणाºया ग्राहकाला १०८ युनिटला ६०८ रुपये बिल आले आहे. हा ‘महावितरण’च्या भोंगळ कारभाराचा अजब नमुना असल्याचे आमदार पाटील यांनी निदर्शनास आणले.शेतीपंपासाठी दिवसा बारा तास वीज द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर