शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता खरेदी-विक्री जोरात; कोल्हापुरात 'इतक्या' कोटींचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 15:40 IST

संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि दिवाळीच्या काळात अर्थचक्राने गती घेतल्याने मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहारदेखील वाढले. गेल्यावर्षीच्या ...

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि दिवाळीच्या काळात अर्थचक्राने गती घेतल्याने मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहारदेखील वाढले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा व्यवहार वाढले. मार्चअखेर कोल्हापूरमध्ये एकूण ७६०६३ दस्तांची नोंदणी झाली. त्यातून २९३ कोटी ६१ लाख रुपयांचा महसूल जमा झाला. गेल्या १५ दिवसांत मालमत्ता खरेदी-विक्रीच्या १६०० दस्तांची नोंद झाली आहे.

मुद्रांक शुल्कातील सवलती, जाचक अटींतील सुधारणांनी ग्राहकांकडून घरांना मागणी वाढली आहे. गेल्या दीड वर्षापासूनचे असलेले कोरोनाचे मळभ बाजूला सारून कोल्हापुरातील रियल इस्टेट क्षेत्राचा वेग वाढला. डिझेल दरवाढीने बांधकाम साहित्याचे दर वाढले. यावर्षी घरांच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे आपल्या आर्थिक बजेटनुसार वन, टू, थ्री बीएचके, रो बंगलो, रो-हाऊस आदींमधील पर्यायांची ग्राहकांनी निवड केली. त्यांना बँकांच्या व्याजदरातील कपातीचा दिलासा मिळाला. मागणी वाढल्याने रियल इस्टेट क्षेत्रातील उत्साह वाढला. गणेशोत्सव, दसरा-दिवाळी या सणांतील मुहूर्तावर अनेकांनी कोल्हापुरातील आपले गृहस्वप्न साकारले, तर प्लॉट खरेदी केली.

मालमत्ता खरेदी-विक्री - वर्ष दस्त नोंदणीची संख्या (हजारात)

मार्च २०१९ ७२७५५

मार्च २०२० ६६९३३

मार्च २०२१ ७६०६३

२९३ कोटींचा महसूल

- मार्च २०१९ मध्ये दस्त नोंदणीतून जिल्ह्यात ३०० कोटी ३५ लाखांचा महसूल जमा झाला.- सन २०२० मध्ये २९२ कोटी ९७ लाख, तर यंदा मार्चअखेर २९३ कोटी ६१ लाख रुपये इतका महसूल राज्य शासनाकडे जमा झाला आहे.

टू-बीएचकेला पसंती

कोरोनामुळे लोकांना स्वत:च्या घराचे महत्त्व पटले. त्यामुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी घरासाठी नोंदणी केली. त्यात टू, थ्री, फोर बीएचके प्रिमियम फ्लॅटला ग्राहकांची चांगली पसंती राहिली असल्याचे सचिन ओसवाल यांनी सांगितले.

गेल्या वर्षीपेक्षा चांगले चित्र

कोरोनामुळे गेल्यावर्षी दस्तनोंदणीचे प्रमाण कमी होते. त्याच्या तुलनेत यावर्षी चांगले चित्र आहे. सदनिका, प्लॉट, आदी स्वरूपातील मालमत्ता खरेदी होत आहे. दिवाळीच्या काळात गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे १६०० व्यवहार झाले आहेत, अशी माहिती प्रभारी दुय्यम निबंधक (करवीर क्रमांक तीन) बी. के. पाटील यांनी बुधवारी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दस्त नोंदणी होऊ लागली आहे. त्याची गती आणखी वाढणे अपेक्षित आहे. -मल्लिकार्जुन माने, मुद्रांक जिल्हा अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर