शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘अवनि’ने रोखला आडूर गावातील बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : बालविवाह रोखण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या निधीतून ‘अवनि’द्वारे संचलित जागर प्रकल्प सुरू झाल्याच्या महिनाभरातच गुरुवारी कोल्हापुरात पहिले यश ...

कोल्हापूर : बालविवाह रोखण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या निधीतून ‘अवनि’द्वारे संचलित जागर प्रकल्प सुरू झाल्याच्या महिनाभरातच गुरुवारी कोल्हापुरात पहिले यश आले. करवीर तालुक्यातील आडूर येथील १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात आला.

कोल्हापुरात लॉकडाऊनच्या काळात बालविवाहाचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढल्याची वस्तुस्थिती ‘अवनि’च्या अनुराधा भोसले यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावरून अमिताभ बच्चन यांच्या निदर्शनास आणून दिली होती. कोल्हापूरसारखा प्रगत जिल्हा असतानाही इथे बालविवाह होतात आणि ते रोखताना योग्य यंत्रणेअभावी मर्यादा पडतात, याकडेही लक्ष वेधले होते. यावर बच्चन यांनी ११ लाख रुपये या कामासाठी देऊन काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार ‘अवनि’ने करवीर, शिरोळ, पन्हाळा या तालुक्यांसाठी ‘जागर’ हा पथदर्शी कार्यक्रम हाती घेतला. महिन्याभरापूर्वीच याची सुरुवात झाली आणि गुरुवारी त्याला पहिले यशदेखील मिळाले.

आडूर गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची निनावी तक्रार बुधवारी रात्री ‘अवनि’कडे आली होती. त्याची शहानिशा झाल्यानंतर गुरुवारी सकाळी आठ वाजताच अनुराधा भोसले, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, प्रमोद पाटील, इम्रान शेख, कादंबरी भोसले हे गावात दाखल झाले. गावातील ग्राम बालसंरक्षण समितीला घेऊन ते लग्न होणाऱ्या घरात गेले. याची कुणकुण लागल्याने नवरी मुलीच्या आईने मुलगीला मामाच्या घरी पाठवले. पुन्हा लग्न लागेल म्हणून मुलीच्या आईकडून १८ वर्षापर्यंत लग्न करणार नाही असे बालकल्याण संकुलातील बाल न्यायालय कायद्यानुसार लिहून घेण्यात आले.

चौकट ०१

अवनिने कायमच बालविवाहाच्या विरोधी भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात अशा प्रकारे होणारे तीन ते चार विवाह रोखले आहेत. आता जागर प्रकल्पासारखे व्यासपीठ मिळाल्याने याला चांगले बळ येणार असून सुजाण नागरिकांनी अशा प्रकारचे कृत्य घडत असल्यास ‘अवनि’कडे तक्रार करावी.

- अनुराधा भोसले, उपाध्यक्ष, अवनि संस्था