शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

पुरस्काराने साहित्याची उंची वाढत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:13 IST

निपाणी : पुरस्काराने कोणत्याही साहित्याची उंची वाढत नाही, तर लेखकाने लिहलेले साहित्य जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आज मराठी ...

निपाणी : पुरस्काराने कोणत्याही साहित्याची उंची वाढत नाही, तर लेखकाने लिहलेले साहित्य जास्त लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. आज मराठी साहित्याची अवस्था भयानक असून, वाचकांची संख्या घटलेली आहे. आज लेखकाचे आयुष्य संपते, पण त्याने लिहिलेल्या साहित्याची पहिली आवृत्ती संपत नाही, अशी काहीशी अवस्था आहे. मराठी साहित्याकडे वाचकांनी पाठ फिरवली आहे. याची गंभीर दखल सर्वांनी घेतली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी व्यक्त केले.कारदगा येथे शहीद सुनील भोसले व्यासपीठावर पार पडलेल्या २३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले, कारदगा हे गाव साहित्याचा जल्लोष करणारे गाव आहे. पालावरच साहित्य हे पानावर येण्यास ग्रामीण साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनापेक्षा अशी ग्रामीण संमेलने महत्त्वाची आहेत कारण हे सर्वांपर्यंत पोहोचत आहे. अभिव्यक्तीची मुस्कटदाबी झाल्याशिवाय साहित्यिकांना संधी मिळत नाही.यावेळी व्यासपीठावर ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, डॉ. आनंद काटीकर, डॉ. सी. बी. कोरे रेंदाळकर, ग्रामपंचायत अध्यक्षा शिऊबाई गावडे, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, उत्तम पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्य सुमित्रा उगळे, लक्ष्मणराव चिंगळे, दादासो नरगट्टे, चंद्रकुमार नलगे, रामभाऊ पाटील, कल्पना रायजाधव, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कल्पना रायजाधव यांच्या ‘आम्ही घडलो तुम्हीही घडा’ या व कबीर वराळे यांच्या ‘किलबिल’ व ‘महाचंद्र’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. सकाळी संपूर्ण गावात ग्रंथ दिंडी काढण्यात आली.दुसऱ्या सत्रात नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांचे ‘आम्ही वारसदार मावळ्यांचे’ या विषयावर व्याख्यान झाले. शास्वत ग्रामविकासावर चंद्रकांत दळवी यांचे व्याख्यान झाले. प्रसिद्ध कवी नितीन देशमुख, नारायण पुरी, रवींद्र केसकर यांनी कविता सादर केल्या.मराठी साहित्य वाढावेरा. रं. बोराडे म्हणाले की, कारदगा गावाने मराठीपण जपलेच, पण कन्नड भाषेचा अभिमान ठेवला. आज साहित्य संमेलन गावोगावी होतात, पण मराठी भाषेचा वाचक वाढला का? हा प्रश्न आहे. कन्नडमधील अनेक पुस्तके मराठीत आली, पण मराठीतील पुस्तके कन्नड भाषेत प्रकाशित होणे गरजेचे आहे. साहित्य किती लोकांपर्यंत पोहोचले यावर त्याची उंची ठरते.