शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांचे दफ्तर अद्ययावत

By admin | Updated: August 30, 2015 00:46 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे गौरवोद्गार : पोलीस व समाजकल्याण विभागाचे योग्य समन्वय

कोल्हापूर : समाजकल्याण विभाग व पोलीस विभागाचा समन्वय चांगला असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांचे दफ्तर अद्ययावत आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सैनी यांनी एप्रिल ते जुलै २०१५ अखेर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणाचा आढावा व सद्य:स्थितीची माहिती घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, फिर्यादी व साक्षीदार फितूर झाल्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. गुन्ह्याचा अहवाल तत्काळ दिल्यास प्रकरण प्रलंबित न राहता पीडितांना लवकर अनुदान मंजूर करता येईल. यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा. जून २०१५ अखेर अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत १९७ व नागरी हक्क संरक्षण अधिनियमांतर्गत ३५ अशी २३२ प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. अन्याय अत्याचारग्रस्त १२ व्यक्तींना आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. अत्याचाराची २५ प्रकरणे, पोलीस तपासावरील ९ प्रलंबित प्रकरणे, पोलीस तपास पूर्ण झालेली परंतू अर्थसहाय्यासाठी प्रलंबित असलेली २९ प्रकरणे, अत्याचारित व्यक्तींना अर्थसहाय्य मंजुरीची २५ प्रकरणे, अशा एप्रिल २०१५ ते जुलै २०१५ अखेर ९८ गुन्ह्यांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी दर महिन्याला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कोर्टात सुरू असलेली प्रकरणे, निकाल लागलेली प्रकरणे याबाबतची माहिती सभेमध्ये सादर करावी, अशी सूचना करण्यात आली. (प्रतिनिधी)