शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘ब्याडगी,’ ‘जवारी’चा बाजारात ठसका

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

मिरची खरेदीसाठी झुंबड : साखरेची घसरण थांबेना; भाजीपालाही स्वस्त

कोल्हापूर : पावसाळ्यासाठी चटणी तयार करण्यासाठी गृहिणींची मिरची खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’ मिरची खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. त्याचबरोबर चटणीसाठी लागणारा मसाला व कोथिंबीर खरेदीसाठी आठवडी बाजारात गर्दी दिसत आहे. भाजीपाल्याचे दर घसरले असून, साखरेच्या दरातील घसरण थांबलेली नाही. खराब हवामानाचा फटका फळांच्या आवकेवर बसला आहे. पावसाळ्यात पुरेल एवढी चटणी एप्रिल, मे महिन्यांत अगोदरच करून ठेवली जाते. जानेवारीनंतर मिरचीची आवक वाढण्यास सुरुवात होते. सध्या बाजारात ‘ब्याडगी,’ ‘जवारी’ मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लालभडक ‘ब्याडगी’ जिभेला चटका देत असली तरी ‘जवारी’ मिरचीत ती मिसळली जातेच. हैदराबाद, कर्नाटकमधून सध्या मिरचीची आवक सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही भरपूर आहे. गेल्या वर्षीपेक्षा किलोमागे २० रुपये मिरचीचे दर घसरलेले आहेत. ‘ब्याडगी’चा दर प्रतिकिलो १३०, तर ‘जवारी’चा १०० रुपये आहे. चटणीसाठी लागणारी कोथिंबीर, आले, जिरे, तीळ, खोबरे, धने खरेदीसाठीही गर्दी दिसत आहे. तूरडाळीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. हरभराडाळ, शाबूदाणा, खोबरे, तीळ, जिऱ्याचे दर स्थिर आहेत. साखरेचे दर घसरू लागले आहेत. किरकोळ बाजारात बारीक साखर २६ रुपयांपर्यंत आली आहे. गेल्या आठवड्यात साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना घसरणीचा झटका बसला आहे. स्थानिक भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दर निम्म्यावर आले आहेत. कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, गवार, भेंडीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. काकडीची आवक वाढली असून, घाऊक बाजारात प्रतिकिलो १० रुपये दर राहिला आहे. कोथिंबिरीची आवक चांगली असून, किरकोळ बाजारात ५ रुपये असा पेंढीचा दर आहे. दर आठवड्यात येणारा पाऊस, खराब हवामान यांमुळे यंदा फळबागा संकटात सापडल्या आहेत. द्राक्षे, कलिंगडाचे पीक धोक्यात आले असून, त्याचा आवकेवर परिणाम झाला आहे. द्राक्षांची आवक जरी होत असली तरी त्यांची गोडी व तजेलदारपणा कमी झाला आहे. रत्नागिरी, देवगड आंब्यांची आवक सुरू आहे. हापूसला पावसाचा फटका बसला असून त्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. येत्या आठ दिवसांत मद्रास व बंगलोर हापूसची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)ऊस जाऊन दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून बिले मिळालेली नाहीत. त्यात मार्चअखेर असल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाली काहीअंशी मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. बटाटा घसरलाबटाट्याची आवक स्थिर असूनही दरात कमालीची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात १५ रुपये किलो बटाटा, तर २० रुपये किलो कांदा झाला आहे.