शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

अयोध्या निकालाची पोलिसांकडून सर्व पातळ््यांवर सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 17:06 IST

‘वज्र’ पोलीस व्हॅनसह सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दल, बॉम्बशोध पथक, सायबर क्राइम, दंगल काबू पथकांसह अन्य विभागांतील पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वतयारी म्हणून पोलीस मैदानावर प्रात्यक्षिक सरावाची जोरदार तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देअयोध्या निकालाची पोलिसांकडून सर्व पातळ््यांवर सतर्कतासलोखा राहण्यासाठी प्रयत्न : विविध घटकांवर बारकाईने आहे लक्ष

कोल्हापूर : अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालय १२ ते १७ नोव्हेंबरदरम्यान देणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची जय्यत तयारी केली असून, समाजात सलोखा राहण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ बनविला आहे.

‘वज्र’ पोलीस व्हॅनसह सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दल, बॉम्बशोध पथक, सायबर क्राइम, दंगल काबू पथकांसह अन्य विभागांतील पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वतयारी म्हणून पोलीस मैदानावर प्रात्यक्षिक सरावाची जोरदार तयारी सुरू आहे.अयोध्येतील निकालाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर, इचलकरंजी, आजरा परिसरांत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून सोशल मीडियावर विशेष लक्ष आहे.

या निकालानंतर कोणत्याही समाजाच्या नागरिकांनी जल्लोष करू नये, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे व्हिडीओ क्लिप, फोटो, संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. आक्षेपार्ह संदेश, व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर भादंवि कलम १८८ नुसार आणि सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.या कलमानुसार होणार कारवाईभारतीय दंडसंहिता कलम १८८/२९५/२९८- कोणत्याही वर्गाचा, धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे. बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उचारणे यासंबंधी दखलपात्र गुन्हे दाखल करून तत्काळ अटकसत्र आणि न्यायालयात हजर करणे.हे करू नये

  • जमाव करून थांबू नये.
  • सोशल मीडियावर संदेश प्रसारित करू नये.
  • निकालानंतर गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.
  • महाआरती अथवा समूहपठण यांचे आयोजन करू नये.
  • साखर, पेढे, मिठाई वाटू नये.
  • घोषणाबाजी, जल्लोष करू नये.
  • मिरवणुका, रॅली काढू नये.
  • भाषणबाजी करू नये.

रामजन्मभूमी व बाबरी मशीद या संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसांत निकाल अपेक्षित आहे. हा निकाल देणारी यंत्रणा ही देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. तिच्यावर भारतीय जनतेचा विश्वास आहे. त्या निकालाचा आदर करून नागरिकांनी शांतता राखावी.- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर