शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्काराने साहित्याची उंची वाढत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:13 IST

निपाणी : पुरस्काराने कोणत्याही साहित्याची उंची वाढत नाही, तर लेखकाने लिहलेले साहित्य जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आज मराठी ...

निपाणी : पुरस्काराने कोणत्याही साहित्याची उंची वाढत नाही, तर लेखकाने लिहलेले साहित्य जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आज मराठी साहित्याची अवस्था भयानक असून, वाचकांची संख्या घटलेली आहे. आज लेखकाचे आयुष्य संपते, पण त्याने लिहिलेल्या साहित्याची पहिली आवृत्ती संपत नाही, अशी काहीशी अवस्था आहे. मराठी साहित्याकडे वाचकांनी पाठ फिरवली आहे. याची गंभीर दखल सर्वांनी घेतली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.कारदगा येथे शहीद सुनील भोसले व्यासपीठावर पार पडलेल्या २३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले, कारदगा हे गाव साहित्याचा जल्लोष करणारे गाव आहे. पालावरच साहित्य हे पानावर येण्यास ग्रामीण साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनापेक्षा अशी ग्रामीण संमेलने महत्त्वाची आहेत कारण हे सर्वांपर्यंत पोहोचत आहे. अभिव्यक्तीची मुस्कटदाबी झाल्याशिवाय साहित्यिकांना संधी मिळत नाही.यावेळी व्यासपीठावर ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, डॉ. आनंद काटीकर, डॉ. सी. बी. कोरे रेंदाळकर, ग्रामपंचायत अध्यक्षा शिऊबाई गावडे, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, उत्तम पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुमित्रा उगळे, लक्ष्मणराव चिंगळे, दादासो नरगट्टे, चंद्रकुमार नलगे, रामभाऊ पाटील, कल्पना रायजाधव, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कल्पना रायजाधव यांच्या ‘आम्ही घडलो तुम्हीही घडा’ या व कबीर वराळे यांच्या ‘किलबिल’ व ‘महाचंद्र’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. सकाळी संपूर्ण गावात ग्रंथ दिंडी काढण्यात आली.दुसऱ्या सत्रात नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांचे ‘आम्ही वारसदार मावळ्यांचे’ या विषयावर व्याख्यान झाले. शास्वत ग्रामविकासावर चंद्रकांत दळवी यांचे व्याख्यान झाले. प्रसिद्ध कवी नितीन देशमुख, नारायण पुरी, रवींद्र केसकर यांनी कविता सादर केल्या.मराठी साहित्य वाढावेरा. रं. बोराडे म्हणाले की, कारदगा गावाने मराठीपण जपलेच, पण कन्नड भाषेचा अभिमान ठेवला. आज साहित्य संमेलन गावोगावी होतात, पण मराठी भाषेचा वाचक वाढला का? हा प्रश्न आहे. कन्नडमधील अनेक पुस्तके मराठीत आली, पण मराठीतील पुस्तके कन्नड भाषेत प्रकाशित होणे गरजेचे आहे. साहित्य किती लोकांपर्यंत पोहोचले यावर त्याची उंची ठरते.