शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:29 IST

अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातील साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देकृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कारमहाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर : पुण्यात १२ जानेवारीला वितरण

कोल्हापूर : अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातीलसाहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्र फाउंडेशनमार्फत दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य क्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. २0१९ या वर्षासाठी साहित्य प्रकारातील पुरस्कारासाठी प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीचा विचार करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण १२ जानेवारी २0२0 रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत माहिती हक्क कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष अंकुश कर्णिक, पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख उपस्थित राहणार आहेत.

रिंगाण विस्थापितांच्या जगण्याची कहाणीरिंगाण या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण आलेले आहे. देवाप्पाच्या पाळीव म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून त्यांचा नि देवप्पाचा संघर्ष उभा राहतो. कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात. नवद्दोत्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्रा. खोत यांची  ओळख आहे.

गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांच्या गावठाण, रौंदाळा, झडझिंबड आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय नांगरल्याविन भुई हे ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.

महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळणे हे आनंददायी आहे. यानिमित्ताने विस्थापितांच्या जगण्याचा विषयाकडे कांही लोकांचे लक्ष वेधले जाईल. केवळ धरणग्रस्तच नव्हे तर माणूसच विस्थापित झाला आहे. यानिमित्ताने माझ्या लेखनाचा सन्मान झाला आहे, असे मी मानतो. महाराष्ट्र फाउंडेशनची ही चांगली परंपरा आहे. अनेक मान्यवरांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यात माझा समावेश केल्याबद्दल मला आनंदच वाटतो.प्रा. कृष्णात खोत, साह्त्यििक, कोल्हापूर.

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर