शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

५२ दिवसांचा संप आत्मकेंद्रित करणारा

By admin | Updated: September 18, 2015 23:37 IST

वस्त्रनगरीला सुमारे ४५०० कोटी रुपयांचा फटका : १५० कारखान्यांतील संपाचा परिणाम पूर्ण वस्त्रोद्योगावर--बावन्न दिवसांचा लेखा जोखा

राजाराम पाटील -- इचलकरंजी  यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब व्हावी, या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने ५२ दिवसांचा संप केला. १५० सायझिंग कारखान्यांतच संप असला तरी त्याचे परिणाम यंत्रमाग उद्योगावर व पर्यायाने वस्त्रनगरीवर झाले. या काळात सुमारे चार हजार ५०० कोटी रुपयांचा फटका येथील वस्त्रोद्योगाला बसला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.इचलकरंजी औद्योगिक क्षेत्रात विक्रमी ठरलेला हा संप कामगार व उद्योजकांबरोबरच दोन्ही बाजूच्या संघटनांनासुद्धा बरेच काही सांगणारा आणि त्यांना आत्मकेंद्रित होण्यास लावणारा ठरला. संपाला कामगार चळवळीबरोबरच राजकीय वलयही होते. वस्त्रोद्योगात असलेली कमालीची मंदी, कामगार संघटनेशी चर्चा नाही अशी सायझिंग असोसिएशनची टोकाची भूमिका, आजी-माजी आमदार आणि खासदारांचे तोकडे पडणारे प्रयत्न, त्यातून घालण्यात येणारा मतांचा बेरीज-वजाबाकीचा ताळमेळ, स्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव, व्हॉटस् अ‍ॅपवर होणारी शेरेबाजी-टीकाटिप्पणी असे अनेक पैलू या संपाला होते. मात्र, ५२ दिवसांचा हा संप सर्व क्षेत्रातील कामगार व उद्योजक-व्यावसायिकांना अभ्यास करण्याचा विषय ठरला. यातून बरेच काही शिकल्यानंतर संपाबाबत होणाऱ्या चुका, संपाची लांबत जाणारी प्रक्रिया आणि राजकीय खेळी आता सुधारल्या पाहिजेत, असेच मत सर्वसामान्य नागरिकांचे आहे. ५२ दिवसांचा लेखाजोखा मांडताना लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे की, सुधारित किमान वेतन जाहीर करताना शासनाने प्रस्तावित मसुद्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने बदल करून २९ जानेवारी २०१५ ला आदेश काढला. किमान वेतन देणे हे मालकांना बंधनकारक आहे. वाढत जाणाऱ्या महागाईबरोबर वेतनामध्ये वाढ होणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. फेब्रुवारी ते जुलै या सहा महिन्यांमध्ये किमान वेतनाबाबत मालकांकडून कोणतीच हालचाल न झाल्याने अखेरीस कामगारांनीच संपाचा निर्णय घेतला. युनियनवर प्रचंड दबाव वाढला. कामगार लढायला तयार असताना युनियनला बाजूला जाणे अशक्य होते. त्यामुळेच २० जुलै रोजी संप सुरू करण्यात आला.५२ दिवस लांबलेला संप संपुष्टात आणण्याची कामगारांच्यादृष्टीने महत्त्वाची बाब बनली होती. कायदेशीर हक्काला बाधा येणार नाही आणि कामगारांना तात्पुरता लाभ व्हावा, यादृष्टीने तोडगा आवश्यक होता. वस्त्रोद्योग मंत्र्यांनी याच अटीवर ५०० रुपयांची वाढ मान्य करावी, असा तोडगा मांडला. मात्र, मालक संघटनेने एक रुपयाही देणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे संप लांबला. कामगारांना काय मिळाले, असा प्रश्न विचारत असताना मालकांना काय मिळाले, असा प्रश्न विचारणे उचित ठरेल. कोणत्याही परिस्थितीत चर्चा नाही, या मालकांच्या भूमिकेमुळे २०१३ साली अपमानित झालेल्या कामगारांचा संताप वाढत जाऊन लढ्याची अधिक ताठर भूमिका वाढत गेली, हे सत्य आहे. अंतिमत: मात्र कामगारांना दरमहा ७०० रुपयेपेक्षा अधिक अंतरिम वाढ देऊन कारखाने चालू करण्यात आले आहेत. (समाप्त)शासनाला जाग आणि पीस रेट : गौड   सायझिंगधारक कृती समितीचे प्रकाश गौड म्हणाले, ५२ दिवसांनंतर ५०० रुपयांची वाढ यामुळे कामगार संघटनेचे खच्चीकरण झाले. महाराष्ट्रात फक्त १५० सायझिंगधारकांनाच किमान वेतनाबाबत लक्ष्य केले गेले व संप लांबविला गेला. त्यामुळे शासनाला जाग आली आणि टाईम रेटचे किमान वेतन पीस रेटवर बदलले जात आहे, हेच या संपाचे फलित आहे.सर्वसामान्य नागरिक भरडले : कोष्टी   --इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी म्हणाले, संपामुळे येथील वस्त्रोद्योगाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामध्ये कामगारांबरोबर सायझिंगधारक, यंत्रमागधारक, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य इचलकरंजीकरसुद्धा भरडला गेला. कामगार संघटनांनीसुद्धा आता संपाचे हत्यार उपसताना तो लांबवायचा किती, याचा विचार केलाच पाहिजे.चर्चेची दारे उघडी पाहिजेत : महाजनयंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, संप मालक व कामगार असा दोन्ही बाजूला लक्षवेधी ठरला. दोघांनीसुद्धा संप किती ताणवावा, याचे तारतम्य बाळगले पाहिजे. मर्यादा असल्या पाहिजेत.संपाचे आंदोलन सुरू असताना चर्चेची दारे उघडी असली पाहिजेत. त्यातूनच सन्माननीय व व्यवहार्य तोडगा निघतो, हेच या संपाने शिकवले.