शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महापुराचे विघ्न कायम, पंचगंगा इशारा पातळी ओलांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 17:05 IST

सकाळी पावसाचा जोर ओसरल्याने महापुराचे समोर उभे ठाकलेले विघ्न गणपतीबाप्पाच्या साक्षीने दूर होईल या आशेवर दुपारनंतर पाणी फिरले. पावसाचा जोर वाढत गेल्याने सकाळी बंद झालेला राधानगरी धरणाचा एक दरवाजा दुपारी पुन्हा उघडला.

ठळक मुद्देमहापुराचे विघ्न कायम, पंचगंगा इशारा पातळी ओलांडणार६५ बंधारे पाण्याखाली, एनडीआरएफ पथक तैनात

कोल्हापूर: सकाळी पावसाचा जोर ओसरल्याने महापुराचे समोर उभे ठाकलेले विघ्न गणपतीबाप्पाच्या साक्षीने दूर होईल या आशेवर दुपारनंतर पाणी फिरले. पावसाचा जोर वाढत गेल्याने सकाळी बंद झालेला राधानगरी धरणाचा एक दरवाजा दुपारी पुन्हा उघडला.

चार दरवाजातून ७११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती ३७ फुटांवर पोहचली. महापुराची ३९ फुटाची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने नागरीकांमध्ये धास्ती वाढली असून भेदरलेल्या नागरीकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे.

६५ बंधारे पाण्याखाली गेल्याने २0 मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून गावांना पाण्याचा वेढा पडू लागला आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना पुराचा तडाखा बसणाऱ्या नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे.

शनिवारी गणेश विसर्जनाची लगबग सुरु असताना सकाळी पावसाने कांहीशी उघडीप दिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, पण दुपारनंतर मात्र पावसाने जोर पकडला. 

शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ५९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १२२ मि.मी पाऊस एकट्या गगनबावड्यात झाला आहे. सलग चौथ्या दिवशी तेथे अतिवृष्टी सुरु आहे. आजरा ७६, राधानगरी ६0, शाहूवाडी आणि चंदगड ५४, पन्हाळा ५२, कागल व गडहिग्लज ४२, करवीर २७ तर हातकणंगले व शिरोळमध्ये ६ ते ९ मि.मि पाऊस झाला आहे.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ सकाळी ८ वाजता ३५ फूटांवर असणारी पाणीपातळी दुपारी ४ वाजेपर्यंत ३७ फुटांवर पोहचली. बंधाऱ्यातून ४0 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यात दुपारनंतर आणखी वाढ झाली.

पुण्यात मदत व बचावकार्यासाठी आलेली एनडीआरएफची तीन पथके शिरोळ, करवीर तालुक्यात तैनात करण्यात आली. पुराचा तडाखा जास्त बसणाऱ्या चिखली, आंबेवाडी, कुरुंदवाड,निलेवाडी या शंभर टक्के बुडीत गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून नदीकाठच्या १२९ आणि पूरबाधीत ३६३ गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व यंत्रणा तैनात करण्याचे नियोजन जिल्हा आपत्ती विभागाकडून सुरु आहे.धरणातील विसर्ग (क्यूसेकमध्ये)

  • राधानगरी ७११२
  • वारणा १४८३५
  • तुळशी १५२१
  • कुंभी ९५0
  • कासारी ७५0
  • काळम्मावाडी १0000
  • कोयना४१५१४
  • अलमट्टी १४४३१३ 

२४ तासात झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)हातकणंगले ९, शिरोळ ६, पन्हाळा ५२, शाहूवाडी ५४, राधानगरी ६0, गगनबावडा १२२, करवीर २७, कागल ४१, गडहिग्लज ४२, भूदरगड ५0, आजरा ७६, चंदगड ५३, एकूण ५९७ 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर