शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

कोल्हापुरात फटाक्यांवर बंदी, वाजविल्यास २ हजार, साठा केल्यास १० हजार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:49 IST

Banfirecrackers, Kolhapur, NationalGreenArbitration वायू प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशातील १0७ शहरांमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोविड काळात हे प्रदूषण वाढणार, याची काळजी घेण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कोल्हापूरची दिल्ली होण्याची धोक्याची घंटा वाजली आहे. आदेश डावलून फटाके वाजविल्यास दोन हजार रुपये दंड, तर त्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दंड होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने फटाकेमुक्त होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात फटाक्यांवर बंदी, राष्ट्रीय हरित लवादाचा दणका वाजविल्यास २ हजार, साठा केल्यास १० हजार दंड

कोल्हापूर : वायू प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशातील १0७ शहरांमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोविड काळात हे प्रदूषण वाढणार, याची काळजी घेण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कोल्हापूरची दिल्ली होण्याची धोक्याची घंटा वाजली आहे. आदेश डावलून फटाके वाजविल्यास दोन हजार रुपये दंड, तर त्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दंड होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने फटाकेमुक्त होणार आहे.प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशभरातील शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश असल्याचा अहवाल नॅशनल एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) या संस्थेने २0१८ मध्येच दिला आहे. कोविड विषाणू फैलावू नये म्हणून हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत या शहरांमध्ये उपाययोजना कराव्यात आणि प्रामुख्याने फटाक्यांवर या शहरांत बंदी घालावी अशी सूचना न्यायालयाने केली आहे. कोल्हापुरातही स्थानिक प्रशासनाने यावर उपाय करावेत असे सुचविण्यात आले आहे.कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनीही प्रदूषणाविरोधात यापूर्वीच मोहीम उघडली आहे, परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. कोल्हापुरातील हवेत धूर आणि धुकं यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. यामागे अनेक कारणे आहेत. वणवे लावणे, शेती पेटवून देणे, चिपाडे पेटवणे, उद्योग धंदे आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या हे वायूप्रदूषणाला कारण ठरतात. याची संख्या कोल्हापुरात अधिक आहे.कार्बन डाय ऑक्साईड आणि नायट्रोक्सॉईड यांचे प्रमाण वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरते. हेच कारण जागतिक तापमान वाढीलाही कारणीभूत आहे. याशिवाय कार्बन मोनोक्सॉईडमुळेही प्रदूषण होते. ते प्रामुख्याने माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. हे प्रमाण कमी करण्याबाबत उपाययोजना आखल्या पाहिजेत.

कोविड काळात फटाक्यांच्या वापरामुळे वायूप्रदूषणात जर वाढ झाली, तर श्वसन विकार व इतर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता गृहीत धरून फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही उपाययोजना कोल्हापुरात राबविली नाही तर भविष्यात कोल्हापूरची दिल्ली होण्याचा धोका आहे. या निकालामुळे ही धोक्याची घंटा वाजलेली आहे.- डॉ. मधुकर बाचुळकर, पर्यावरण अभ्यासक.

टॅग्स :fire crackerफटाकेkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय