शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीजवळ, ४५ फुटांवर जाताच नागरिकांचे स्थलांतर करणार; प्रशासन सतर्क

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 26, 2023 13:13 IST

कोल्हापूर पूरजन्य स्थितीच्या उंबरठ्यावर असले तरी परिस्थिती अजून नियंत्रणात

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज, बुधवारी सकाळी उघडल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी ५ फुटांनी वाढून ४५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राधानगरीसह कोल्हापूर शहर, ग्रामीण भाग, करवीर या भागांना अलर्ट करण्यात आले आहे. ४५ फुटांपर्यंत पाणी आल्यानंतर ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते येथील सर्व नागरिकांचे दुपारपर्यंत स्थलांतर करण्यात येत आहे. घरापर्यत पाणी येण्याची वाट ब बघता तातडीने लोकांनी सामान बांधून तयार रहावे, प्रशासनाकडून सूचना मिळताच जवळील निवारागृहात जावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, राधानगरी धरणातील पाणी भोगावती नदीत जाऊन, पंचगंगेत यायला व पुढे शहरापर्यंत पोहोचायला १५ तास, कोल्हापुरातून इचलकरंजी पोहोचायला ६ ते ८ तास व तेथून शिरोळमध्ये पोहोचायला ५ ते ६ तास लागतात. त्यामुळे राधानगरी काठची गावे, कोल्हापूर शहर, हातकणंगले व शिरोळ या भागांना अलर्ट देण्यात आला आहे. राधानगरी धरणातून सध्या ५७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

कुंभी, कासारीतुन देखील काही प्रमाणात पाणी सोडल्याने पूर नियंत्रणासाठी मदत झाली आहे. तुळशी धरणातून अजून पाणी सोडलेले नाही. दुसरीकडे अजून काेयनेतून विसर्ग सुरू न झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी कृष्णा नदीत मिसळून पुढे प्रवाह योग्य रितीने सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर पूरजन्य स्थितीच्या उंबरठ्यावर असले तरी परिस्थिती अजून नियंत्रणात आहे.अलमट्टी ५१७ मीटरवर स्थिर..अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत महाराष्ट्र व कर्नाटक मधील सिंचन विभागामध्ये योग्य समन्वय आहे. या धरणातील पाणी १५ ऑगस्टपर्यंत ५१७.५ मीटरवर ठेवण्याचा निर्णय झाला असून बुधवारी सकाळीदेखील धरणातील पाण्याची पातळी स्थिर आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरcollectorजिल्हाधिकारी