शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ज्येष्ठ नागरिकांचा आदर करावयास सांगा

By admin | Updated: October 19, 2015 23:56 IST

आजऱ्यात लोकशाहीदिन : आगार व्यवस्थापकांकडे साकडे, राखीव जागावरही अतिक्रमण

आजरा : एस. टी. महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, गरोदर स्त्रिया यांच्याकरिता एस. टी.मध्ये राखीव जागा ठेवल्या आहेत; परंतु ही सर्व मंडळी एस.टी.मध्ये उभी, तर महाविद्यालयीन तरुण जागा अडवितात. ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा राहू दे, किमान वाहकांना आदराने वागायला सांगा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनीे आगार व्यवस्थापकांकडे केली.आजरा तहसील कार्यालयात तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीदिन झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने एस. टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वर्षभरापूर्वी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात शपथ दिली होती; पण प्रत्यक्षात अंमलबजावाणीची गरज उपस्थितांनी बोलून दाखविली.वनविभागाच्यावतीने वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. प्रत्यक्षात किती झाडे जगली, हे मात्र समजू शकत नाही. त्यामुळे वृक्षलागवडीची तपासणी होऊन प्रत्यक्षात वृक्ष जगण्याचे प्रमाण किती आहे, याची तपासणी होण्याची गरज असून, २५ टक्के तरी वृक्ष जगतात का ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. वनखात्याकडून याची माहिती घेतली जाईल, असे तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले.आजरा-महागाव रस्त्यावर आजरा शहराच्या सीमेवर असणाऱ्या चित्री नदीवरील संताजी पुलाची दुरवस्था झाली असून, कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतचे पत्र बांधकाम विभागाला दिले आहे, असे दिनकरराव शिंदे यांनी सांगितले. यावेळी पूल दुरुस्तीकरिता अंदाजपत्रक तयार करून पाठविण्यात आले आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तर अपघात घडल्यावरच तुम्ही लक्ष देणार का? असा प्रश्न तहसीलदारांनी करत किमान पुलाच्या धोकादायकतेबद्दल तेथे फलक तरी लावा. यासाठी बजेट मंजुरीची वाट पाहत बसू नका, अशा शब्दांत सुनावले. वीज वितरण कंपनीकडे दाखल तक्रारींबाबतही मार्गदर्शक सूचना तहसीलदार ठोकडे यांनी केल्या. यावेळी दुय्यम निबंधक, आगार व्यवस्थापक, वीज कंपनीचे अधिकारी, नायब तहसीलदार डी. बी. कोळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)माईकवरून बसस्थानकावर जाहीर कराएस.टी.मधील आरक्षित जागांचा प्रश्न गंभीर असून, माईकवरून पुकारण्याबरोबरच वाहकांना वैयक्तिक सूचना देण्याबरोबरच जे वाहक यांची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध थेट तक्रार देण्याचे आवाहन तहसीलदारांसह आगार व्यवस्थापक के. डी. मुरुकटे यांनी केले.नागरिकांनीही जाणीव ठेवावीस्वच्छतेबाबत केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदार न धरता नागरिकांनीही कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही तहसीलदारांनी स्पष्ट केले.