शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

बेडगमध्ये रंगला बालसाहित्यिकांचा मेळा!

By admin | Updated: January 10, 2015 00:19 IST

विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती : ग्रंथदिंडी, कथाकथन, मुलाखतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रवीण जगताप - लिंगनूर समाज उभारणीचे सर्जनात्मक कार्य लेखणीतून घडते. परिसरातील घटनांकडे संवेदनशीलतेने पाहिल्यास कविता जन्माला येते. गरिबी, दुष्काळ, अंधश्रद्धा या समस्यांचे व समाजमनाचे प्रतिबिंब साहित्यात का उमटू शकत नाही, या भावनेने प्रेरित होऊन त्याचे उत्तर शोधताना सामान्य माणूस लेखणीतून साहित्यात आला, असे प्रतिपादन सुरसगाव (जि. जळगाव) येथील ज्येष्ठ कवी अशोक कौतिक कोळी यांनी केले.बेडग (ता. मिरज) येथे आयोजित मिरज तालुक्याच्या दुसऱ्या विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या पहिल्या सत्रात बालमुलाखतकार शिवानी चौगुले (सोनी), सीमरन जमादार (मौजे डिग्रज), सिराज मुजावर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी कोळी यांनी भावविश्व उलगडले.संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याने झाली. लेझीम, टाळ, टिपऱ्या, वारकरी वेशभूषा, दिंडी नृत्य, सांस्कृतिक वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा, झांज, फुगडी व विविध सांस्कृतिक नृत्य व खेळांचे प्रकार ग्रंथदिंडीची शोभा वाढवित होते. गावात मुख्य पेठेतील रस्त्याच्या बाजूने रांगोळ्या काढल्या होत्या. ग्रंथदिंडी साहित्यनगरीत येताच सभामंडपात बालरसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यानंतर सभापती दिलीप बुरसे, शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे, गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे, कवी अशोक कोळी, संमेलनाध्यक्षा गायत्री पाटील, अ‍ॅड. के. डी. शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. स्वागताध्यक्ष वेदांत शहा याने स्वागत केले. संमेलनाध्यक्षा गायत्री पाटील म्हणाली की, या साहित्य संमेलनातून लेखनकलेस प्रोत्साहन व दिशा मिळाली व कथा-कवितांच्या छंदाचे वास्तवात रूपांतर झाले. सकाळच्या सत्रात कवी कोळी यांची विविधांगी प्रश्नांसह प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी कोळी यांनी ‘चिमण्यांनो धीर धरा’ ही कविताही सादर केली. त्यानंतर कथाकथन सत्राचा अध्यक्ष हर्षवर्धन कांबळे याच्या उपस्थितीत कथाकथन पार पडले. दुपारच्या सत्रात काव्यसंमेलनाध्यक्ष सुमित माळी याच्या अध्यक्षतेखाली बालकवींनी काव्यरचना सादर केल्या. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव, भक्ती कदम, प्रतीक बिसुरे, निकिता चव्हाण यांनी केले.उपसभापती तृप्ती पाटील, सरपंच सुमनताई खरात, ििकरण गायकवाड, हरिभाऊ गावडे, पृथ्वीराज पाटील, अमर पाटील, साहित्यिक फारूक काझी, दयासागर बन्ने, संमेलनाचे प्रवर्तक गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी, पं. स. सदस्या राणी देवकारे, जयश्री कबुरे उपस्थित होते. संमेलनप्रमुख विस्तार अधिकारी गणेश भांबुरे, उल्हास सानप, विजय नागरगोजे, महादेव वनवे, रवींद्र केंचे, बाळासाहेब लिंबीकाई, विष्णू ओमासे यांनी संयोजन केले.कोणती कविता लाडकी ?कवी अशोक कोळी यांच्या मुलाखतीत, तुम्हाला सर्वात आवडती कविता कोणती? असा प्रश्न विचारला, तेव्हा ते म्हणाले, जसे आई-वडिलांना आपली सारीच मुले प्रिय असतात, तसे लेखणीतून उतरलेल्या साऱ्याच कविता कवीला प्रिय असतात..काव्यसंमेलनात एका बालकवीच्या ‘थंडी रे थंडी, डोक्यावर उभी राहिली केसाची शेंडी, थंडी रे थंडी, कोंबडीच्या पिलाने दिली झटक्यात बारा अंडी’ या विनोदी रचनेने रसिकांची दाद मिळविली.ग्रंथदिंडीत केंद्रप्रमुख, शिक्षक, शिक्षिका यांनी दिंडीनृत्य, फुगडी खेळून, नाचून सहभाग घेतला, तर पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे व सदस्य शंकर पाटील यांनी झांज खेळून ग्रंथदिंडीत सहभाग नोंदविला. लेझीम नृत्याने, विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकुसरींनी, तसेच विविध वेशभूषेतील बालकलाकारांनी प्रेक्षकांची गर्दी खेचली.