शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्षांची अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:43 IST

असीफ कुरणे चेन्नई : तामिळनाडू विधानसभेसाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान होत आहे. यासाठी तामिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे. ...

असीफ कुरणे

चेन्नई : तामिळनाडू विधानसभेसाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान होत आहे. यासाठी तामिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे. येथे सत्ताधारी अण्णाद्रमुक विरुद्ध द्रमुक, असा मुख्य सामना असून भाजप, काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. देशभरात विजयी घोडदौड करणाऱ्या भाजपला येथील द्रविडी राजकारणात शिरकाव करता आलेला नाही.

तामिळनाडूच्या सत्तेतून काँग्रेस १९६९ मध्ये बाहेर झाल्यानंतर गेल्या ५० वर्षांत प्रमुख राष्ट्रीय पक्षांना येथे स्थिरावता आलेले नाही. २०१६ मध्ये २३४ जागा लढ‌वणाऱ्या भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. भाजपला अवघी २.८० टक्के (१२ लाख ३५ हजार) मते मिळाली होती. द्रमुकसोबत आघाडी करून ४१ जागा लढविणाऱ्या काँग्रेसला अवघ्या ७ जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला ६.४७ टक्के (२७ लाख ७४ हजार) मते मिळाली होती. बसपा, माकप, भाकप यांनादेखील एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी अण्णाद्रमुक व द्रमुक या पक्षांमध्येच खरी लढत होणार असून, फक्त मतविभागणी टाळण्यासाठी राष्ट्रीय पक्षांना सोबत घेतले जात असल्याचे चित्र आहे.

२०२१ मधील निवडणूक ही वैचारिक निवडणूक असून, द्रविडी राजकारण टिकवणे आवश्यक आहे, असे वातावरण राज्यात निर्माण केले जात आहे. या धारणेला तामिळी लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता. यावेळीदेखील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही जागांवर समाधान मानावे लागेल, अशी चिन्हे आहेत. काँग्रेस, भाजप आपल्या सहकारी पक्षाकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे फारशा जागा देण्यास तयार नाहीत. त्याचप्रमाणे दोन्ही आघाड्यांमध्ये इतर पक्षांची संख्यादेखील जास्त असल्यामुळे घटक पक्षांना फारशा जागा मिळणार नाहीत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पक्षांना मिळणाऱ्या जागा वाढवत आपले अस्तित्व टिकवावे लागणार आहे.

आर्य विरुद्ध द्रविडी

आगामी निवडणूक ही आर्याचे आक्रमण विरुद्ध द्रविडी अस्था यांच्यातील लढाई असल्याचे सांगत द्रमुकचे प्रमुख ए.के. स्टॅलिन यांनी आपली राजकीय भूमिका काय असेल, हे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे अण्णाद्रमुक पक्षानेदेखील यावेळी इतर वेळच्या तुलनेत जास्त आक्रमकपणे द्रविडी राजकारण सुरू केले आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी द्रविडी आस्थेवर सर्व प्रचार सुरू असल्याचे चित्र सध्या तामिळनाडूमध्ये दिसून येत आहे. सोशल मीडियावरदेखील संघीय राजकारणाविरुद्ध एकसूत्री राजकारण, असे वातावरण निर्माण केले जात आहे.