शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बहुमताच्या जोरावर नागरिकत्व कायदा लादण्याचा प्रयत्न : सरोदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 11:06 IST

संविधानातील नागरिकत्वाची तरतूद ही अगोदरच व्यापक असताना, नव्याने बदलाचा घाट का घातला जातो, हे अगोदर लोकांनी समजून घेतले पाहिजे. बहुमताच्या अश्वावर स्वार होऊन नागरिकत्व सुधारणा विधेयक लादण्याचा होत असलेला प्रयत्न भारतीय जनता सहन करणार नाही, असे प्रतिपादन मानवाधिकार कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.

ठळक मुद्देबहुमताच्या जोरावर नागरिकत्व कायदा लादण्याचा प्रयत्न : सरोदे ‘नवीन नागरिकत्व व कायद्याच्या सीमारेषा’ विषयावर ‘खुला संवाद’

कोल्हापूर : संविधानातील नागरिकत्वाची तरतूद ही अगोदरच व्यापक असताना, नव्याने बदलाचा घाट का घातला जातो, हे अगोदर लोकांनी समजून घेतले पाहिजे. बहुमताच्या अश्वावर स्वार होऊन नागरिकत्व सुधारणा विधेयक लादण्याचा होत असलेला प्रयत्न भारतीय जनता सहन करणार नाही, असे प्रतिपादन मानवाधिकार कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.सम्राटनगर येथे ‘वाचनकट्टा’ आणि विजयश्री फौंडेशन यांच्यातर्फे ‘नवीन नागरिकत्व व कायद्याच्या सीमारेषा’ या विषयावर ‘खुला संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विजयश्री फौंडेशनचे अध्यक्ष जॉर्ज क्रूज होते.अ‍ॅड. सरोदे पुढे म्हणाले, आज ज्या तरतुदींचा उल्लेख केला जातो, त्या तरतुदी अगोदरपासूनच १९५५ च्या नागरिकत्व कायद्यात समाविष्ट आहेत. मग धर्मावर आधारित नव्याने कायद्यात बदल करून संपूर्ण देशात अस्थिरता निर्माण करणे हे चुकीचे आहे.

भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द समाविष्ट असताना धर्माच्या आधारावर होणारे वर्गीकरण लोकशाही राष्ट्रासाठी घातक आहे. यासाठी लोकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. सध्याच्या धर्मसंस्था या भीतीवर आधारित आहेत. याचाच गैरफायदा राजकीय लोक स्वत:च्या फायद्यासाठी करून घेत असतात. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.यावेळी जॉर्ज क्रूज यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम यांनी स्वागत केले; तर प्रभाकर पाटील यांनी आभार मानले. सचिन लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला नगरसेवक अशोक जाधव, अ‍ॅड. बी. एम. पाटील, ‘वाचनकट्टा’चे संकल्पक युवराज कदम, प्रभाकर पाटील, लखन भोगम, महेश कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Asim Sarodeअसिम सराेदेkolhapurकोल्हापूर