शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल अध्यक्षपदी अविनाश भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 19:12 IST

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नाशिकचे अ‍ॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे अमोल सावंत, तर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या सदस्यपदी सतीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूरच्या विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुधवारी मुंबईच्या बार कौन्सिलच्या कार्यालयात ही निवड झाली.

ठळक मुद्देउपाध्यक्षपदी अमोल सावंत, बार कौन्सिल आॅफ इंडिया सदस्य सतीश देशमुखमुंबईच्या कार्यालयात झाली निवड : विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी

कोल्हापूर : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नाशिकचे अ‍ॅड. अविनाश भिडे, उपाध्यक्षपदी औरंगाबादचे अमोल सावंत, तर बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या सदस्यपदी सतीश देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. कोल्हापूरच्या विवेक घाटगे यांच्याकडे वेल्फेअरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बुधवारी मुंबईच्या बार कौन्सिलच्या कार्यालयात ही निवड झाली.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या निवडणूक रिंगणात २५ जागांसाठी राज्यातून १६४ उमेदवार उभे होते; त्यासाठी ५९ हजार सदस्यांनी मतदान केले. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पार पडलेल्या निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतून १७ उमेदवारांनी निवडणूक लढविली.

या उमेदवारांना राज्यभरातून वकिलांनी मतदान केले. ५ मे २०१८ पासून जिल्हानिहाय मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीला १० महिन्यांचा कालावधी लागला. बुधवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांची निवड करण्यात आली. कमिटीचा पाच वर्षांचा कार्यकाल आहे.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारीअध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे (नाशिक), उपाध्यक्ष अमोल सावंत (औरंगाबाद), बार कौन्सिल अ‍ॅड इंडिया सदस्य सतीश देशमुख (हिंगोली), वेल्फेअर सदस्य विवेक घाटगे (कोल्हापूर), सदस्य आशिष देशमुख (पुसद-यवतमाळ), गजानन चव्हाण (ठाणे), विठ्ठल देशमुख (मुंबई), परिजात पांडे (नागपूर), राजेंद्र उमाप (पुणे), जयवंत जयभावे (नाशिक), हर्षद निंबाळकर (पुणे), अविनाश आव्हाड (पुणे), संग्राम देसाई (सिंधुदुर्ग), वसंत साळुंखे (औरंगाबाद), मोतीसिंग मोहता (अकोला), आनंदराव पाटील (लातूर), असिफ कुरेशी (नागपूर), उदय वारूंजकर(मुंबई), मिलिंद पाटील (उस्मानाबाद), मिलिंद थोबडे (सोलापूर), अनिल गोवरदिपे (नागपूर), सुभाष घाटगे (मुंबई), सुदीप पासबोला (ठाणे), वसंतराव भोसले (सातारा), अहमदखान पठाण (पुणे).पूरग्रस्त वकिलांना मदतकोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्त वकिलांना मदत मिळावी, यासाठी अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी बार कौन्सिलकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्याला तत्वत: मान्यता देत सुरुवातीला साडेसात लाख रुपये मंजूर करून ते दिले. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर