शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई

By admin | Updated: February 11, 2017 00:40 IST

सोयीचे, कुरघोडीचे राजकारण नडले : गतवेळचे संख्याबळ गाठताना उडणार दमछाक

राजाराम लोंढे ---कोल्हापूर --एकेकाळी जिल्ह्यातील सर्वच सत्ताकेंद्रे ताब्यात असणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. नेत्यांचे सोयीचे राजकारण व अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकल्याने ताकदवान घड्याळाची टिकटिक बंद पडते की काय, अशी भीती कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. चार तालुक्यांतच ताकद असणाऱ्या राष्ट्रवादीची गतवेळचे १६ हे संख्याबळ गाठताना पुरती दमछाक उडणार आहे. कॉँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या पाठीशी कोल्हापूर जिल्हा खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळेच १९९९ ला पक्षाचे आयुष्य जेमतेम १४ दिवसांचे असतानाही या जिल्ह्यातील जनतेने पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवून पाच चिन्हांवर, तर दोन पुरस्कृत आमदार व दोन खासदार निवडून दिले. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक, दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर व निवेदिता माने यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ‘घड्याळ’ पोहोचविले. त्यानंतर २००२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. २००४ लाही पक्षाचे चार व एक पुरस्कृत आमदार व दोन खासदार निवडून आले. या कालावधीत तुलनात्मकदृष्ट्या पक्षाची काहीशी पडझड झाली असली तरी नेत्यांनी दुरुस्त्या केल्याने पुन्हा जिल्हा परिषदेवर सत्ता आणलीच; पण त्याबरोबर जिल्हा बॅँक, बाजार समितीसह बहुतांश साखर कारखाने ताब्यात ठेवण्यात यश मिळविले; पण २००९ नंतर खऱ्या अर्थाने पक्षाला घरघर लागली. मंडलिक-मुश्रीफ यांचा वाद, खानविलकर पक्षापासून दूर गेले, निवेदिता माने यांचा पराभव या सगळ्यांची पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. सध्या पक्षाची अवस्था फारच केविलवाणी झाली आहे. ‘नंबर वन’ असणाऱ्या पक्षाला चिन्हावर कसेबसे ३८ उमेदवार उभे करता आले; त्यासाठीही पुरती दमछाक झाली. त्यातील करवीर, गगनबावडा, हातकणंगलेमधील जागा अक्षरश: ओढून-ताणूनच उभ्या केल्या आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत पक्षातून वजाबाकीच मोठ्या प्रमाणात झाली आहे. भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीलाच बसला. गोपाळराव पाटील, अशोक चराटी, बाळासाहेब नवणे, पी. जी. शिंदे, अरुण इंगवले, विठ्ठलराव नाईक, अशोक माने, धनाजी जगदाळे, रामचंद्र डांगे यांनी पक्षाला राम-राम करीत भाजपमध्ये, तर संग्रामसिंह कुपेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. धैर्यशील माने यांनी भाजपशी, तर मानसिंगराव गायकवाड यांनी शिवसेनेशी जवळीक केली आहे. ‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह पाटील, राजेखान जमादार या मंडळींनीही पक्षाचा नाद सोडला. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी एकहाती सत्ता स्थापन करील, असे म्हणणे काहीसे धाडसाचे होईल; पण गतवेळेचा १६चा आकडा गाठताना त्यांची दमछाक उडणार आहे.हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना ताकदीने निवडून आणले; पण महाडिक यांच्या सर्वपक्षीय राजकारणामुळे या दोघांतील मतभेदाची दरी वाढली. त्यात महाडिक यांनी महापालिका व नगरपालिका निवडणुकीत भाजप-ताराराणीला उघड मदत केल्याचा राग मुश्रीफ यांच्या मनात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच त्यांनी महाडिक यांच्याशी मतभेद असल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेसाठी ‘दक्षिण’मध्ये राष्ट्रवादी-भाजप आघाडीसाठी महाडिक आग्रही होते, पण त्याला मुश्रीफ यांनी विरोध केल्याने त्यांनी या निवडणुकीपासून अंगच काढून घेतले. चंदगडमधून ‘घड्याळ’ गायबचंदगडमध्ये पक्षाच्या आमदार असतानाही येथे पक्षाचे चिन्हच गायब झाले आहे. येथे आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी भाजपशी आघाडी केली असून, त्या माध्यमातून दोन जागा लढत आहेत. जिल्हा बॅँक, बाजार समितीत सूज!जिल्हा बॅँक व बाजार समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे सत्ताकेंद्रे दिसतात; पण येथील संचालकांचे बलाबल पाहिले तर सत्तेची सूज दिसते. मागील सभागृहांपेक्षा निम्मेही संचालक पक्षाचे नाहीत. मावळत्या सभागृहात राष्ट्रवादीचे बळ :गडहिंग्लज- ५, राधानगरी - ३, आजरा- २, हातकणंगले - २, भुदरगड - १,चंदगड- १, शिरोळ- १, गगनबावडा- १. करवीर, पन्हाळा, कागल, शाहूवाडी तालुक्यांत एकही जागा जिकंता आली नव्हती.