शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीजवळ, ४५ फुटांवर जाताच नागरिकांचे स्थलांतर करणार; प्रशासन सतर्क

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 26, 2023 13:13 IST

कोल्हापूर पूरजन्य स्थितीच्या उंबरठ्यावर असले तरी परिस्थिती अजून नियंत्रणात

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज, बुधवारी सकाळी उघडल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी ५ फुटांनी वाढून ४५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राधानगरीसह कोल्हापूर शहर, ग्रामीण भाग, करवीर या भागांना अलर्ट करण्यात आले आहे. ४५ फुटांपर्यंत पाणी आल्यानंतर ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते येथील सर्व नागरिकांचे दुपारपर्यंत स्थलांतर करण्यात येत आहे. घरापर्यत पाणी येण्याची वाट ब बघता तातडीने लोकांनी सामान बांधून तयार रहावे, प्रशासनाकडून सूचना मिळताच जवळील निवारागृहात जावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, राधानगरी धरणातील पाणी भोगावती नदीत जाऊन, पंचगंगेत यायला व पुढे शहरापर्यंत पोहोचायला १५ तास, कोल्हापुरातून इचलकरंजी पोहोचायला ६ ते ८ तास व तेथून शिरोळमध्ये पोहोचायला ५ ते ६ तास लागतात. त्यामुळे राधानगरी काठची गावे, कोल्हापूर शहर, हातकणंगले व शिरोळ या भागांना अलर्ट देण्यात आला आहे. राधानगरी धरणातून सध्या ५७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

कुंभी, कासारीतुन देखील काही प्रमाणात पाणी सोडल्याने पूर नियंत्रणासाठी मदत झाली आहे. तुळशी धरणातून अजून पाणी सोडलेले नाही. दुसरीकडे अजून काेयनेतून विसर्ग सुरू न झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी कृष्णा नदीत मिसळून पुढे प्रवाह योग्य रितीने सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर पूरजन्य स्थितीच्या उंबरठ्यावर असले तरी परिस्थिती अजून नियंत्रणात आहे.अलमट्टी ५१७ मीटरवर स्थिर..अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत महाराष्ट्र व कर्नाटक मधील सिंचन विभागामध्ये योग्य समन्वय आहे. या धरणातील पाणी १५ ऑगस्टपर्यंत ५१७.५ मीटरवर ठेवण्याचा निर्णय झाला असून बुधवारी सकाळीदेखील धरणातील पाण्याची पातळी स्थिर आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरcollectorजिल्हाधिकारी