शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्याडगी,’ ‘जवारी’चा बाजारात ठसका

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

मिरची खरेदीसाठी झुंबड : साखरेची घसरण थांबेना; भाजीपालाही स्वस्त

कोल्हापूर : पावसाळ्यासाठी चटणी तयार करण्यासाठी गृहिणींची मिरची खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे. ‘ब्याडगी’, ‘जवारी’ मिरची खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. त्याचबरोबर चटणीसाठी लागणारा मसाला व कोथिंबीर खरेदीसाठी आठवडी बाजारात गर्दी दिसत आहे. भाजीपाल्याचे दर घसरले असून, साखरेच्या दरातील घसरण थांबलेली नाही. खराब हवामानाचा फटका फळांच्या आवकेवर बसला आहे. पावसाळ्यात पुरेल एवढी चटणी एप्रिल, मे महिन्यांत अगोदरच करून ठेवली जाते. जानेवारीनंतर मिरचीची आवक वाढण्यास सुरुवात होते. सध्या बाजारात ‘ब्याडगी,’ ‘जवारी’ मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. लालभडक ‘ब्याडगी’ जिभेला चटका देत असली तरी ‘जवारी’ मिरचीत ती मिसळली जातेच. हैदराबाद, कर्नाटकमधून सध्या मिरचीची आवक सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीचे उत्पादन चांगले झाल्याने आवकही भरपूर आहे. गेल्या वर्षीपेक्षा किलोमागे २० रुपये मिरचीचे दर घसरलेले आहेत. ‘ब्याडगी’चा दर प्रतिकिलो १३०, तर ‘जवारी’चा १०० रुपये आहे. चटणीसाठी लागणारी कोथिंबीर, आले, जिरे, तीळ, खोबरे, धने खरेदीसाठीही गर्दी दिसत आहे. तूरडाळीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. हरभराडाळ, शाबूदाणा, खोबरे, तीळ, जिऱ्याचे दर स्थिर आहेत. साखरेचे दर घसरू लागले आहेत. किरकोळ बाजारात बारीक साखर २६ रुपयांपर्यंत आली आहे. गेल्या आठवड्यात साठा करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांना घसरणीचा झटका बसला आहे. स्थानिक भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दर निम्म्यावर आले आहेत. कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, गवार, भेंडीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर आले आहेत. काकडीची आवक वाढली असून, घाऊक बाजारात प्रतिकिलो १० रुपये दर राहिला आहे. कोथिंबिरीची आवक चांगली असून, किरकोळ बाजारात ५ रुपये असा पेंढीचा दर आहे. दर आठवड्यात येणारा पाऊस, खराब हवामान यांमुळे यंदा फळबागा संकटात सापडल्या आहेत. द्राक्षे, कलिंगडाचे पीक धोक्यात आले असून, त्याचा आवकेवर परिणाम झाला आहे. द्राक्षांची आवक जरी होत असली तरी त्यांची गोडी व तजेलदारपणा कमी झाला आहे. रत्नागिरी, देवगड आंब्यांची आवक सुरू आहे. हापूसला पावसाचा फटका बसला असून त्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. येत्या आठ दिवसांत मद्रास व बंगलोर हापूसची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)ऊस जाऊन दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून बिले मिळालेली नाहीत. त्यात मार्चअखेर असल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाली काहीअंशी मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. बटाटा घसरलाबटाट्याची आवक स्थिर असूनही दरात कमालीची घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात १५ रुपये किलो बटाटा, तर २० रुपये किलो कांदा झाला आहे.