शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईट उत्खनन पुन्हा सुरू होणार, शासनाच्या हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 13:55 IST

पश्चिम घाटात वसलेल्या तालुक्यात गेली अनेक वर्षे मायनिंग प्रकल्प सुरू आहेत. मग आजअखेर या तालुक्यात विकास का झाला नाही?

कोल्हापूर : केंद्राच्या अधिसूचनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील १८४ गावांचा संवेदनशील क्षेत्रात समावेश आहे. यातील ३१ गावे वगळावीत, अशी राज्य शासनाची मागणी आहे. यापैकी १७ गावांत बॉक्साईटचे उत्खनन सुरू करण्यासाठी, एका गावात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) निर्माण करण्यासाठी आणि उर्वरित १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याने ती सर्व गावे वगळण्याची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. ती जर वगळली, तर कोल्हापूर जिल्हा पुन्हा बॉक्साईट उत्खननाच्या विळख्यात अडकेल, अशी भीती ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सोमवारी व्यक्त केली. तज्ज्ञांनी, अभ्यासकानी, पर्यावरणप्रेमींनी संवेदनशील क्षेत्रातील कोणतीही गावे वगळू नयेत, अशी मागणी करणारी पत्रे, ई-मेल केंद्र व राज्य शासनाला पाठवावीत, असे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले आहे.डॉ. के. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांची व यामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांची यादी केंद्र शासनाने २०१३ मध्ये जाहीर केली. यामध्ये सहा राज्यांतील ५९९९४० चौ. किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले. पण या निर्णयास सर्व सहा राज्यांनी विरोध सुरू केला. आता महाराष्ट्रानेही राज्यासाठी जाहीर केलेल्या १७३४० चौ. किलोमीटर संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट २१३३ गावांपैकी ३८८ गावे वगळण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.आजरा तालुक्यातील हाजगोळी खुर्द व केराकबोळ, भुदरगड तालुक्यातील बिद्री, हणबरवाडी, मुरुकाटे, फणसवाडी, राधानगरी तालुक्यातील करंजफेण, सावर्डे, शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी, म्हाळसवडे, पणुंद्रे, शिराळे तर्फे मलकापूर, सोनुर्ले ही १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याचा राज्य शासनाचा दावा आहे. चंदगड तालुक्यातील ओगोली, धामापूर, कानूर खुर्द, पिलानी, पुंद्रा, शाहूवाडी तालुक्यातील बुरंबाळ, धनगरवाडी, गिरगाव, मानोली, निवळे, शिराळे तर्फे वारूण, उदगिरी, येळवण जुगाई, राधानगरी तालुक्यातील पडसाळी, पाटपन्हाळा व रामनवाडी आणि भुदरगड तालुक्यातील वासणोली अशा एकूण १७ गावांत उत्खनन सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. भुदरगडमधील देवकेवाडी येथे औद्योगिक वसाहत निर्मितीचा विचार आहे, यासाठी ही १८ गावे वगळावीत, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड या पश्चिम घाटात वसलेल्या तालुक्यात गेली अनेक वर्षे मायनिंग प्रकल्प सुरू आहेत. मग आजअखेर या तालुक्यात विकास का झाला नाही? असा प्रश्न डॉ. बाचूळकर यांनी विचारला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर