शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

मेकर ग्रुपच्या ११ कोटी रुपयांच्या पाच मालमत्ता जप्त करा, उच्च न्यायालयाचे आदेश 

By विश्वास पाटील | Updated: December 22, 2023 15:49 IST

करवीर प्रांताधिकारी यांची सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्ती 

कोल्हापूर : मेकर ग्रुप फसवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाने कंपनीच्या ५ स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश शुक्रवारी दिले.  त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्यावतीने गृह खात्याच्या प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून एकूण  ११ कोटी रुपयाच्या  ५ स्थावर मालमत्ता तसेच संचालक व कंपनीची बँक खाती गोठवण्यात आल्याची व करवीर उपविभागीय अधिकारी यांना सक्षम प्राधिकरण म्हणून नेमण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गुंतवणूकदार कायद्याप्रमाणे विकण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. मेकर ग्रुप या कंपनीने कोल्हापूर व परिसरात सुमारे २०० कोटी रुपयाची गुंतवणूक लोकांकडून गोळा केली व मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले. परंतु अशी कोणतेही आश्वासनाची पूर्तता कंपनीने अथवा त्यांच्या संचालकानी केली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांतर्फे संजय दुर्गे व इतर गुंतवणूकदारांनी फिर्याद दाखल केली. त्यावर महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा डिसेंबर २०१८ मध्ये दाखल केला व त्याचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. परंतु कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे संजय दुर्गे व इतर गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन रिट याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे वकील धैर्यशील सुतार यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी २०२१ मध्ये प्रस्ताव पाठवून सुद्धा कंपनीच्या व संचालकांच्या ५ स्थावर मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना राज्य शासनाच्या गृह खात्याने काढली नसल्याचे न्यायालयास सांगितले. त्यावर न्या. अजय गडकरी व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने गृह खात्याच्या प्रधान सचिवांना काय कारवाई केली याची माहिती प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रधान सचिवांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले व जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या प्रस्तावाप्रमाणे ५ स्थावर मालमत्ता व सर्व बँक खाती जप्त करण्याची अधिसूचना काढली आहे व करवीर उपविभागीय अधिकारी यांना सक्षम प्राधिकरण म्हणून नेमले असल्याची माहिती दिली.  त्यानुसार नोंद घेऊन गुंतवणूकदारांची याचिका निकाली काढली. यामुळे या मालमत्ता विक्री व इतर प्रक्रिया गतिमान होऊन, गुंतणूकदारांची गुंतवणूक परत मिळणेची आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीHigh Courtउच्च न्यायालय