शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जयवंतराव विरूद्ध अशोकअण्णा फेस-टू-फेस लढत---लक्षवेधी लढत

By admin | Updated: February 10, 2017 00:23 IST

रंगतदार सामना : आजरा साखर कारखान्याच्या आजी-माजी अध्यक्षांचे एकमेकांना आव्हान-

ज्योतीप्रसाद सावंत ---आजराआजरा जिल्हा परिषद मतदारसंघात आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी विरुद्ध माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्यात थेट लढत होत आहे. तालुक्यात ताराराणी आघाडीची शकले पडल्यानंतर चराटी यांची विजयाची परंपरा खंडित करण्यासाठी दोन्ही काँग्रेसने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. अशोकअण्णांना अंतर्गत विरोधकांचा असणारा विरोधही यावेळी उफाळून आला आहे. एकीकडे राजकीय अस्तित्वाची जयवंतराव शिंपी यांची असणारी लढाई, तर दुसरीकडे विरोधकांवर पुन्हा एकदा मात करण्यासाठी ‘चराटी’ यांनी चालवलेले प्रयत्न यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.अशोकअण्णा चराटी यांनी महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँक, साखर कारखाना निवडणूक लढवून त्यामध्ये यशही मिळविले. जि. प. निवडणुकीत मात्र अनेकांनी ताराराणी आघाडीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना, श्रीपतराव देसाई, आमदार प्रकाश आबिटकर, शामराव बोलके, अंकुश पाटील यांनी प्राधान्याने ‘ताराराणी’पासून संपर्क तोडला आहे. ‘स्वाभिमानी’ने कारखान्याप्रमाणेच उसना उमेदवार घेऊन त्याला स्वाभिमानीचा शिक्का मारला आहे. स्वाभिमानीची फरफट चालली आहे. ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी झाली आहे.राष्ट्रवादीने पेरणोली पं. स. करिता उदय पवार यांना उमेदवारी देऊन जयवंतरावांना पेरणोली भागातून मतदान वाढेल अशी दक्षता घेतली आहे, तर ताराराणीने सहदेव नेवगे (गवसे) यांना उमेदवारी दिली आहे. देवर्डे येथील मतदारांची भूमिकाही महत्त्वाची आहे. सद्य:स्थितीत दोन्ही प्रमुख आघाड्यांची हवा ‘ताईट’ आहे. खेडे, सोहाळे ही प्रमुख गावेही काय भूमिका घेणार? यावर मताधिक्क्यांची गणित अवलंबून राहणार आहेत. कि फॅक्टर...प्राधान्याने हा मतदारसंघ म्हणजे तालुक्याचा पश्चिम भाग आहे. या मतदारसंघातच आजरा शहराचा समावेश होतो. कारखाना निवडणुकीत महाआघाडीच्या विजयात या मतदारसंघाचा मोठा वाटा होता.मुस्लिम मतदार हा घटकही येथील निवडणुकांवर परिणाम करणारा घटक आहे. दोन्ही बाजूने पंचायत समितीकरिता मुस्लिम उमेदवार दिला आहे. शिवसेनेने या जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या पेरणोली पंचायत समिती गण व आजरा पंचायत समिती गणात आपले उमेदवार उभे केले असले तरी जिल्हा परिषदेकरिता उमेदवार न देता आपला ‘हातचा’ राखून ठेवला आहे. जिल्हा परिषदेला शिवसेनेची रसद कोणाला मिळणार? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. सभापती विष्णूपंत केसरकर यांनी अशोक चराटी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. त्यामुळे सेनेची भूमिका काय राहणार याचा अंदाज येत आहे.