शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कोल्हापूर शहरात गर्दीच्या वेळीच अवजड वाहनांना बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:47 IST

कोल्हापूर शहरात सकाळी १0 ते ११ आणि सायंकाळी पाच ते सहा या अधिक रहदारी आणि गर्दीवेळीच अवजड वाहनांना बंदी घालावी. इतर वेळेत या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी गांधीनगर गुडस् मोटार मालक संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना दिले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात गर्दीच्या वेळीच अवजड वाहनांना बंदी घालाइतर वेळेत सवलत द्यावी; गांधीनगर गुडस् मोटारमालक संघाची मागणी

कोल्हापूर : शहरात सकाळी १0 ते ११ आणि सायंकाळी पाच ते सहा या अधिक रहदारी आणि गर्दीवेळीच अवजड वाहनांना बंदी घालावी. इतर वेळेत या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी गांधीनगर गुडस् मोटार मालक संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना दिले.शहरामध्ये अवजड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत प्रवेश बंद केल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. ही वेळ खूपच अवघड आणि त्रासदायक आहे; कारण, सकाळी नऊ वाजता कोणताही व्यापारी दुकान उघडत नाही.

रात्री नऊवाजेपर्यंत दुकान सुरू ठेवत नाही; त्यामुळे ही वेळ पूर्णत: चुकीची आहे; त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना डोअर डिलेव्हरी देणे अशक्य झाले आहे. कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांना रोज साखर, चहा, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या ट्रान्सपोर्टधारकांकडून पुरविल्या जातात.

सध्या प्रायोगिक तत्त्वावरील वेळ ही अवजड वाहनांसाठी कायमस्वरूपी निश्चित केल्यास कोल्हापूरमधील ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत येऊ शकतो; त्यामुळे सध्याच्या सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेमध्ये बदल करून, अधिक रहदारी आणि गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घालावी.

इतर वेळेमध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष आयुब मुजावर, खजानीस संतोष तावडे, संचालक अनुप महाजन, विक्रम शिंदे, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर