शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

‘ब्याडगी,’ ‘जवारी’चा बाजारात ठसका

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

मिरची खरेदीसाठी झुंबड : साखरेची घसरण थांबेना; भाजीपालाही स्वस्त

कोल्हापूर : पावसाळ्यासाठी चटणी तयार करण्यासाठी गृहिणींची मिरची खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’ मिरची खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. त्याचबरोबर चटणीसाठी लागणारा मसाला व कोथिंबीर खरेदीसाठी आठवडी बाजारात गर्दी दिसत आहे. भाजीपाल्याचे दर घसरले असून, साखरेच्या दरातील घसरण थांबलेली नाही. खराब हवामानाचा फटका फळांच्या आवकेवर बसला आहे. पावसाळ्यात पुरेल एवढी चटणी एप्रिल, मे महिन्यांत अगोदरच करून ठेवली जाते. जानेवारीनंतर मिरचीची आवक वाढण्यास सुरुवात होते. सध्या बाजारात ‘ब्याडगी,’ ‘जवारी’ मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लालभडक ‘ब्याडगी’ जिभेला चटका देत असली तरी ‘जवारी’ मिरचीत ती मिसळली जातेच. हैदराबाद, कर्नाटकमधून सध्या मिरचीची आवक सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही भरपूर आहे. गेल्या वर्षीपेक्षा किलोमागे २० रुपये मिरचीचे दर घसरलेले आहेत. ‘ब्याडगी’चा दर प्रतिकिलो १३०, तर ‘जवारी’चा १०० रुपये आहे. चटणीसाठी लागणारी कोथिंबीर, आले, जिरे, तीळ, खोबरे, धने खरेदीसाठीही गर्दी दिसत आहे. तूरडाळीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. हरभराडाळ, शाबूदाणा, खोबरे, तीळ, जिऱ्याचे दर स्थिर आहेत. साखरेचे दर घसरू लागले आहेत. किरकोळ बाजारात बारीक साखर २६ रुपयांपर्यंत आली आहे. गेल्या आठवड्यात साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना घसरणीचा झटका बसला आहे. स्थानिक भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दर निम्म्यावर आले आहेत. कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, गवार, भेंडीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. काकडीची आवक वाढली असून, घाऊक बाजारात प्रतिकिलो १० रुपये दर राहिला आहे. कोथिंबिरीची आवक चांगली असून, किरकोळ बाजारात ५ रुपये असा पेंढीचा दर आहे. दर आठवड्यात येणारा पाऊस, खराब हवामान यांमुळे यंदा फळबागा संकटात सापडल्या आहेत. द्राक्षे, कलिंगडाचे पीक धोक्यात आले असून, त्याचा आवकेवर परिणाम झाला आहे. द्राक्षांची आवक जरी होत असली तरी त्यांची गोडी व तजेलदारपणा कमी झाला आहे. रत्नागिरी, देवगड आंब्यांची आवक सुरू आहे. हापूसला पावसाचा फटका बसला असून त्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. येत्या आठ दिवसांत मद्रास व बंगलोर हापूसची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)ऊस जाऊन दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून बिले मिळालेली नाहीत. त्यात मार्चअखेर असल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाली काहीअंशी मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. बटाटा घसरलाबटाट्याची आवक स्थिर असूनही दरात कमालीची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात १५ रुपये किलो बटाटा, तर २० रुपये किलो कांदा झाला आहे.