शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:29 IST

अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातील साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देकृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कारमहाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर : पुण्यात १२ जानेवारीला वितरण

कोल्हापूर : अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातीलसाहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्र फाउंडेशनमार्फत दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य क्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. २0१९ या वर्षासाठी साहित्य प्रकारातील पुरस्कारासाठी प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीचा विचार करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण १२ जानेवारी २0२0 रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत माहिती हक्क कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष अंकुश कर्णिक, पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख उपस्थित राहणार आहेत.

रिंगाण विस्थापितांच्या जगण्याची कहाणीरिंगाण या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण आलेले आहे. देवाप्पाच्या पाळीव म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून त्यांचा नि देवप्पाचा संघर्ष उभा राहतो. कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात. नवद्दोत्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्रा. खोत यांची  ओळख आहे.

गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांच्या गावठाण, रौंदाळा, झडझिंबड आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय नांगरल्याविन भुई हे ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळणे हे आनंददायी आहे. यानिमित्ताने विस्थापितांच्या जगण्याचा विषयाकडे कांही लोकांचे लक्ष वेधले जाईल. केवळ धरणग्रस्तच नव्हे तर माणूसच विस्थापित झाला आहे. यानिमित्ताने माझ्या लेखनाचा सन्मान झाला आहे, असे मी मानतो. महाराष्ट्र फाउंडेशनची ही चांगली परंपरा आहे. अनेक मान्यवरांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यात माझा समावेश केल्याबद्दल मला आनंदच वाटतो.प्रा. कृष्णात खोत, साह्त्यििक, कोल्हापूर.

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर