शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मेकर ग्रुपच्या ११ कोटी रुपयांच्या पाच मालमत्ता जप्त करा, उच्च न्यायालयाचे आदेश 

By विश्वास पाटील | Updated: December 22, 2023 15:49 IST

करवीर प्रांताधिकारी यांची सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्ती 

कोल्हापूर : मेकर ग्रुप फसवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाने कंपनीच्या ५ स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश शुक्रवारी दिले.  त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्यावतीने गृह खात्याच्या प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून एकूण  ११ कोटी रुपयाच्या  ५ स्थावर मालमत्ता तसेच संचालक व कंपनीची बँक खाती गोठवण्यात आल्याची व करवीर उपविभागीय अधिकारी यांना सक्षम प्राधिकरण म्हणून नेमण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणूकदार कायद्याप्रमाणे विकण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. मेकर ग्रुप या कंपनीने कोल्हापूर व परिसरात सुमारे २०० कोटी रुपयाची गुंतवणूक लोकांकडून गोळा केली व मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले. परंतु अशी कोणतेही आश्वासनाची पूर्तता कंपनीने अथवा त्यांच्या संचालकानी केली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांतर्फे संजय दुर्गे व इतर गुंतवणूकदारांनी फिर्याद दाखल केली. त्यावर महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा डिसेंबर २०१८ मध्ये दाखल केला व त्याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. परंतु कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे संजय दुर्गे व इतर गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन रिट याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे वकील धैर्यशील सुतार यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी २०२१ मध्ये प्रस्ताव पाठवून सुद्धा कंपनीच्या व संचालकांच्या ५ स्थावर मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना राज्य शासनाच्या गृह खात्याने काढली नसल्याचे न्यायालयास सांगितले. त्यावर न्या. अजय गडकरी व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने गृह खात्याच्या प्रधान सचिवांना काय कारवाई केली याची माहिती प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या प्रस्तावाप्रमाणे ५ स्थावर मालमत्ता व सर्व बँक खाती जप्त करण्याची अधिसूचना काढली आहे व करवीर उपविभागीय अधिकारी यांना सक्षम प्राधिकरण म्हणून नेमले असल्याची माहिती दिली.  त्यानुसार नोंद घेऊन गुंतवणूकदारांची याचिका निकाली काढली. यामुळे या मालमत्ता विक्री व इतर प्रक्रिया गतिमान होऊन, गुंतणूकदारांची गुंतवणूक परत मिळणेची आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीHigh Courtउच्च न्यायालय