शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

मी कळायला अनेक जन्म लागतील, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 12:18 IST

मी कशातच अडकत नाही म्हणून विरोधक हैराण

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून मी राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांसाठी मी कोठून पैसे आणतो, याची चौकशी विरोधक करत आहेत. त्यातूनच माझ्यावर शाई फेकण्याचा प्रकार झाला, तरीही मी कशात अडकत नाही म्हटल्यावर ते हैराण झाले आहेत. त्यातूनच ते माझ्यावर टीका करत आहेत, ठीक आहे, त्यातून त्यांना पुण्य मिळत असेल तर आणखी टीका करा, असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.मंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून दौलतनगर, कोल्हापूर येथे आयोजित मोफत फिरता दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, अमल महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, राहुल चिकोडे, नवोदिता घाटगे आदी उपस्थित होते.मी कळायला तुम्हाला आणखी जन्म घ्यावा लागेलपहाटे पाच वाजता माझे काम सुरू होते, कधी आजारी पडत नाही, नेहमी हसतखेळत असतो, याबद्दल विरोधकांना आश्चर्य वाटते. मात्र, मी कळायला तुम्हाला आणखी जन्म घ्यावा लागेल, असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला.शेट्टी महायुतीसोबत येतील‘स्वाभिमानी’ व ‘रासप’ हे महायुतीसोबत येणार असल्याबाबत विचारले असता, मंत्री पाटील म्हणाले, ‘रासप’ आमच्यासोबत आहेच, ‘स्वाभिमानी’ही होती. मध्यंतरीच्या काळात ते बाजूला गेले. तरीही राजू शेट्टी यांच्याशी आमचा संवाद असतोच, शेट्टी महायुतीसोबत येतील, याचा विश्वास आहे.धनंजय महाडिक यांच्या मंत्रिपदाबाबत संकेतमाझ्या पदरात जे पुण्य गोळा होईल, त्यातील महेश जाधव, अशोक देसाई आदींना थोडे थोडे देत असतो. धनंजय महाडिक यांना राज्यसभा सदस्य केले, त्यांच्यासाठीही काही पुण्य अजून शिल्लक ठेवले असून, ते लवकरच दिसेल, अशा शब्दांत महाडिक यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळेल, असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले.राऊत हिंमत असेल तर राजीनामा द्या‘दादा हवा जोरात आहे टोपी सांभाळा’ अशी टीका संजय राऊत माझ्यावर करतात. मात्र, राऊत तुमच्या टोपीची काळजी करा, हिंमत असेल तर राजीनामा द्या, ज्या आमदारांच्या जिवावर खासदार झाला, त्यांना रोज शिव्याशाप देण्यापेक्षा राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभेत जाऊनच दाखवा, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला.चिंचवडची जबाबदारी तुम्ही घेणार का?कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसल्याने सगळेच विरोधक निराश झाले आहेत. त्यातून रोज त्रागा करत आहेत. कसब्यात यापूर्वीही झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. २००९ पासूनच्या तिन्ही निवडणुकीत विरोधातील उमेदवारांच्या मताची बेरीज भाजपपेक्षा अधिक होतीच, यावेळेला पराभवाच्या भीतीने घट्ट मिठी मारल्यानेच मत विभाजन टळले आणि विजयी झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. कसब्याची आम्ही जबाबदारी स्वीकारली तशी ‘चिंचवड’ची जबाबदारी विरोधक घेणार का, असा सवाल मंत्री पाटील यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील