शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

Kolhapur: सांबरांसह भेकरची संख्या वाढविली, आता टप्याटप्याने आणणार वाघ; स्थलांतरणाची प्रक्रिया कशी.. वाचा

By संदीप आडनाईक | Updated: September 13, 2025 19:18 IST

वाघ वाढविण्यासाठी ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’चे नियोजनबद्ध प्रयत्न

संदीप आडनाईक कोल्हापूर : मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघ टप्प्याटप्याने दोन महिन्यांपर्यंत सह्याद्री अभयारण्यात स्थलांतर केले जाणार आहेत. वाघांची संख्या वाढावी यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले. राखीव वनजमिनीत शेती करून या वाघांचे खाद्य असलेल्या सांबर, भेकर आदी प्राण्यांची संख्या वाढवली आहे. या प्रकल्पात आता २७ वाघ राहू शकतील इतकी खाद्याची व्यवस्था असल्याचे या प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले.

वाघांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा अधिवास पूरक असल्यामुळे स्थानांतरणासाठी सर्वांत महत्त्वाची बाब असणारी परवानगी मिळाली आहे. ताडोबा आणि पेंच या वेगळ्या प्रदेशातून (लँडस्केप) टप्प्याटप्याने वाघ आणले जाणार आहेत. त्यासाठी मोठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यांना पकडण्यापासून त्यांचा प्रवास, वैद्यकीय तपासण्या आणि बदललेला भूप्रदेश यामुळे त्यांच्यावर निर्माण झालेला ताण हलका करून मग त्यांना वन्य अधिवासात सोडले जाईल. यामुळे त्यांची या परिसरामध्ये टिकून राहण्याची शक्यता अधिक वाढणार आहे. यासाठी व्यवस्थित तयारी केली जात आहे.

नियोजनबद्ध प्रयत्न

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढावी यासाठी वनखात्याने २०१७ पासून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पात वाघांचा अधिवास असण्यासाठी संरक्षण, तृणभक्षी प्राणी आणि अबाधित जंगल या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये २७ हून अधिक वाघ वास्तव्यास राहू शकतात, अशी माहिती तुषार चव्हाण यांनी दिली. त्यापैकी ४५० चौरस किलोमीटर क्षेत्रात आता वाघांचं स्थानांतरण करता येणार आहे. चांदोलीजवळच्या सागरेश्वर अभयारण्यातून २०२१ पासून चितळ स्थानांतरित करण्याचा ’प्रे-ऑगमेंटेशन’ प्रकल्प चालू आहे. याशिवाय इतर ठिकाणांवरूनही तृणभक्षी प्राणी आणण्याच्या परवानग्या मिळाल्या आहेत.अशी असेल वाघ स्थलांतरणाची प्रक्रियाविदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा जास्त ५० वाघ असल्याची माहिती आहे. त्यामुळे सह्याद्रीत वाघांचे स्थलांतर करताना टप्प्याटप्प्याने म्हणजे प्रथम एक किंवा दोन वाघ सह्याद्रीत स्थलांतर केल्यानंतर त्यांचे मॉनिटरिंग करण्यात येईल. हे वाघ सह्याद्रीत रमले की नाही, या निरीक्षणाअंती पुढील निर्णय घेऊन इतर वाघ आणले जातील. या साऱ्या प्रक्रियेला किमान दोन महिने लागू शकतील.