शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

‘अवनि’ने रोखला आडूर गावातील बालविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : बालविवाह रोखण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या निधीतून ‘अवनि’द्वारे संचलित जागर प्रकल्प सुरू झाल्याच्या महिनाभरातच गुरुवारी कोल्हापुरात पहिले यश ...

कोल्हापूर : बालविवाह रोखण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या निधीतून ‘अवनि’द्वारे संचलित जागर प्रकल्प सुरू झाल्याच्या महिनाभरातच गुरुवारी कोल्हापुरात पहिले यश आले. करवीर तालुक्यातील आडूर येथील १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात आला.

कोल्हापुरात लॉकडाऊनच्या काळात बालविवाहाचे प्रमाण २१ टक्क्यांनी वाढल्याची वस्तुस्थिती ‘अवनि’च्या अनुराधा भोसले यांनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावरून अमिताभ बच्चन यांच्या निदर्शनास आणून दिली होती. कोल्हापूरसारखा प्रगत जिल्हा असतानाही इथे बालविवाह होतात आणि ते रोखताना योग्य यंत्रणेअभावी मर्यादा पडतात, याकडेही लक्ष वेधले होते. यावर बच्चन यांनी ११ लाख रुपये या कामासाठी देऊन काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार ‘अवनि’ने करवीर, शिरोळ, पन्हाळा या तालुक्यांसाठी ‘जागर’ हा पथदर्शी कार्यक्रम हाती घेतला. महिन्याभरापूर्वीच याची सुरुवात झाली आणि गुरुवारी त्याला पहिले यशदेखील मिळाले.

आडूर गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची निनावी तक्रार बुधवारी रात्री ‘अवनि’कडे आली होती. त्याची शहानिशा झाल्यानंतर गुरुवारी सकाळी आठ वाजताच अनुराधा भोसले, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते, प्रमोद पाटील, इम्रान शेख, कादंबरी भोसले हे गावात दाखल झाले. गावातील ग्राम बालसंरक्षण समितीला घेऊन ते लग्न होणाऱ्या घरात गेले. याची कुणकुण लागल्याने नवरी मुलीच्या आईने मुलगीला मामाच्या घरी पाठवले. पुन्हा लग्न लागेल म्हणून मुलीच्या आईकडून १८ वर्षापर्यंत लग्न करणार नाही असे बालकल्याण संकुलातील बाल न्यायालय कायद्यानुसार लिहून घेण्यात आले.

चौकट ०१

अवनिने कायमच बालविवाहाच्या विरोधी भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात अशा प्रकारे होणारे तीन ते चार विवाह रोखले आहेत. आता जागर प्रकल्पासारखे व्यासपीठ मिळाल्याने याला चांगले बळ येणार असून सुजाण नागरिकांनी अशा प्रकारचे कृत्य घडत असल्यास ‘अवनि’कडे तक्रार करावी.

- अनुराधा भोसले, उपाध्यक्ष, अवनि संस्था