शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी जिजाऊंच्या नावाने बाेगस योजनेचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना काळात विधवा झालेल्यांना ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचे आमिष दाखविणाऱ्या जिजाऊ नावाने योजनेच्या मोबाईलवरील संदेशाने सध्या ...

कोल्हापूर : कोरोना काळात विधवा झालेल्यांना ५० हजार रुपयांचा लाभ देण्याचे आमिष दाखविणाऱ्या जिजाऊ नावाने योजनेच्या मोबाईलवरील संदेशाने सध्या धुमाकूळ घातला आहे. दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो गुजरातमध्ये लागतो. त्यामुळे फसवणुकीचे हे नेमके कनेक्शन काय आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. राज्यात शिवसेनेसह महाविकास आघाडीचे सरकार आणि जिजाऊंच्या नावाने योजना असल्याने लोकांना ती खरी आहे, असे वाटत आहे.

महिला बालकल्याण विभागाच्या नावाने बोगस योजनांची माहिती देऊन महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार आतापर्यंत भरपूर झाले आहेत. फसवणुकीबद्दल गुन्हेही दाखल झाले आहेत, तरीदेखील दरवर्षी मोठ्या व्यक्तीचे नाव घेऊन दरवर्षी योजना येते, तसे संदेश मोबाईलवर फिरतात, गावोगावी प्रचार केला जातो. यावर्षीदेखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून मोबाईलवर जिजाऊंच्या नावाने महिला बालकल्याण विभागाची योजना असल्याचा संदेश फिरत आहे. २१ ते ७० वयोगटातील महिलांना हा लाभ देणार आहे, असे म्हटले आहे. यासाठी १ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घरातील कर्त्या पुरुषाचे काेरोनामुळे निधन झाले असल्यास त्यांच्या विधवा पत्नींना ५० हजार रुपये दिले जातील, असे म्हटले आहे. संपर्कासाठी ७०१६१६९०४५ हा मोबाईल क्रमांकही दिला असून, पूजा रमेश पाटील ऊर्फ पूजा आकाश ठक्कर यांना संपर्क करावा, असे म्हटले आहे. ‘लोकमत’ने याची शहानिशा करण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला, तर त्याचे लोकेशन गुजरात दाखवते. शिवाय गुजराती ट्यून ऐकू येते. हा फोन स्वीच ऑफ आहे, असे गुजराती, हिंदी व इंग्रजीतून सांगितले जाते. यावरून त्याची बोगसगिरी उघड होते.

चौकट ०१

महिला बालकल्याण विभागाला फुकटचा मन:स्ताप

या योजनेच्याबाबतीत जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारणा करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. रोज किमान दहाहून जास्त फोन चौकशीसाठी येत आहेत. अशी कोणतीही योजना नाही, ती बोगस आहे, हे सांगण्यातच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जास्त वेळ जात आहे. काम कमी, मन:स्ताप जास्त, अशी परिस्थिती झाली आहे.

प्रतिक्रिया

अशाप्रकारची कोणतीही योजना राज्य सरकार, महिला बालकल्याण विभाग राबवत नाही. ही योजना पूर्णपणे बोगस आहे. महिलांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

सोमनाथ रसाळ,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी,

महिला बालकल्याण जिल्हा परिषद, कोल्हापूर.