शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
2
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
3
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
4
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
5
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
6
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
7
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
8
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
9
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
10
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
11
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
12
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
13
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
14
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
15
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
16
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
17
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
18
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
19
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
20
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?

बावनकुळेंनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे : सतेज पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:19 IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी दिवसाऐवजी रात्रीची वीज देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे, मगच त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतील, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केली.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांचा ‘महावितरण’वर धडक मोर्चा; शेतीपंपांसाठी दिवसाला बारा तास वीज द्याहा अहवाल कॅबिनेट किंवा विधानसभा, विधानपरिषद येथे मांडणे आवश्यक होते

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी दिवसाऐवजी रात्रीची वीज देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्रीचे मंत्रालय सुरू ठेवावे, मगच त्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतील, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे केली. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांत विजेसाठी एकही पैसा पश्चिम महाराष्टÑात न देता मुख्यमंत्र्यांनी तो विदर्भाकडे नेल्याचा टोलाही त्यांनी हाणला. सरकारने शेतीपंपांसाठी दिवसाला बारा तास वीज द्यावी; यासह विविध मागण्यांसाठी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ‘महावितरण’वर धडक मोर्चा काढला.

दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, दाभोळकर कॉर्नर, सासने मैदान, आदित्य कॉर्नरमार्गे मोर्चा ताराबाई पार्कातील ‘महावितरण’ कार्यालयावर नेण्यात आला. याठिकाणी महावितरण व सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

आ. सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्णातील सुमारे सहा हजार शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून शेतीपंपासाठी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. हे सरकार फसणवीस आणि घोषणाबाजांचे असून त्याबद्दल त्यांचा सत्कार केला पाहिजे. या सरकारमुळे एकही घटक सुखी नाही. विजेवर अवलंबून असणाºया घटकांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारने केले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी रात्रीचे कार्यालय सुरू ठेवावे; मगच शेतकऱ्यांच्या अडचणी कळतील.

ते पुढे म्हणाले, मीटर रीडिंग व वीज बिलातील तक्रारींबाबत शासनाने कृषिपंप वीज वापर सत्यशोधन समिती स्थापन केली. तिच्या अहवालानंतर आयोग जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करण्याचे शपथपत्र ‘महावितरण’ने दिले. त्यानंतर हा अहवाल कॅबिनेट किंवा विधानसभा, विधानपरिषद येथे मांडणे आवश्यक होते; परंतु हा अहवाल अद्याप पटलावर येत नाही, यामागे काय गौडबंगाल आहे?

बाबासाहेब पाटील-भुयेकर, किरणसिंह पाटील, संजय पाटील, विश्वास नेजदार, केरबा पाटील, विद्याधर गुरबे, विक्रांत पाटील-किणीकर यांनी भावना व्यक्त केल्या.मोर्चात महापौर स्वाती यवलुजे, कर्णसिंह गायकवाड, मधुकर देसाई, जि. प. सदस्य बजरंग पाटील, भगवान पाटील, बंडा माने, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंजना रेडेकर, संध्या घोटणे, सत्यजित जाधव, प्रदीप झांबरे, तौफिक मुल्लाणी, शशिकांत पाटील-चुयेकर, मंगल कांबळे, पांडुरंग भोसले, शामराव देसाई, सचिन घोरपडे, सदाशिव चरापले,आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.पालकमंत्री नगरसेवक फोडण्यात मग्नजिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नगरसेवक फोडण्यात मग्न आहेत. त्याचबरोबर पालकमंत्र्यांना विविध महोत्सव घ्यायला वेळ आहे; पण वीज आणि शेतकºयांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.सरकारला जाब विचारूशेतीपंपांच्या प्रश्नावर २७ नोव्हेंबरला झालेल्या चर्चेनंतर लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन देणाºया मुख्यमंत्र्यांच्या तारखेची वाट अजून पाहतोय, असे सांगून हे सरकार फसवे असून, त्यांना जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.यांचे भांडण ‘खरे की खोटे’?खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता, ‘हे दोघे जवळचे पाहुणे असल्याने, ते खरोखर भांडतात की खोटे-खोटे भांडतात, हेच कळत नाही!’ अशी फिरकी भुयेकर-पाटील यांनी घेतल्यावर एकच हशा पिकला.तक्रार अर्ज २ मार्चपर्यंत जमा करा६००० शेतकºयांनी शेतीपंपासाठी वीजजोडणीकरिता अर्ज केले आहेत; परंतु त्यांना अद्यापही वीजजोडणी मिळालेली नाही. नियमानुसार अर्ज केल्यानंतर ठरावीक वेळेत वीजजोडणी देणे बंधनकारक असून महावितरणवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे संबंधितांनी २ मार्चपर्यंत इरिगेशन फेडरेशन व ‘अजिंक्यतारा’ येथे तक्रार अर्ज द्यावेत, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.एकाच युनिटचे वेगवेगळे बिलसुभाषनगरातील एका ग्राहकाला १०८ युनिटला ६२५ रुपये वीज बिल आले आहे, तर त्याच्या शेजारी असणाºया ग्राहकाला १०८ युनिटला ६०८ रुपये बिल आले आहे. हा ‘महावितरण’च्या भोंगळ कारभाराचा अजब नमुना असल्याचे आमदार पाटील यांनी निदर्शनास आणले.शेतीपंपासाठी दिवसा बारा तास वीज द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर