शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात दहा लाख लाडक्या बहिणी; उमेदवारीसाठी चर्चा मात्र पाचजणींचीच

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 22, 2024 12:53 IST

पक्षांकडून निवडणुकीतून कायमच बेदखल : मतपेटीतील लाभापुरताच विचार

इंदुमती गणेशकोल्हापूर : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनाने गेल्या तीन महिन्यांत महिलांची मते पदरात पाडून घेण्यासाठी योजनांचा धडाका लावलेला असताना निवडणूक लढविण्यासाठी मात्र महिलांचा विचार केलेला नाही. मतांसाठी जिल्ह्यातील दहा लाख महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ दिला आहे, पण यंदाच्या निवडणुकीत आमदार जयश्री जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, नंदिनी बाभूळकर, शौमिका महाडिक आणि स्वाती कोरी यांचीच चर्चा झाली. त्यादेखील अंतिम उमेदवार असतील की नाही हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल. राजकारणातदेखील पुरुषप्रधान संस्कृतीलाच महत्त्व असल्याचे हे द्योतक आहे.

लोकसभा निवडणूक पार पडताच राज्य शासनाने मतदारांवर योजनांचा पाऊसच सुरू केला तो आत्ता आचारसंहिता लागल्यावर थांबविला. यात लोकप्रिय झाली ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महिला मतदारांचा एकदा विश्वास संपादन केला की निवडणुकीचा विजयापर्यंतचा प्रवास सोपा होतो हे यामागचे खरे गणित. योजना किती काळ चालेल माहिती नाही; पण हातात पैसा आल्याने महिलादेखील खुश आहेत. त्याचा महायुतीला फायदा झाला की नाही ह दि. २३ नोव्हेंबरला समजेलच. महिलांचा विचार फक्त मतपेटीसाठीच केला गेला आहे. उमेदवारीचा विषय आला की पुरुषप्रधान मानसिकता स्त्रीला उंबऱ्याच्या आतच थांबायला लावते.

महिला आमदारांची पार्श्वभूमी सारखीच

  • कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव यांच्या रूपाने कोल्हापुरात एकमेव महिला आमदार आहेत, ही संधीदेखील त्यांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर मिळाली. राजकीय इतिहासाकडे वळून बघितले तर आजवरच्या महिला आमदारांची पार्श्वभूमी फार वेगळी नाही.
  • कोल्हापूर उत्तरमधून आमदार जयश्री जाधव व मधुरिमाराजे छत्रपती यांची, चंदगडमधून डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या नावाची चर्चा आहे. कागलमधून स्वाती कोरी यांचे नाव फक्त एकदा चर्चेत आले. त्यांच्यापैकी काेणाला उमेदवारी मिळते की पुरुषाचाच नंबर लागतो हे पुढील आठवड्यात कळेल. 
  • शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषद, गोकुळच्या माध्यमातून आपले नेतृत्व सिद्ध केल्याने कोल्हापूर दक्षिणमधून त्यांचे नाव पुढे आले होते, पण आता ती शक्यता धूसर आहे. कारण अमल लढणार असा स्टेटस त्यांनी स्वत:च परवा लावला होता.

कार्यकर्त्या प्रचारापुरत्याच..

महिला कार्यकर्त्यांनी नेतृत्वाची इच्छा असली तरी पत, पैसा, पाठिंब्यांमध्ये त्यांची शक्ती कमी पडते. त्यामुळे त्यांची भूमिका फक्त नेत्यांच्या मागे फिरत प्रचारापुरतीच मर्यादित राहते.

ही आहेत कारणे

  • घराण्यातील पुरुषाचे राजकीय करिअर संपण्याची भीती
  • पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा
  • राजकारणाचा बदललेला पोत आणि प्रचंड आव्हान.
  • पाण्यासारखा पैसा ओतण्याची क्षमता
  • शह काटशह, साम, दाम, दंड अशा सर्वंकष प्रकारात नेतृत्व विकसित करण्याचे आव्हान

राजकारण नेहमीच पुरुषसत्ता केंद्री राहिलेले आहे. त्यात आजचे राजकारण सरळसोट राहिलेले नाही, पैसा, जनसंपर्क, पाठिंबा, वरिष्ठ राजकीय पातळीवरील संबंध, कौटुंबिक पाठिंबा या पातळीवर महिलांची पीछेहाट होते. पुरुषांच्या महत्त्वाकांक्षांपुढे महिलांची महत्त्वाकांक्षा दुय्यम ठरल्याने त्या सक्षम असल्या तरी राजकारणातील सहभाग नगण्य आहे. - प्रा. डॉ. भारती पाटील, राजकीय विश्लेषक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024