शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

बँकांची कर्जवसुली थंडावली

By admin | Updated: February 13, 2015 23:29 IST

निवडणुकांचा परिणाम : धोका नको म्हणून काहीसे दुर्लक्ष, कर्जदारही काहीसे निवांत

रमेश पाटील - कसबा बावडा -मार्च एंडिंग जवळ आला की, बँकांना कर्जे वसुलीची घाई लागते. परंतु, ज्या बँकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, अशा बँकांची कर्जवसुली मोहीम कासवाच्या गतीने सुरू आहे. थकीत कर्जदाराच्या मागे फारसा तगादा नाही. काही बँकांनी तर थकीत कर्जदाराला नोटिसा पाठविणे बंदच करून टाकले आहे. त्यामुळे कर्जदारही काहीसे निवांत आहेत. जिल्ह्यातील अर्धा डजनहून अधिक बँकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. कर्जाची वसुली करून ‘एनपीए’ खाली आणणे हे सध्या सर्वच बँकांपुढे मोठे आव्हान होऊन बसले आहे. नोटिसा पाठवूनही कर्जदार कर्ज भरत नसल्याने बँकांनी मोठ्या कर्मचारी संख्येने कर्जदाराच्या दारात जाऊन, घेराव घालून वसुली मोहीम सुरू ठेवली आहे. मात्र, याला निवडणुका जाहीर झालेल्या बँकांपैकी काही बँका अपवाद ठरल्या आहेत. उगाच निवडणुकीत ‘रिस्क’ नको म्हणून त्यांनी कर्जवसुलीकडे काहीसे दुर्लक्ष केले आहे. कर्जदार स्वत:हून आला आणि कर्ज भरले तर भरून घ्या, अशा तोंडी सूचना काही बँकांनी केल्या आहेत. एका सभासदाला कर्ज देताना दोन सभासद जामीनदार लागतात. त्यामुळे प्रत्येक थकीत कर्जदाराला जेव्हा नोटीस पाठवली जाते, तेव्हा दोन जामीनदारांनाही नोटिसा पाठवण्यात येतात. त्यामुळे आपला काही संबंध नसताना घराकडे नोटीस आल्यावर जामीनदार संतप्त होतात. याचा आपल्या मतदानावर परिणाम कोठेही होऊ नये, यासाठी सध्या मेंबर कर्जदाराच्या मागे बँका लागायच्या थांबल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बँकांबरोबरच विकास सेवा संस्था, पतसंस्था, साखर कारखाने यांच्याही निवडणुका लागल्या आहेत. बँकांप्रमाणे विकास संस्था आणि पतसंस्था यांच्याही कर्जवसुलीवर काहीसा परिणाम होऊ लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत सभासद दुखावला जाता कामा नये, याकडे बहुतेक सहकारी संस्थांनी लक्ष दिले आहे.थकबाकी वाढणारनिवडणुकांमुळे कर्जे वसुलीकडे संस्थांनी दुर्लक्ष केल्यास त्यांची थकबाकी वाढण्याची शक्यता दाट आहे. कर्जवसुलीकडे दुर्लक्ष केल्याचा फायदा संचालकांना होईल. मात्र, संस्था तोट्यात जाण्यास हातभार लागेल, अशी भीती तज्ञांकडून व्यक्त होत आहे. कर्जे, ठेवी वाढवण्याच्या राष्ट्रीयीकृत बँकांना सूचनानिवडणुकांमुळे नागरी बँकांतली वसुली मोहीम थंडावली असली तरी मार्च एंडिंग जवळ आल्याने राष्ट्रीयीकृत बँकांचीही वसुली मोहीम जोरात सुरू झाली आहे. बँकांच्या प्रत्येक शाखेला १५ टक्के कर्ज वाढवण्याच्या व २० टक्के ठेवी वाढवण्याच्या सूचना व्यवस्थापनाने केल्या आहेत. त्याच्या तयारीसाठी बँक मॅनेजर केबीनमध्ये न बसता बाहेर पडत आहेत.