शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या निकालाची पोलिसांकडून सर्व पातळ््यांवर सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 17:06 IST

‘वज्र’ पोलीस व्हॅनसह सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दल, बॉम्बशोध पथक, सायबर क्राइम, दंगल काबू पथकांसह अन्य विभागांतील पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वतयारी म्हणून पोलीस मैदानावर प्रात्यक्षिक सरावाची जोरदार तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देअयोध्या निकालाची पोलिसांकडून सर्व पातळ््यांवर सतर्कतासलोखा राहण्यासाठी प्रयत्न : विविध घटकांवर बारकाईने आहे लक्ष

कोल्हापूर : अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालय १२ ते १७ नोव्हेंबरदरम्यान देणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची जय्यत तयारी केली असून, समाजात सलोखा राहण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ बनविला आहे.

‘वज्र’ पोलीस व्हॅनसह सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दल, बॉम्बशोध पथक, सायबर क्राइम, दंगल काबू पथकांसह अन्य विभागांतील पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वतयारी म्हणून पोलीस मैदानावर प्रात्यक्षिक सरावाची जोरदार तयारी सुरू आहे.अयोध्येतील निकालाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर, इचलकरंजी, आजरा परिसरांत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून सोशल मीडियावर विशेष लक्ष आहे.

या निकालानंतर कोणत्याही समाजाच्या नागरिकांनी जल्लोष करू नये, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे व्हिडीओ क्लिप, फोटो, संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. आक्षेपार्ह संदेश, व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर भादंवि कलम १८८ नुसार आणि सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.या कलमानुसार होणार कारवाईभारतीय दंडसंहिता कलम १८८/२९५/२९८- कोणत्याही वर्गाचा, धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे. बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उचारणे यासंबंधी दखलपात्र गुन्हे दाखल करून तत्काळ अटकसत्र आणि न्यायालयात हजर करणे.हे करू नये

  • जमाव करून थांबू नये.
  • सोशल मीडियावर संदेश प्रसारित करू नये.
  • निकालानंतर गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.
  • महाआरती अथवा समूहपठण यांचे आयोजन करू नये.
  • साखर, पेढे, मिठाई वाटू नये.
  • घोषणाबाजी, जल्लोष करू नये.
  • मिरवणुका, रॅली काढू नये.
  • भाषणबाजी करू नये.

रामजन्मभूमी व बाबरी मशीद या संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसांत निकाल अपेक्षित आहे. हा निकाल देणारी यंत्रणा ही देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. तिच्यावर भारतीय जनतेचा विश्वास आहे. त्या निकालाचा आदर करून नागरिकांनी शांतता राखावी.- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर