शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावयास सांगा

By admin | Updated: October 19, 2015 23:56 IST

आजऱ्यात लोकशाहीदिन : आगार व्यवस्थापकांकडे साकडे, राखीव जागावरही अतिक्रमण

आजरा : एस. टी. महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता एस. टी.मध्ये राखीव जागा ठेवल्या आहेत; परंतु ही सर्व मंडळी एस.टी.मध्ये उभी, तर महाविद्यालयीन तरुण जागा अडवितात. ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा राहू दे, किमान वाहकांना आदराने वागायला सांगा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनीे आगार व्यवस्थापकांकडे केली.आजरा तहसील कार्यालयात तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीदिन झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने एस. टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वर्षभरापूर्वी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात शपथ दिली होती; पण प्रत्यक्षात अंमलबजावाणीची गरज उपस्थितांनी बोलून दाखविली.वनविभागाच्यावतीने वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. प्रत्यक्षात किती झाडे जगली, हे मात्र समजू शकत नाही. त्यामुळे वृक्षलागवडीची तपासणी होऊन प्रत्यक्षात वृक्ष जगण्याचे प्रमाण किती आहे, याची तपासणी होण्याची गरज असून, २५ टक्के तरी वृक्ष जगतात का ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. वनखात्याकडून याची माहिती घेतली जाईल, असे तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले.आजरा-महागाव रस्त्यावर आजरा शहराच्या सीमेवर असणाऱ्या चित्री नदीवरील संताजी पुलाची दुरवस्था झाली असून, कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतचे पत्र बांधकाम विभागाला दिले आहे, असे दिनकरराव शिंदे यांनी सांगितले. यावेळी पूल दुरुस्तीकरिता अंदाजपत्रक तयार करून पाठविण्यात आले आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तर अपघात घडल्यावरच तुम्ही लक्ष देणार का? असा प्रश्न तहसीलदारांनी करत किमान पुलाच्या धोकादायकतेबद्दल तेथे फलक तरी लावा. यासाठी बजेट मंजुरीची वाट पाहत बसू नका, अशा शब्दांत सुनावले. वीज वितरण कंपनीकडे दाखल तक्रारींबाबतही मार्गदर्शक सूचना तहसीलदार ठोकडे यांनी केल्या. यावेळी दुय्यम निबंधक, आगार व्यवस्थापक, वीज कंपनीचे अधिकारी, नायब तहसीलदार डी. बी. कोळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)माईकवरून बसस्थानकावर जाहीर कराएस.टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न गंभीर असून, माईकवरून पुकारण्याबरोबरच वाहकांना वैयक्तिक सूचना देण्याबरोबरच जे वाहक यांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध थेट तक्रार देण्याचे आवाहन तहसीलदारांसह आगार व्यवस्थापक के. डी. मुरुकटे यांनी केले.नागरिकांनीही जाणीव ठेवावीस्वच्छतेबाबत केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदार न धरता नागरिकांनीही कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.