शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध; १८ गावे कडकडीत बंद, पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी 

By भारत चव्हाण | Updated: October 12, 2023 16:38 IST

सुळकुडचं पाणी देणार नाही, मग आम्हाला कशाला सांगता?

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला शहरालगतच्या अठरा गावातील ग्रामस्थांनी कडकडीत ‘गांव बंद’ आंदोलन करुन विरोध केला. गांव बंद आंदोलनात सहभागी झालेल्या गावातील सरपंच, उपसरपंच तसेच सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दुपारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची भेट घेऊन हद्दवाढीला आपला तीव्र विरोध असल्याचे सांगितले. तसेच विरोध असतानाही एकतर्फी निर्णय घेऊन जर निर्णय घेतलाच तर याहीपेक्षा उग्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा दिला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय गेल्या काही दिवसापासून गाजत आहे. एकीकडे शहरातून हद्दवाढीची मागणी होत आहे, तर दुसरीकडे ग्रामिण भागातून या हद्दवाढीला तीव्र विरोध होत आहे. चार दिवसापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली तेंव्हा शहरालगतची काही गावे घेऊन हद्दवाढ करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचे तीव्र पडसाद अठरा गावातून उमटले. सोमवारी मेळावा घेऊन सर्वांनी ठामपणे विरोध करण्याचा तसेच गुरुवारी गांव बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार उचगांव, कळंबा, पाचगांव, मोरेवाडी, गांधीनगर, मुडशिंगी, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगांव, शिरोली, वडणगे, नागदेववाडी, बालिंगा, शिंगणापूर, पीरवाडी, नागाव, वळीवडे, आंबेवाडी येथील ग्रामस्थांनी आपले गांव बंद ठेऊन हद्दवाढीला विरोध केला. काही गावातून प्रमुख कार्यकर्त्यांनी गावातून निषेध फेरी काढून व्यवहार बंद ठेवण्याचे गावकऱ्यांना आवाहन केले. त्यामुळे गावातील मेडिकल दुकाने वगळता शाळा, दुकाने, कारखाने, भाजी मंडई, सलून दुकाने, भांड्याची, कपड्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. एरव्ही गजबजलेला गावगाडा गुरुवारी मात्र शांत दिसत होता. रस्ते ओस पडले होते.

आम्ही समाधानी, शहरात येण्याचा प्रश्नच नाहीदरम्यान, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अठरा गावातील सरपंच, उपसरपंच तसेच सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही वेळ निदर्शने केली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अठरा गावांचा शहराच्या हद्दवाढीत समाविष्ट होण्यास तीव्र विरोध असल्याचे सांगितले. आमच्या ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य सरकारकडून थेट निधी येतो. त्यामुळे आम्ही आमच्या गावांचा विकास करण्यास सक्षम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.शहरात नागरी सुविधांची वाणवाशहरातील नागरी सुविधांची दुरावस्था तसेच ग्रामिण भागातील विकास कामे यातील फरकही जिल्हाधिकाऱ्यांना पटवून देण्यात आले. काेल्हापूर शहरात कचरा उठाव होत नाही, पाणी पुरवठ्याची व्यवस्था नीट होत नाही. रस्ते अतिशय खराब झाले आहेत. नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्यात महापालिकेला अडचणी येत आहेत. अशा परिस्थीतीत आमची गावे शहरात समाविष्ट करणे योग्य नाही, असेही शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

सुळकुडचं पाणी देणार नाही, मग आम्हाला कशाला सांगता?

पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सुळकुड येथून इचलकरंजी शहराला पाणी देणार नाही, असे सांगत आहेत. जर ही योजना राबविली तर रक्ताचे पाट वाहतील असा इशाराही त्यांनी दिला होता. पालकमंत्री कागलचे आहेत की कोल्हापूरचे? जर पालकमंत्री सुळकुडचं पाणी देणार नसतील तर त्यांना आमच्यावर जबरदस्ती करण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल उचगांवचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी उपस्थित केला.तर जिल्हाधिकारी कार्यालयास घेरावजर आमच्या भावनेचा विचार केला नाही, आणि एकतर्फी हद्दवाढ करण्याचा निर्णय घेतला तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. मग आमरण उपोषण, मोर्चे, जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव यासारखे आंदोलन असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात सरपंच मधुकर चव्हाण (उचगांव), सुमन गुरव (कळंबा), प्रियांका पाटील (पाचगांव), आनंदा कांबळे (मोरेवाडी), संदीप पाटाेळे (गांधीनगर), अश्विनी शिरगांवे ( मुडशिंगी), उत्तम बांबवडे (उजळाईवाडी), शुभांगी आडसुळ (सरनोबतवाडी), चंद्रकांत डावरे( गोकुळ शिरगांव), संगीता पाटील (वडणगे), रसिका पाटील (शिंगणापूर), संदीप मिठारी (पीरवाडी), यांच्यासह बालिंगा व नागदेववाडी सरपंचांचा समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्री