शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय पक्षांची अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:43 IST

असीफ कुरणे चेन्नई : तामिळनाडू विधानसभेसाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान होत आहे. यासाठी तामिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे. ...

असीफ कुरणे

चेन्नई : तामिळनाडू विधानसभेसाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान होत आहे. यासाठी तामिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे. येथे सत्ताधारी अण्णाद्रमुक विरुद्ध द्रमुक, असा मुख्य सामना असून भाजप, काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. देशभरात विजयी घोडदौड करणाऱ्या भाजपला येथील द्रविडी राजकारणात शिरकाव करता आलेला नाही.

तामिळनाडूच्या सत्तेतून काँग्रेस १९६९ मध्ये बाहेर झाल्यानंतर गेल्या ५० वर्षांत प्रमुख राष्ट्रीय पक्षांना येथे स्थिरावता आलेले नाही. २०१६ मध्ये २३४ जागा लढ‌वणाऱ्या भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. भाजपला अवघी २.८० टक्के (१२ लाख ३५ हजार) मते मिळाली होती. द्रमुकसोबत आघाडी करून ४१ जागा लढविणाऱ्या काँग्रेसला अवघ्या ७ जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला ६.४७ टक्के (२७ लाख ७४ हजार) मते मिळाली होती. बसपा, माकप, भाकप यांनादेखील एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी अण्णाद्रमुक व द्रमुक या पक्षांमध्येच खरी लढत होणार असून, फक्त मतविभागणी टाळण्यासाठी राष्ट्रीय पक्षांना सोबत घेतले जात असल्याचे चित्र आहे.

२०२१ मधील निवडणूक ही वैचारिक निवडणूक असून, द्रविडी राजकारण टिकवणे आवश्यक आहे, असे वातावरण राज्यात निर्माण केले जात आहे. या धारणेला तामिळी लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता. यावेळीदेखील राष्ट्रीय पक्षांना अवघ्या काही जागांवर समाधान मानावे लागेल, अशी चिन्हे आहेत. काँग्रेस, भाजप आपल्या सहकारी पक्षाकडून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे फारशा जागा देण्यास तयार नाहीत. त्याचप्रमाणे दोन्ही आघाड्यांमध्ये इतर पक्षांची संख्यादेखील जास्त असल्यामुळे घटक पक्षांना फारशा जागा मिळणार नाहीत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पक्षांना मिळणाऱ्या जागा वाढवत आपले अस्तित्व टिकवावे लागणार आहे.

आर्य विरुद्ध द्रविडी

आगामी निवडणूक ही आर्याचे आक्रमण विरुद्ध द्रविडी अस्था यांच्यातील लढाई असल्याचे सांगत द्रमुकचे प्रमुख ए.के. स्टॅलिन यांनी आपली राजकीय भूमिका काय असेल, हे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे अण्णाद्रमुक पक्षानेदेखील यावेळी इतर वेळच्या तुलनेत जास्त आक्रमकपणे द्रविडी राजकारण सुरू केले आहे. भाजपच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी द्रविडी आस्थेवर सर्व प्रचार सुरू असल्याचे चित्र सध्या तामिळनाडूमध्ये दिसून येत आहे. सोशल मीडियावरदेखील संघीय राजकारणाविरुद्ध एकसूत्री राजकारण, असे वातावरण निर्माण केले जात आहे.