शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

बँकांची कर्जवसुली थंडावली

By admin | Updated: February 13, 2015 23:29 IST

निवडणुकांचा परिणाम : धोका नको म्हणून काहीसे दुर्लक्ष, कर्जदारही काहीसे निवांत

रमेश पाटील - कसबा बावडा -मार्च एंडिंग जवळ आला की, बँकांना कर्जे वसुलीची घाई लागते. परंतु, ज्या बँकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, अशा बँकांची कर्जवसुली मोहीम कासवाच्या गतीने सुरू आहे. थकीत कर्जदाराच्या मागे फारसा तगादा नाही. काही बँकांनी तर थकीत कर्जदाराला नोटिसा पाठविणे बंदच करून टाकले आहे. त्यामुळे कर्जदारही काहीसे निवांत आहेत. जिल्ह्यातील अर्धा डजनहून अधिक बँकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. कर्जाची वसुली करून ‘एनपीए’ खाली आणणे हे सध्या सर्वच बँकांपुढे मोठे आव्हान होऊन बसले आहे. नोटिसा पाठवूनही कर्जदार कर्ज भरत नसल्याने बँकांनी मोठ्या कर्मचारी संख्येने कर्जदाराच्या दारात जाऊन, घेराव घालून वसुली मोहीम सुरू ठेवली आहे. मात्र, याला निवडणुका जाहीर झालेल्या बँकांपैकी काही बँका अपवाद ठरल्या आहेत. उगाच निवडणुकीत ‘रिस्क’ नको म्हणून त्यांनी कर्जवसुलीकडे काहीसे दुर्लक्ष केले आहे. कर्जदार स्वत:हून आला आणि कर्ज भरले तर भरून घ्या, अशा तोंडी सूचना काही बँकांनी केल्या आहेत. एका सभासदाला कर्ज देताना दोन सभासद जामीनदार लागतात. त्यामुळे प्रत्येक थकीत कर्जदाराला जेव्हा नोटीस पाठवली जाते, तेव्हा दोन जामीनदारांनाही नोटिसा पाठवण्यात येतात. त्यामुळे आपला काही संबंध नसताना घराकडे नोटीस आल्यावर जामीनदार संतप्त होतात. याचा आपल्या मतदानावर परिणाम कोठेही होऊ नये, यासाठी सध्या मेंबर कर्जदाराच्या मागे बँका लागायच्या थांबल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बँकांबरोबरच विकास सेवा संस्था, पतसंस्था, साखर कारखाने यांच्याही निवडणुका लागल्या आहेत. बँकांप्रमाणे विकास संस्था आणि पतसंस्था यांच्याही कर्जवसुलीवर काहीसा परिणाम होऊ लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत सभासद दुखावला जाता कामा नये, याकडे बहुतेक सहकारी संस्थांनी लक्ष दिले आहे.थकबाकी वाढणारनिवडणुकांमुळे कर्जे वसुलीकडे संस्थांनी दुर्लक्ष केल्यास त्यांची थकबाकी वाढण्याची शक्यता दाट आहे. कर्जवसुलीकडे दुर्लक्ष केल्याचा फायदा संचालकांना होईल. मात्र, संस्था तोट्यात जाण्यास हातभार लागेल, अशी भीती तज्ञांकडून व्यक्त होत आहे. कर्जे, ठेवी वाढवण्याच्या राष्ट्रीयीकृत बँकांना सूचनानिवडणुकांमुळे नागरी बँकांतली वसुली मोहीम थंडावली असली तरी मार्च एंडिंग जवळ आल्याने राष्ट्रीयीकृत बँकांचीही वसुली मोहीम जोरात सुरू झाली आहे. बँकांच्या प्रत्येक शाखेला १५ टक्के कर्ज वाढवण्याच्या व २० टक्के ठेवी वाढवण्याच्या सूचना व्यवस्थापनाने केल्या आहेत. त्याच्या तयारीसाठी बँक मॅनेजर केबीनमध्ये न बसता बाहेर पडत आहेत.