शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोल्हापुरात अंबाबाईचरणी तब्बल दीड लाख भाविक नतमस्तक

By संदीप आडनाईक | Updated: January 28, 2024 21:11 IST

शनिवारी ७४ हजार १०७ भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी दोन दिवसांत तब्बल १ लाख ५८ हजार ३१४ भाविक नतमस्तक झाले. सलग सुट्यांमुळे गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात भाविक आणि पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत ८४ हजार २०७ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले, तर शनिवारी ७४ हजार १०७ भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते.

शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाची सुटी, नंतर शनिवार आणि रविवार अशा सलग तीन सुट्यांची पर्वणी मिळाल्यामुळे अनेकजण दोन, तीन दिवसांच्या सहलीसाठी बाहेर पडले आहेत. रविवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत बिंदू चौक, दसरा चौक, भाऊसिंगजी रोड, मिरजकर तिकटी, आईसाहेब महाराज पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक आदी रस्ते वाहनांनी भरुन गेले होते. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत होती.  सलग सुटी मिळाल्याने कोल्हापुरातील यात्री निवास, हॉटेल्स, महालक्ष्मी धर्मशाळा फुल्ल आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर