शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

'आशा'ची वेतन निश्चितीत 'निराशा'

By admin | Updated: November 14, 2014 23:58 IST

सात महिन्यांपासून मानधन नाही : इतर राज्यांच्या धर्तीवर वेतन देण्याची मागणी

कोल्हापूर : ग्र्रामीण आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. यात कोल्हापूर जिल्हा अव्वल स्थानी आहे; परंतु ज्यांच्या योगदानाने हे स्थान मिळाले, त्या आशा वर्कर्सना कुठलेच स्थान नसल्याचे चित्र आहे. वेळेवर न मिळणारे मानधन व नसलेली दरमहा वेतननिश्चिती यामुळे त्यांची परवड होत आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. जिल्ह्यात २७०० आशा वर्कर्स आहेत.दर हजारी लोकांमागे एक आशा काम करते. गरोदर माता, लहान मुले यांची काळजी घेणे, त्यांना आहार व आरोग्यविषयी जागृती करणे, गरोदर महिलांचे दवाखान्यात बाळंतपण करणे, साथीच्या रोगांचा सर्व्हे करणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. शासन त्यांच्याकडून आरोग्याच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या मोहिमा यशस्वी करून घेते; परंतु या कामासाठी त्यांना तुटपुंजे मानधन मिळते. केसेसच्या प्रमाणात ते दिले जाते. कामाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न हे विचार करायला लावणारे आहे. गेल्या सात महिन्यांपासून तेही मिळालेले नाही. यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरूआहे; परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून शासनाकडून निधीच आला नसल्याचे सांगून हात वर केले जात आहेत. यामध्ये त्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. निधी आला नसेल तर तो का आला नाही? याची माहिती घेणे गरजेचे आहे. त्यांच्यातीलच एखाद्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्याचा महिन्याचा पगार मिळाला नाही तर लगेच कामबंद आंदोलन, काळ्या फिती लावून आंदोलने होतील; पण आशा वर्कर्सना मानधन न मिळाल्याने त्यांची अवस्था काय असेल, याचाही विचार होणे गरजेचे आहे.मानधनाऐवजी निश्चित वेतन मिळावे, अशी आशा वर्कर्स संघटनेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे; परंतु त्याकडे शासनाने कानाडोळाच केला आहे. शेजारील कर्नाटक राज्यात दरमहा २२०० रुपये निश्चित वेतन दिले जाते. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये १३०० रुपये व राजस्थानमध्ये ११०० रुपये वेतन दिले जाते. त्या धर्तीवर महाराष्ट्रात ते दिले जात नाही. ग्रामीण जनता आरोग्याची काळजी घेण्याच्या बाबतीत जागरूक म्हणून महाराष्ट्र देशात प्रथम स्थानावर आहे. यामध्ये कोल्हापूरचाही वाटा आहे; परंतु ज्यांच्या जिवावर हे होऊ शकले आहे. त्या आशा वर्कर्सकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)आशा वर्कर्सचे गेले सात महिने मानधन शासनाकडून मिळालेले नाही. ते मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्याचबरोबर हा प्रश्न वारंवार निर्माण होऊ नये, यासाठी आशा वर्कर्सची दरमहा वेतन निश्चिती झाली पाहिजे.-प्रा. सुभाष जाधव,खजिनदार, आशा वर्कर्स संघटना