शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आधार केंद्रे आता सरकारी कार्यालयात, १६ कीट जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:18 IST

आधार केंद्रांतून भरमसाट पैसे आकारून नागरिकांची लुबाडणूक होत आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांसह खासदार, आमदारांकडून शासन व प्रशासनाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना चाप बसण्याकरिता ही खासगी जागेतील आधार केंद्रे बंद करून ती सरकारी जागेत स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १६ कीट जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहेत. ही कार्यवाही अशाच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआधार केंद्रे आता सरकारी कार्यालयात, १६ कीट जमा : गैरप्रकारांना चाप बसण्यासाठी कार्यवाही

कोल्हापूर : आधार केंद्रांतून भरमसाट पैसे आकारून नागरिकांची लुबाडणूक होत आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांसह खासदार, आमदारांकडून शासन व प्रशासनाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांना चाप बसण्याकरिता ही खासगी जागेतील आधार केंद्रे बंद करून ती सरकारी जागेत स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास १६ कीट जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहेत. ही कार्यवाही अशाच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे.जिल्ह्यात महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून जवळपास ८० आधारकेंद्रे सुरू आहेत. या केंद्रांचे कीट सरकारी असून, ते जिल्हा प्रशासनाने दिले आहे. या खासगी केंद्रातून जादा पैसे आकारले जात असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. ही खासगी केंद्रे काढून घेऊन ती शासनाच्या माध्यमातून चालवावीत, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधितांना आधार केंद्रांचे कीट जमा करण्याबाबत गेल्या सहा महिन्यांपूर्वी कळवून पाठपुरावा सुरू ठेवला; परंतु त्यांच्याकडून ही बाब गांभीर्याने घेण्यात आली नव्हती.

पुन्हा याबाबत तक्रारी वाढू लागल्याने माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून किट जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आतापर्यंत जवळपास १६ आधार केंद्रांची किट जमा करण्यात आली आहेत. हे किट जमा करून सर्व शासकीय कार्यालयात आधार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये आल्यावर त्यावर नियंत्रण राहणार असून मनमानी पैसे घेणाऱ्यांवर चाप बसेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे. त्यामुळे ही कार्यवाही इथून पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.कार्यालयाबाहेर असणार दरपत्रकखासगी आधार केंद्रातून होणारी लूट थांबविण्यासाठी ही केंद्रेच शासकीय कार्यालयांमध्ये स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कार्यालयांमध्ये ही केंद्रे आल्यावर बाहेर आधार कार्डाचे दरपत्रकच लावले जाणार आहे. त्या व्यतिरिक्त जादा पैसे घेणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रारही करता येणार आहे. 

आधार केंद्रातून जादा पैसे घेत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर त्यावर अंकुश राहण्यासाठी या केंद्रातील कीट जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोईसाठी येत्या आठ-दहा दिवसांत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न राहील.- संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डkolhapurकोल्हापूर