शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कोल्हापूर शहरात गर्दीच्या वेळीच अवजड वाहनांना बंदी घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:47 IST

कोल्हापूर शहरात सकाळी १0 ते ११ आणि सायंकाळी पाच ते सहा या अधिक रहदारी आणि गर्दीवेळीच अवजड वाहनांना बंदी घालावी. इतर वेळेत या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी गांधीनगर गुडस् मोटार मालक संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना दिले.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात गर्दीच्या वेळीच अवजड वाहनांना बंदी घालाइतर वेळेत सवलत द्यावी; गांधीनगर गुडस् मोटारमालक संघाची मागणी

कोल्हापूर : शहरात सकाळी १0 ते ११ आणि सायंकाळी पाच ते सहा या अधिक रहदारी आणि गर्दीवेळीच अवजड वाहनांना बंदी घालावी. इतर वेळेत या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी गांधीनगर गुडस् मोटार मालक संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांना दिले.शहरामध्ये अवजड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत प्रवेश बंद केल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. ही वेळ खूपच अवघड आणि त्रासदायक आहे; कारण, सकाळी नऊ वाजता कोणताही व्यापारी दुकान उघडत नाही.

रात्री नऊवाजेपर्यंत दुकान सुरू ठेवत नाही; त्यामुळे ही वेळ पूर्णत: चुकीची आहे; त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना डोअर डिलेव्हरी देणे अशक्य झाले आहे. कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांना रोज साखर, चहा, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या ट्रान्सपोर्टधारकांकडून पुरविल्या जातात.

सध्या प्रायोगिक तत्त्वावरील वेळ ही अवजड वाहनांसाठी कायमस्वरूपी निश्चित केल्यास कोल्हापूरमधील ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत येऊ शकतो; त्यामुळे सध्याच्या सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेमध्ये बदल करून, अधिक रहदारी आणि गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी घालावी.

इतर वेळेमध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष आयुब मुजावर, खजानीस संतोष तावडे, संचालक अनुप महाजन, विक्रम शिंदे, आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर