शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईट उत्खनन पुन्हा सुरू होणार, शासनाच्या हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 13:55 IST

पश्चिम घाटात वसलेल्या तालुक्यात गेली अनेक वर्षे मायनिंग प्रकल्प सुरू आहेत. मग आजअखेर या तालुक्यात विकास का झाला नाही?

कोल्हापूर : केंद्राच्या अधिसूचनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील १८४ गावांचा संवेदनशील क्षेत्रात समावेश आहे. यातील ३१ गावे वगळावीत, अशी राज्य शासनाची मागणी आहे. यापैकी १७ गावांत बॉक्साईटचे उत्खनन सुरू करण्यासाठी, एका गावात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) निर्माण करण्यासाठी आणि उर्वरित १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याने ती सर्व गावे वगळण्याची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. ती जर वगळली, तर कोल्हापूर जिल्हा पुन्हा बॉक्साईट उत्खननाच्या विळख्यात अडकेल, अशी भीती ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सोमवारी व्यक्त केली. तज्ज्ञांनी, अभ्यासकानी, पर्यावरणप्रेमींनी संवेदनशील क्षेत्रातील कोणतीही गावे वगळू नयेत, अशी मागणी करणारी पत्रे, ई-मेल केंद्र व राज्य शासनाला पाठवावीत, असे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले आहे.डॉ. के. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांची व यामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांची यादी केंद्र शासनाने २०१३ मध्ये जाहीर केली. यामध्ये सहा राज्यांतील ५९९९४० चौ. किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले. पण या निर्णयास सर्व सहा राज्यांनी विरोध सुरू केला. आता महाराष्ट्रानेही राज्यासाठी जाहीर केलेल्या १७३४० चौ. किलोमीटर संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट २१३३ गावांपैकी ३८८ गावे वगळण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.आजरा तालुक्यातील हाजगोळी खुर्द व केराकबोळ, भुदरगड तालुक्यातील बिद्री, हणबरवाडी, मुरुकाटे, फणसवाडी, राधानगरी तालुक्यातील करंजफेण, सावर्डे, शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी, म्हाळसवडे, पणुंद्रे, शिराळे तर्फे मलकापूर, सोनुर्ले ही १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याचा राज्य शासनाचा दावा आहे. चंदगड तालुक्यातील ओगोली, धामापूर, कानूर खुर्द, पिलानी, पुंद्रा, शाहूवाडी तालुक्यातील बुरंबाळ, धनगरवाडी, गिरगाव, मानोली, निवळे, शिराळे तर्फे वारूण, उदगिरी, येळवण जुगाई, राधानगरी तालुक्यातील पडसाळी, पाटपन्हाळा व रामनवाडी आणि भुदरगड तालुक्यातील वासणोली अशा एकूण १७ गावांत उत्खनन सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. भुदरगडमधील देवकेवाडी येथे औद्योगिक वसाहत निर्मितीचा विचार आहे, यासाठी ही १८ गावे वगळावीत, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड या पश्चिम घाटात वसलेल्या तालुक्यात गेली अनेक वर्षे मायनिंग प्रकल्प सुरू आहेत. मग आजअखेर या तालुक्यात विकास का झाला नाही? असा प्रश्न डॉ. बाचूळकर यांनी विचारला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर