शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपपत्रात आठ कलमांची वाढ, बिद्रे-गोरे कुटुंबीयांकडून समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 10:57 IST

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी अलिबाग न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलेल्या युक्तीवादामुळे आरोपपत्रात वाढीव आठ कलमांचा समावेश केला गेला. त्यातील ‘१२० ब’ कलमानुसार सर्वच आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे सिद्ध होऊन शिक्षा लागण्याची शक्यता आहे. वाढीव कलमांमुळे बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देअश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपपत्रात आठ कलमांची वाढ बिद्रे-गोरे कुटुंबीयांकडून समाधान

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी अलिबाग न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलेल्या युक्तीवादामुळे आरोपपत्रात वाढीव आठ कलमांचा समावेश केला गेला. त्यातील ‘१२० ब’ कलमानुसार सर्वच आरोपींनी कट रचून हत्या केल्याचे सिद्ध होऊन शिक्षा लागण्याची शक्यता आहे. वाढीव कलमांमुळे बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.बिद्रे हत्या प्रकरणाची अलिबाग न्यायालयात न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली आहे. सोमवारी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. घरत यांनी वाढीव कलमासंदर्भात युक्तीवाद केला. त्यांनी सुचविल्यामुळे १२० ब नुसार आठ कलमे वाढविण्यात आली. यामुळे आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा मित्र राजेश पाटील, फळणीकर, भंडारी अशा चौघांनी संघटित होऊन कट रचणे, खोटे पुरावे तयार करणे, पोलिसांची दिशाभूल करून तपासात अडथळे निर्माण करणे, आदी आरोपांची कलमे लावली आहेत; त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा पुरावे नष्ट करणाऱ्यांना लागणार आहेत.अभय कुरुंदकरने जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. त्याचे वरिष्ठ वकील हजर नसल्याने त्यावर ४ जुलैला सुनावणी ठेवण्यात आली. यावेळी न्यायालयात कुरुंदकरसह सर्व संशयित न्यायालयात उपस्थित होते.

बिद्रे हत्याकांडात नवी मुंबई पोलिसांनी १२० ब हे कलम व इतर महत्त्वाची कलमे लावली नव्हती. त्याचा फायदा आरोपींना होण्याची दाट शक्यता होती; परंतु सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये अन्य आठ कलमे वाढविल्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होणार आहे. सर्वच आरोपींना एकच शिक्षा होईल, अशी आशा आहे.- राजकुमार गोरे, मृत अश्विनी बिद्रेचे पती 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणkolhapurकोल्हापूर