शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

‘बाबरी ते कणेरी’ म्हणजे अस्वस्थ चिंतन

By admin | Updated: August 12, 2014 00:41 IST

किशोर बेडकीहाळ : हिंदू-मुस्लिम यांच्यातील स्नेह, एकोपा हीच देशाची ताकद

कोल्हापूर : धर्मनिरपेक्षवादाचा मांडलेला आलेख, आजपर्यंतच्या घडामोडींचे विश्लेषण आणि भूतकाळाचे अस्वस्थ चिंतन म्हणजे ‘बाबरी ते कणेरी’ हे पुस्तक आहे. निराशेची किनार, अवस्थतेसह उद्याचे भविष्य या पुस्तकातून मांडण्यात आले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी आज, सोमवारी येथे केले.हुमायून मुरसललिखित ‘बाबरी ते कणेरी : हिंदू-मुस्लिम ऐक्य संपवणारे राजकारण’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे होते. ‘आम्ही भारतीय’ लोक आंदोलन आणि हिंदी हैं हम... हिंदोस्ताँ हमारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बेडकीहाळ म्हणाले, अत्यंत अस्वस्थ, संवेदनशील असणाऱ्या, लोकशाही मार्गाचा वापर करून पदरी निराशा पडलेल्या, एका अस्सल भारतीय लेखकाचे मनोगत या पुस्तकात आहे. त्याने याद्वारे धार्मिक स्थळे आणि मूलभूत हक्कांबाबत असलेली सामाजिक व्यथा मांडली. हे पुस्तक भयग्रस्ततेचे सूचक आहे शिवाय आपला व्यवहार धर्मनिरपेक्षपणे सुरू नसल्याची शोकांतिकादेखील त्याद्वारे जाणवते.पानसरे म्हणाले, सध्या प्रतिगामी शक्ती सत्तेत आली आहे. अशा परिस्थितीत हिंदू-मुस्लिमांनी अफवांना बळी पडू नये. त्याबाबत त्यांनी दक्ष रहावे. सध्या परिस्थिती बदलली असून, विचारांनी उत्तर देण्याची गरज आहे. इतिहासाचा वापर हत्यारासारखा करणे आवश्यक आहे.मुरसल म्हणाले, एकीकडे ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ म्हटले जाते. त्याचवेळी उत्तर प्रदेशमध्ये ६०५ धार्मिक दंगली झाल्याचे उघडकीस येते. मग, हे काय अच्छे दिन आहेत. कोल्हापुरातील शाहूनगरमध्ये घरामध्ये, कणेरी मस्जिदमध्ये नमाज पठणाला विरोध केला जातो. असे प्रकार हे मूलभूत हक्कांचे हनन करणारे आहेत. हिंदू-मुस्लिमांतील स्नेह, एकोपा ही देशाची ताकद असून, ती सध्या वाढविण्याची गरज आहे.कार्यक्रमास बाळ पोतदार, संपत देसाई, हुमायून मुरसल, प्रा. जे. बी. शिंदे आदी उपस्थित होते. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत यादव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)