शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

Maharashtra Vidhan Sabha 2019 : भाजपचे अशोकराव माने, अनिल यादव जनसुराज्यमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 2:42 PM

भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत अचानक विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित झाली असून, शिरोळमधून भाजपचे नेते अनिल यादव हे जनसुराज्यचे उमेदवार असतील.

ठळक मुद्देभाजपचे अशोकराव माने, अनिल यादव जनसुराज्यमध्येहातकणंगले, शिरोळमधून उमेदवारी, मानेंचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत अचानक विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित झाली असून, शिरोळमधून भाजपचे नेते अनिल यादव हे जनसुराज्यचे उमेदवार असतील.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदले दिवशी वेगवान घडामोडी घडल्या असून, सकाळी माने यांच्या जनसुराज्यच्या उमेदवारीवर विनय कोरे यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर माने यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रतोद विजय भोजे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.दुसरीकडे शिरोळ तालुक्यातून ‘गोकुळ’चे संचालक आणि भाजपचे नेते अनिल यादव यांनीही जनसुराज्यची उमेदवारी स्वीकारली असून, हे दोघेही आज, शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हातकणंगले येथून १५ वर्षांपूर्वी राजीव आवळे जनसुराज्यच्या तिकीटावर निवडून आले होते.

भाजप शिवसेना युती झाल्यानंतर जनसुराज्यकडे इच्छुकांची गर्दी झाली असून, यामध्ये भाजपच्या नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. स्वत: विनय कोरे आणि समित कदम या सर्वांशी गेले दोन दिवस चर्चा करीत असून, जिल्ह्यातील १० पैकी पाच मतदारसंघांत ‘जनसुराज्य’चे उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे.वरील दोन उमेदवारांव्यतिरिक्त ‘जनसुराज्य’चे संस्थापक विनय कोरे हे स्वत: पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. ‘कोल्हापूर उत्तर’मधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. त्याच पद्धतीने चंदगडमधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. २००४ साली याच मतदारसंघातून नरसिंगराव पाटील जनसुराज्यच्या तिकीटावर निवडून आले होते; मात्र करवीर, कोल्हापूर दक्षिण, कागल, इचलकरंजी, भुदरगडमध्ये जनसुराज्यचा उमेदवार नसण्याची शक्यता आहे.युतीमध्ये बेबनाव होण्याची शक्यताएकीकडे जिल्ह्यातील १0 पैकी ८ मतदारसंघांमध्ये शिवसेनेला जागा मिळाल्या असताना भाजपचेच नेते किमान चार ठिकाणी बंड करण्याच्या तयारीत आहेत. समरजितसिंह घाटगे, अशोकराव माने, अनिल यादव हे तीनही भाजपचे नेते शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात रिंगणात उतरणार असल्याने शिवसेना-भाजप युतीमध्ये बेबनाव असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे; त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात बंडाचा वणवा पेटला आहे. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर