शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोल्हापुरात फटाक्यांवर बंदी, वाजविल्यास २ हजार, साठा केल्यास १० हजार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:49 IST

Banfirecrackers, Kolhapur, NationalGreenArbitration वायू प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशातील १0७ शहरांमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोविड काळात हे प्रदूषण वाढणार, याची काळजी घेण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कोल्हापूरची दिल्ली होण्याची धोक्याची घंटा वाजली आहे. आदेश डावलून फटाके वाजविल्यास दोन हजार रुपये दंड, तर त्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दंड होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने फटाकेमुक्त होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात फटाक्यांवर बंदी, राष्ट्रीय हरित लवादाचा दणका वाजविल्यास २ हजार, साठा केल्यास १० हजार दंड

कोल्हापूर : वायू प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशातील १0७ शहरांमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोविड काळात हे प्रदूषण वाढणार, याची काळजी घेण्याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कोल्हापूरची दिल्ली होण्याची धोक्याची घंटा वाजली आहे. आदेश डावलून फटाके वाजविल्यास दोन हजार रुपये दंड, तर त्याचा साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना दहा हजार रुपये दंड होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने फटाकेमुक्त होणार आहे.प्रदूषणात आघाडीवर असणाऱ्या देशभरातील शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश असल्याचा अहवाल नॅशनल एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) या संस्थेने २0१८ मध्येच दिला आहे. कोविड विषाणू फैलावू नये म्हणून हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत या शहरांमध्ये उपाययोजना कराव्यात आणि प्रामुख्याने फटाक्यांवर या शहरांत बंदी घालावी अशी सूचना न्यायालयाने केली आहे. कोल्हापुरातही स्थानिक प्रशासनाने यावर उपाय करावेत असे सुचविण्यात आले आहे.कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनीही प्रदूषणाविरोधात यापूर्वीच मोहीम उघडली आहे, परंतु त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. कोल्हापुरातील हवेत धूर आणि धुकं यांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. यामागे अनेक कारणे आहेत. वणवे लावणे, शेती पेटवून देणे, चिपाडे पेटवणे, उद्योग धंदे आणि मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या हे वायूप्रदूषणाला कारण ठरतात. याची संख्या कोल्हापुरात अधिक आहे.कार्बन डाय ऑक्साईड आणि नायट्रोक्सॉईड यांचे प्रमाण वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरते. हेच कारण जागतिक तापमान वाढीलाही कारणीभूत आहे. याशिवाय कार्बन मोनोक्सॉईडमुळेही प्रदूषण होते. ते प्रामुख्याने माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. हे प्रमाण कमी करण्याबाबत उपाययोजना आखल्या पाहिजेत.

कोविड काळात फटाक्यांच्या वापरामुळे वायूप्रदूषणात जर वाढ झाली, तर श्वसन विकार व इतर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता गृहीत धरून फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही उपाययोजना कोल्हापुरात राबविली नाही तर भविष्यात कोल्हापूरची दिल्ली होण्याचा धोका आहे. या निकालामुळे ही धोक्याची घंटा वाजलेली आहे.- डॉ. मधुकर बाचुळकर, पर्यावरण अभ्यासक.

टॅग्स :fire crackerफटाकेkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय