शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कोल्हापूर जिल्ह्यात दहा लाख लाडक्या बहिणी; उमेदवारीसाठी चर्चा मात्र पाचजणींचीच

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 22, 2024 12:53 IST

पक्षांकडून निवडणुकीतून कायमच बेदखल : मतपेटीतील लाभापुरताच विचार

इंदुमती गणेशकोल्हापूर : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनाने गेल्या तीन महिन्यांत महिलांची मते पदरात पाडून घेण्यासाठी योजनांचा धडाका लावलेला असताना निवडणूक लढविण्यासाठी मात्र महिलांचा विचार केलेला नाही. मतांसाठी जिल्ह्यातील दहा लाख महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ दिला आहे, पण यंदाच्या निवडणुकीत आमदार जयश्री जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, नंदिनी बाभूळकर, शौमिका महाडिक आणि स्वाती कोरी यांचीच चर्चा झाली. त्यादेखील अंतिम उमेदवार असतील की नाही हे पुढील आठवड्यात स्पष्ट होईल. राजकारणातदेखील पुरुषप्रधान संस्कृतीलाच महत्त्व असल्याचे हे द्योतक आहे.

लोकसभा निवडणूक पार पडताच राज्य शासनाने मतदारांवर योजनांचा पाऊसच सुरू केला तो आत्ता आचारसंहिता लागल्यावर थांबविला. यात लोकप्रिय झाली ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महिला मतदारांचा एकदा विश्वास संपादन केला की निवडणुकीचा विजयापर्यंतचा प्रवास सोपा होतो हे यामागचे खरे गणित. योजना किती काळ चालेल माहिती नाही; पण हातात पैसा आल्याने महिलादेखील खुश आहेत. त्याचा महायुतीला फायदा झाला की नाही ह दि. २३ नोव्हेंबरला समजेलच. महिलांचा विचार फक्त मतपेटीसाठीच केला गेला आहे. उमेदवारीचा विषय आला की पुरुषप्रधान मानसिकता स्त्रीला उंबऱ्याच्या आतच थांबायला लावते.

महिला आमदारांची पार्श्वभूमी सारखीच

  • कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव यांच्या रूपाने कोल्हापुरात एकमेव महिला आमदार आहेत, ही संधीदेखील त्यांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर मिळाली. राजकीय इतिहासाकडे वळून बघितले तर आजवरच्या महिला आमदारांची पार्श्वभूमी फार वेगळी नाही.
  • कोल्हापूर उत्तरमधून आमदार जयश्री जाधव व मधुरिमाराजे छत्रपती यांची, चंदगडमधून डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या नावाची चर्चा आहे. कागलमधून स्वाती कोरी यांचे नाव फक्त एकदा चर्चेत आले. त्यांच्यापैकी काेणाला उमेदवारी मिळते की पुरुषाचाच नंबर लागतो हे पुढील आठवड्यात कळेल. 
  • शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषद, गोकुळच्या माध्यमातून आपले नेतृत्व सिद्ध केल्याने कोल्हापूर दक्षिणमधून त्यांचे नाव पुढे आले होते, पण आता ती शक्यता धूसर आहे. कारण अमल लढणार असा स्टेटस त्यांनी स्वत:च परवा लावला होता.

कार्यकर्त्या प्रचारापुरत्याच..

महिला कार्यकर्त्यांनी नेतृत्वाची इच्छा असली तरी पत, पैसा, पाठिंब्यांमध्ये त्यांची शक्ती कमी पडते. त्यामुळे त्यांची भूमिका फक्त नेत्यांच्या मागे फिरत प्रचारापुरतीच मर्यादित राहते.

ही आहेत कारणे

  • घराण्यातील पुरुषाचे राजकीय करिअर संपण्याची भीती
  • पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा
  • राजकारणाचा बदललेला पोत आणि प्रचंड आव्हान.
  • पाण्यासारखा पैसा ओतण्याची क्षमता
  • शह काटशह, साम, दाम, दंड अशा सर्वंकष प्रकारात नेतृत्व विकसित करण्याचे आव्हान

राजकारण नेहमीच पुरुषसत्ता केंद्री राहिलेले आहे. त्यात आजचे राजकारण सरळसोट राहिलेले नाही, पैसा, जनसंपर्क, पाठिंबा, वरिष्ठ राजकीय पातळीवरील संबंध, कौटुंबिक पाठिंबा या पातळीवर महिलांची पीछेहाट होते. पुरुषांच्या महत्त्वाकांक्षांपुढे महिलांची महत्त्वाकांक्षा दुय्यम ठरल्याने त्या सक्षम असल्या तरी राजकारणातील सहभाग नगण्य आहे. - प्रा. डॉ. भारती पाटील, राजकीय विश्लेषक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024