शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कोल्हापुरात फटाक्यांवर बंदी, वाजविल्यास २ हजार, साठा केल्यास १० हजार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:49 IST

Banfirecrackers, Kolhapur, NationalGreenArbitration वायू प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशातील १0७ शहरांमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोविड काळात हे प्रदूषण वाढणार, याची काळजी घेण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कोल्हापूरची दिल्ली होण्याची धोक्याची घंटा वाजली आहे. आदेश डावलून फटाके वाजविल्यास दोन हजार रुपये दंड, तर त्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दंड होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने फटाकेमुक्त होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात फटाक्यांवर बंदी, राष्ट्रीय हरित लवादाचा दणका वाजविल्यास २ हजार, साठा केल्यास १० हजार दंड

कोल्हापूर : वायू प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशातील १0७ शहरांमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोविड काळात हे प्रदूषण वाढणार, याची काळजी घेण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कोल्हापूरची दिल्ली होण्याची धोक्याची घंटा वाजली आहे. आदेश डावलून फटाके वाजविल्यास दोन हजार रुपये दंड, तर त्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दंड होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने फटाकेमुक्त होणार आहे.प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशभरातील शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश असल्याचा अहवाल नॅशनल एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) या संस्थेने २0१८ मध्येच दिला आहे. कोविड विषाणू फैलावू नये म्हणून हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत या शहरांमध्ये उपाययोजना कराव्यात आणि प्रामुख्याने फटाक्यांवर या शहरांत बंदी घालावी अशी सूचना न्यायालयाने केली आहे. कोल्हापुरातही स्थानिक प्रशासनाने यावर उपाय करावेत असे सुचविण्यात आले आहे.कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनीही प्रदूषणाविरोधात यापूर्वीच मोहीम उघडली आहे, परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. कोल्हापुरातील हवेत धूर आणि धुकं यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. यामागे अनेक कारणे आहेत. वणवे लावणे, शेती पेटवून देणे, चिपाडे पेटवणे, उद्योग धंदे आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या हे वायूप्रदूषणाला कारण ठरतात. याची संख्या कोल्हापुरात अधिक आहे.कार्बन डाय ऑक्साईड आणि नायट्रोक्सॉईड यांचे प्रमाण वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरते. हेच कारण जागतिक तापमान वाढीलाही कारणीभूत आहे. याशिवाय कार्बन मोनोक्सॉईडमुळेही प्रदूषण होते. ते प्रामुख्याने माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. हे प्रमाण कमी करण्याबाबत उपाययोजना आखल्या पाहिजेत.

कोविड काळात फटाक्यांच्या वापरामुळे वायूप्रदूषणात जर वाढ झाली, तर श्वसन विकार व इतर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता गृहीत धरून फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही उपाययोजना कोल्हापुरात राबविली नाही तर भविष्यात कोल्हापूरची दिल्ली होण्याचा धोका आहे. या निकालामुळे ही धोक्याची घंटा वाजलेली आहे.- डॉ. मधुकर बाचुळकर, पर्यावरण अभ्यासक.

टॅग्स :fire crackerफटाकेkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय