शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई

By admin | Updated: February 11, 2017 00:40 IST

सोयीचे, कुरघोडीचे राजकारण नडले : गतवेळचे संख्याबळ गाठताना उडणार दमछाक

राजाराम लोंढे ---कोल्हापूर --एकेकाळी जिल्ह्यातील सर्वच सत्ताकेंद्रे ताब्यात असणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. नेत्यांचे सोयीचे राजकारण व अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकल्याने ताकदवान घड्याळाची टिकटिक बंद पडते की काय, अशी भीती कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. चार तालुक्यांतच ताकद असणाऱ्या राष्ट्रवादीची गतवेळचे १६ हे संख्याबळ गाठताना पुरती दमछाक उडणार आहे. कॉँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या पाठीशी कोल्हापूर जिल्हा खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळेच १९९९ ला पक्षाचे आयुष्य जेमतेम १४ दिवसांचे असतानाही या जिल्ह्यातील जनतेने पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवून पाच चिन्हांवर, तर दोन पुरस्कृत आमदार व दोन खासदार निवडून दिले. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक, दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर व निवेदिता माने यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ‘घड्याळ’ पोहोचविले. त्यानंतर २००२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. २००४ लाही पक्षाचे चार व एक पुरस्कृत आमदार व दोन खासदार निवडून आले. या कालावधीत तुलनात्मकदृष्ट्या पक्षाची काहीशी पडझड झाली असली तरी नेत्यांनी दुरुस्त्या केल्याने पुन्हा जिल्हा परिषदेवर सत्ता आणलीच; पण त्याबरोबर जिल्हा बॅँक, बाजार समितीसह बहुतांश साखर कारखाने ताब्यात ठेवण्यात यश मिळविले; पण २००९ नंतर खऱ्या अर्थाने पक्षाला घरघर लागली. मंडलिक-मुश्रीफ यांचा वाद, खानविलकर पक्षापासून दूर गेले, निवेदिता माने यांचा पराभव या सगळ्यांची पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. सध्या पक्षाची अवस्था फारच केविलवाणी झाली आहे. ‘नंबर वन’ असणाऱ्या पक्षाला चिन्हावर कसेबसे ३८ उमेदवार उभे करता आले; त्यासाठीही पुरती दमछाक झाली. त्यातील करवीर, गगनबावडा, हातकणंगलेमधील जागा अक्षरश: ओढून-ताणूनच उभ्या केल्या आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत पक्षातून वजाबाकीच मोठ्या प्रमाणात झाली आहे. भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीलाच बसला. गोपाळराव पाटील, अशोक चराटी, बाळासाहेब नवणे, पी. जी. शिंदे, अरुण इंगवले, विठ्ठलराव नाईक, अशोक माने, धनाजी जगदाळे, रामचंद्र डांगे यांनी पक्षाला राम-राम करीत भाजपमध्ये, तर संग्रामसिंह कुपेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. धैर्यशील माने यांनी भाजपशी, तर मानसिंगराव गायकवाड यांनी शिवसेनेशी जवळीक केली आहे. ‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह पाटील, राजेखान जमादार या मंडळींनीही पक्षाचा नाद सोडला. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी एकहाती सत्ता स्थापन करील, असे म्हणणे काहीसे धाडसाचे होईल; पण गतवेळेचा १६चा आकडा गाठताना त्यांची दमछाक उडणार आहे.हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना ताकदीने निवडून आणले; पण महाडिक यांच्या सर्वपक्षीय राजकारणामुळे या दोघांतील मतभेदाची दरी वाढली. त्यात महाडिक यांनी महापालिका व नगरपालिका निवडणुकीत भाजप-ताराराणीला उघड मदत केल्याचा राग मुश्रीफ यांच्या मनात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच त्यांनी महाडिक यांच्याशी मतभेद असल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेसाठी ‘दक्षिण’मध्ये राष्ट्रवादी-भाजप आघाडीसाठी महाडिक आग्रही होते, पण त्याला मुश्रीफ यांनी विरोध केल्याने त्यांनी या निवडणुकीपासून अंगच काढून घेतले. चंदगडमधून ‘घड्याळ’ गायबचंदगडमध्ये पक्षाच्या आमदार असतानाही येथे पक्षाचे चिन्हच गायब झाले आहे. येथे आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी भाजपशी आघाडी केली असून, त्या माध्यमातून दोन जागा लढत आहेत. जिल्हा बॅँक, बाजार समितीत सूज!जिल्हा बॅँक व बाजार समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे सत्ताकेंद्रे दिसतात; पण येथील संचालकांचे बलाबल पाहिले तर सत्तेची सूज दिसते. मागील सभागृहांपेक्षा निम्मेही संचालक पक्षाचे नाहीत. मावळत्या सभागृहात राष्ट्रवादीचे बळ :गडहिंग्लज- ५, राधानगरी - ३, आजरा- २, हातकणंगले - २, भुदरगड - १,चंदगड- १, शिरोळ- १, गगनबावडा- १. करवीर, पन्हाळा, कागल, शाहूवाडी तालुक्यांत एकही जागा जिकंता आली नव्हती.